शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

कमी दाबाची वीज उठली शेतकऱ्यांच्या जीवावर

By admin | Updated: October 12, 2014 23:38 IST

अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे मेटाकुटीस आलेला बळीराजा विविध उपाय करत सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विद्युत कंपनीच्या धोरणाचा फटका त्यांना अजूनही सहन करावा लागत आहे

पांडुरंग भोयर ल्ल सोनखासअस्मानी आणि सुलतानी संकटामुळे मेटाकुटीस आलेला बळीराजा विविध उपाय करत सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विद्युत कंपनीच्या धोरणाचा फटका त्यांना अजूनही सहन करावा लागत आहे. सध्या खरिपाच्या पिकाला पाण्याची गरज आहे. मात्र कमी दाबाची वीज असल्याने मोटरपंप सुरू होत नाही तर काही ठिकाणच्या मोटारी जळल्या आहेत. एकूणच हा प्रकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मात्र केबीनमध्ये बसून कारभार चालवित असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर पडत आहे.उशिराचा पाऊस, दुबार-तिबार पेरणी आदी कारणांमुळे परिसरातील शेतकरी हैराण झाला आहे. पुढे झालेल्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन आदी पिके कशीबशी जगली. आता तीव्र उन्हामुळे जमिनी कडक आल्या आहेत. त्यामुळे पिके सुकू लागली आहे. अशा स्थितीत या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, ते आटापिटा करून ही पिके जगविण्याचा प्रयत्न करत असतानाच कमी दाबाची वीज या प्रयत्नात आड येत आहे.परिसरात अतिशय कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे मोटरपंप सुरूच होत नाही, झाल्या तरी जळतात. या परिसराला मालखेड(खु) फिडरवरून वीज पुरवठा होतो. उत्तरवाढोणा, सोनवाढोणा, सोनखास, हेटी आदी भागांना या कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा तडाखा बसत आहे. थ्री फेजवर चालणारी उपकरणे पूर्णत: निकामी होत असून जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. मोटरपंप जळत असल्याने शेतकरी आपल्या पिकाला पाणी देवू शकत नाही. त्यामुळे पिके वाळण्याची भीती आहे. आर्थिक अडचणींमुळे जळालेल्या मोटारी दुरुस्त करण्याची सोयही अनेकांकडे नाही. त्यामुळे डोळ्यासमोर वाळणाऱ्या पिकांकडे पाहून शेतकऱ्यांच्या हृदयात धस्स होत आहे. विद्युत कंपनीचे अधिकारी मात्र यावर कुठलाही उपाय शोधण्यास तयार नसल्याने नागरिकांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे. या संतापाचा उद्रेक केव्हाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.