शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

Maharashtra Election 2019 : मोदी जिथे जातात तिथे खोटे बोलून येतात, राहुल गांधींची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 16:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटे बोलतात. ते जिथे जातात तिथे खोटे बोलून येतात, अशी बोचरी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यवतमाळमधील वणी येथे  केली.

(वणी) यवतमाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटे बोलतात. ते जिथे जातात तिथे खोटे बोलून येतात, अशी बोचरी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यवतमाळमधील वणी येथे  केली. तसेच भाजपाने आश्वासन दिल्याप्रमाणे सर्वसामान्यांना ना 15 लाख रुपये मिळाले, ना 6 हजार रुपये मिळाले, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.  राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक परिस्थितीवरून नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघात केला. ''लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, प्रत्येकाच्या खात्यात  6 हजार रुपये जमा केले जातील. त्याआधी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्यात येतील, असेही आश्वासन दिले होते. मात्र मिळालं काय? मोदी जिथे कुठे जातात तिथे खोटं बोलतात.''असा घाणाघात राहुल गांधींनी केला. परदेशातील काळा पैसा परत आणू. तिथे एवढा काळा पैसा आहे की प्रत्येक देशवासीयाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करता येतील, असे 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने सांगितले होते. भाजपाच्या याच आश्वासनावरून काँग्रेसने भाजपाला वारंवार घेरले आहे. दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात प्रतिवर्षी 6 हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. भाजपाच्या याच घोषणांवरून राहुल गांधी यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. तसेच मोदींवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. ''नरेंद्र मोदी हे प्रचारावेळी जनतेचे लक्ष्य मूळ मुद्यांवरून भरकटवण्याचे काम करतात. ते कधी चंद्राची गोष्ट सांगतात. कधी 370 वर बोलतात. कधी कॉर्बेट पार्कमध्ये पिक्चर बनवतात. पण जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर मोदी एक शब्दही बोलत नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाyavatmal-acयवतमाळ