शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर आता पुराची धास्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 11:21 IST

Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील अडाण नदी, बेंबळा नदी, वर्धा नदी, अरुणावती, पैनगंगा, अडाण-पैनगंगा संगम, पूस नदी आणि स्थानिक नाल्यांमुळे पूरपरिस्थिती उद्भवते. यामधून नदीकाठची गावे आणि घरे दरवर्षी बाधित होतात.

ठळक मुद्दे१८ गावे अतिसंवेदनशील४७ गावांना पुराचा धोका, प्रशासन अलर्ट

 

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : जिल्ह्यामधील सात प्रमुख नद्या आणि त्यांची पात्रे पूरपरिस्थिती निर्माण करण्यासाठी दरवर्षी कारणीभूत ठरतात. यातून १८ गावे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तर ४७ गावांना प्रशासनाने पुराचा धोका असल्याच्या सूचना दिल्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील अडाण नदी, बेंबळा नदी, वर्धा नदी, अरुणावती, पैनगंगा, अडाण-पैनगंगा संगम, पूस नदी आणि स्थानिक नाल्यांमुळे पूरपरिस्थिती उद्भवते. यामधून नदीकाठची गावे आणि घरे दरवर्षी बाधित होतात. पूर आल्यानंतर संबंधितांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येते. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना अद्यापही झालेल्या नाहीत.

या पूरपरिस्थितीमुळे नागरिकांना दरवर्षी लाखो रुपयांच्या संपत्तीच्या नासधुशीचा सामना करावा लागतो. तर अनेकवेळेस शेतातील सुपीक माती पुरामुळे वाहून जाते. याठिकाणी जमिनीवरचा खडक उघडा पडतो. आता कायमस्वरूपी उपाययोजना केल्या तरच होणारे नुकसान थांबविता येणार आहे. यापूर्वीच उपाययोजना झाल्या असत्या तर प्रशासनाचा लाखोंचा खर्च वाचला असता.

अग्नीशमन दल सज्ज

- पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्नीशमन यंत्रणेचेही युद्ध पातळीवर मदत घेतली जाते.

- जिल्ह्यामध्ये १६ तालुक्यांमध्ये अग्नीशमन दलाची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. १६ तालुक्यात यंत्रणेसह प्रशिक्षित कर्मचारी काम पाहात आहेत.

- जिल्ह्यामध्ये १६० अग्नीशमन दलातील कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना आपात्कालीन परिस्थितीत काम करण्याच्याही सूचना आहेत.

शहरातील धोकादायक इमारती, धोकादायक झाडे

१ - यवतमाळ शहरामध्ये धोकादायक इमारतींची संख्या मोठी असली तरी सर्वेक्षणातून केवळ दोन इमारती पुढे आल्या आहेत.

२ - रस्ता रूंदीकरणाच्या कामात अनेक वृक्ष जमिनदोस्त झाली आहेत, तर काही ठिकाणी वृक्षांची बुंदे पेटविली जात आहेत.

३ - पावसाळ्यापूर्वी वीज वितरण कंपनीने वृक्ष कटाईचे काम हाती घेतले आहे. यानंतरही शेकडो वृक्षांच्या फांद्या वीज पोलावर पाहायला मिळत आहेत.

पूरबाधित क्षेत्र

जिल्ह्यामधील पूरबाधित क्षेत्रामध्ये तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आहेत. नैसर्गिक आपत्ती विभागाने अशा भागांचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. यानंतरही पुनर्वसनासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली नाही. यामुळे पूरबाधित क्षेत्रामध्ये दर पावसाळ्याला उपाययोजनांची गरज निदर्शनास येते. दिग्रसमध्ये अशा स्वरूपाचे पुनर्वसन रखडलेले आहे.

टॅग्स :floodपूर