शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

यांत्रिक युगातही बैलांची मागणी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 9:18 PM

आजच्या यांत्रिक युगात शेतीसाठी यंत्राचा वापर वाढला आहे. तरीही काही ठिकाणी बैलांद्वारेच शेतीची कामे केली जात आहे. सध्या कळंब येथे सुरू असलेल्या बैलबाजारात शेतकऱ्यांचा कल बैलजोडी खरेदीकडे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकळंबचा बैलबाजार फुलला : खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी, ठिकठिकाणच्या जोड्या दाखल

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : आजच्या यांत्रिक युगात शेतीसाठी यंत्राचा वापर वाढला आहे. तरीही काही ठिकाणी बैलांद्वारेच शेतीची कामे केली जात आहे. सध्या कळंब येथे सुरू असलेल्या बैलबाजारात शेतकऱ्यांचा कल बैलजोडी खरेदीकडे दिसून येत आहे.उन्हाळ्याची चाहुल लागली की बळीराजा मशागतीच्या कामाला लागतो. तेव्हा त्याला प्रकर्षाने बैलांची आठवण होते. बैलाचे काम यंत्र करीत असले तरी, सर्वच कामे यंत्राच्या साह्याने शक्य नाही, ही वास्तविकता आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या दारी एक जोडी का होईना बैल ठेवतोच. कळंब येथील बैलबाजारात देवळी, बाभूळगाव, वीरखेड, वर्धा, तळेगाव, राळेगाव आदी प्रमुख गावातील दावणा (बैल) आहेत. बाजारात बैल घेणे, विकणे आणि अलटीपलटी या तीन प्रकारात व्यवहार केला जातो.येथील बैलबाजारात बैलजोडी कमीतकमी ६० हजार आणि जास्तीतजास्त दोन लाख किंमत असणारी आहे. बैलबाजाराच्या निमित्ताने बैलांना नाल ठोकणारे, शिंगे शिलणाऱ्या, चारा विकणार, हॉटेल व्यावसायिक लोकांना चांगला रोजगार उपलब्ध झालेला आहे. राहुटी करून शेतकरी बैलासोबतच (दावण) मुक्कामाला असतो.बैलाच्या किमतीनुसार कमिशनबैलबाजारात जास्तीतजास्त व्यवहार दलालामार्फतच होतो. दलालाविना सौदा शक्यतो पूर्ण होत नाही, असा अनुभव आहे. परस्पर सौदा करणाऱ्याची दिशाभुल करुन त्यांना बिचकविल्या जाते. दलाल बैल घेणारा व विकणाऱ्याकडून बैलाच्या किमतीनुसार कमीशनची मागणी करतो, तर दुसरीकडे बैलबाजार हर्रास घेणाराही बैलाप्रमाणे फीची आकारणी करतो. बाजारात बैल घेणाऱ्यांसोबतच बैल पाहणाऱ्यांचीही गर्दी असते. काही बैलजोड्या फारच देखण्या आहे. यावर्षी पाहिजे तशी बैल खरेदी-विक्री झाली नसल्याची माहिती आहे. तरीही बैल घेण्याची शेतकºयांची इच्छा लपून राहत नाही, हे दिसून येते.