शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पाणीटंचाईने अनेक व्यवसाय बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:24 IST

भीषण पाणीटंचाईचा फटका नागरिकांनाच नाही तर शहरातील सर्वच व्यवसायांना बसला आहे. अनेक व्यवसाय आज पाण्याअभावी डबघाईस आले आहे. हजारो हातांना काम देणारा बांधकाम व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला आहे.

ठळक मुद्देबांधकामे ठप्प : मजूर-कारागिरांवर संकट, साहित्य विक्री थांबली, हॉस्पिटल, हॉटेलही प्रभावित

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भीषण पाणीटंचाईचा फटका नागरिकांनाच नाही तर शहरातील सर्वच व्यवसायांना बसला आहे. अनेक व्यवसाय आज पाण्याअभावी डबघाईस आले आहे. हजारो हातांना काम देणारा बांधकाम व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला आहे. तर पाण्याचा टँकर आल्याशिवाय हॉटेल सुरू होत नाही. शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयालाही फटका बसला आहे. कुलरला तर सुरुवातीपासूनच मागणी नाही. या पाणी टंचाईने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेकांचा रोजगार हिरावला असून अनेकांचे व्यवसाय बुडाले आहे.यवतमाळ शहरात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले आहे. या पाणी टंचाईचा फटका सर्वाधिक बसला तो बांधकाम व्यवसायाला. नोटाबंदी आणि रेरा कायद्याने डबघाईस आलेला हा व्यवसाय पाणीटंचाईने अक्षरश: बंद झाला आहे. बांधकाम व्यवसायावर १५ ते २० विविध घटकांचा व्यवसाय अवलंबून असतो. त्यात मजूर, ठेकेदार, पेंटर, प्लंबर, फर्निचर, फेब्रीकेशन, हार्डवेअर यापासून लहान-सहान प्रत्येक घटकाचा या व्यवसायात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असतो. मात्र बांधकामच बंद असल्याने हजारो मजूर बेरोजगार झाले आहे.पालिकेचा प्रत्येक टँकरवर ६० हजार खर्च, फ्लेक्स मात्र राजकीय नेत्यांचेयवतमाळ नगरपरिषदेने प्रत्येक प्रभागात दोन टँकर या प्रमाणे २८ प्रभागात ५६ टँकर सुरू केले आहे. प्रत्येक टँकरला महिन्याकाठी ६० हजार रुपये भाडे दिले जात आहे. परंतु नगरपरिषदेच्या पैशातून सुरू असलेल्या या टँकरचा लाभ राजकीय पदाधिकारी आपल्या प्रसिद्धीसाठी घेत आहे. नगरपरिषदेच्या टँकरवर स्वत:चे फ्लेक्स लावले जात आहे. अनेक ठिकाणी पालिकेच्या या टँकरमधील पाणी सर्रास विकले जात आहे. काही प्रामाणिक कार्यकर्ते कोणताही गाजावाजा न करता अथवा प्रसिद्धीच्या मागे न लागता सेवा म्हणून पाण्याचे मोफत वाटप करीत असताना काही चेहरे मात्र पालिकेच्या टँकरचा लिलाव करीत आहे. त्यातून बरीच मोठी उलाढाल होत आहे. राजकीय वजन वापरुन टँकरही मोफत भरुन घेतले जात आहे.हे पदाधिकारी पालिकेच्या या टँकरवर आपल्या सोईने फ्लेक्स लावत असून पाहिजे तेव्हा ते काढून घेतात. सामान्य नागरिकांना मात्र पालिकेचे टँकर कोणते आणि पदाधिकाऱ्याचे कोणते हे ओळखणे कठीण झाले आहे. पालिकेला एका कार्यकर्त्याने माहिती अधिकारात २८ प्रभागातील टँकरचे क्रमांक मागितले. मात्र जाणीवपूर्वक ते देणे टाळले जात आहे. कारण त्यातून एकूणच पोलखोल होणार आहे.यवतमाळ बनले समस्यांचे माहेरघरयवतमाळ शहर सध्या जणू समस्यांचे माहेरघर बनले आहे. विविध समस्यांनी शहर अराजकतेच्या वाटेवर आहे की काय, असे वाटायला लागले आहे. भीषण पाणीटंचाई ही शहराची प्रमुख समस्या आहे. त्याच्या सोबतीला प्रमुख मार्गच नव्हे तर गल्लीबोळातील रस्तेसुद्धा ठिकठिकाणी खोदले आहेत. बेंबळाची पाईपलाईन, गोखीची पाईपलाईन, महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. या सर्व खोदकामामुळे शहरातील टेलिफोन लाईन, इंटरनेट सेवा, वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. रस्ते खोदल्याने धुळीची समस्या निर्माण झाली आहे. त्यातून प्रदूषण होत असल्याने श्वसनाचे आजार बळावले आहे. खड्यांमुळे हाडांचे आजार वाढले असून वाहनांचे आरोग्य धोक्यात आले आहे. टेलिफोन लाईन तर कित्येक महिन्यांपासून बंद आहे. बिल मात्र ग्राहकांना नियमित पाठविले जात आहे. या फोन लाईनबंदचा परिणाम इंटरनेट सेवेवर व पर्यायाने बँकींग व अन्य खासगी सेवांवर होतो आहे. दिवसदिवसभर बँकांमध्ये लिंक राहत नाही. पर्यायाने ग्राहकांना परत जावे लागते. लोकप्रतिनिधी या समस्येकडे पाहण्यास तयार नाही. ‘विकास हवा असेल तर त्रास सहन करावाच लागेल’ हे ठेवणीतील वाक्य बोलून लोकप्रतिनिधी वेळ मारुन नेताना दिसत आहे. या समस्यांच्या माहेरघरात यवतमाळकर जनता अद्याप संयम राखून आहे. मात्र हा संयम सुटल्यास लोकप्रतिनिधी व प्रशासनाला पळताभूई थोडी होईल, एवढे निश्चित.टँकरच्या वाढत्या दरावर नियंत्रण कुणाचे ?पाणीटंचाईने संपूर्ण व्यवसाय ठप्प झाले असले तरी टँकरव्दारे पाणी विक्री व्यवसायाला मात्र सुगीचे दिवस आले आहे. एकएक व्यावसायिक दिवसाला दहा ते १२ हजार रुपयांची कमाई करीत आहे. आता तर मालवाहू वाहनातूनही दीड-दोन हजार लिटरची टाकी लावून पाणी विकण्याचा व्यवसाय केला जात आहे. या व्यवसायातून अनेक जण मालामाल होत आहे. एका टँकरचा ३०० रूपये असलेला दर सध्याच १२०० ते १५०० रूपयांवर पोहोचविला गेला आहे. यवतमाळकरांच्या अडचणींचा फायदा उठवित हा दर आणखी वाढविला जाण्याची भीती आहे. या दरावर जिल्हा प्रशासनाचा अंकुश असावा, अशी एकमुखी मागणी केली जात आहे. टँकरचे दर नियंत्रणात ठेवण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई