शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर आता पुराची धास्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 11:21 IST

Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील अडाण नदी, बेंबळा नदी, वर्धा नदी, अरुणावती, पैनगंगा, अडाण-पैनगंगा संगम, पूस नदी आणि स्थानिक नाल्यांमुळे पूरपरिस्थिती उद्भवते. यामधून नदीकाठची गावे आणि घरे दरवर्षी बाधित होतात.

ठळक मुद्दे१८ गावे अतिसंवेदनशील४७ गावांना पुराचा धोका, प्रशासन अलर्ट

 

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : जिल्ह्यामधील सात प्रमुख नद्या आणि त्यांची पात्रे पूरपरिस्थिती निर्माण करण्यासाठी दरवर्षी कारणीभूत ठरतात. यातून १८ गावे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तर ४७ गावांना प्रशासनाने पुराचा धोका असल्याच्या सूचना दिल्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील अडाण नदी, बेंबळा नदी, वर्धा नदी, अरुणावती, पैनगंगा, अडाण-पैनगंगा संगम, पूस नदी आणि स्थानिक नाल्यांमुळे पूरपरिस्थिती उद्भवते. यामधून नदीकाठची गावे आणि घरे दरवर्षी बाधित होतात. पूर आल्यानंतर संबंधितांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येते. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना अद्यापही झालेल्या नाहीत.

या पूरपरिस्थितीमुळे नागरिकांना दरवर्षी लाखो रुपयांच्या संपत्तीच्या नासधुशीचा सामना करावा लागतो. तर अनेकवेळेस शेतातील सुपीक माती पुरामुळे वाहून जाते. याठिकाणी जमिनीवरचा खडक उघडा पडतो. आता कायमस्वरूपी उपाययोजना केल्या तरच होणारे नुकसान थांबविता येणार आहे. यापूर्वीच उपाययोजना झाल्या असत्या तर प्रशासनाचा लाखोंचा खर्च वाचला असता.

अग्नीशमन दल सज्ज

- पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्नीशमन यंत्रणेचेही युद्ध पातळीवर मदत घेतली जाते.

- जिल्ह्यामध्ये १६ तालुक्यांमध्ये अग्नीशमन दलाची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. १६ तालुक्यात यंत्रणेसह प्रशिक्षित कर्मचारी काम पाहात आहेत.

- जिल्ह्यामध्ये १६० अग्नीशमन दलातील कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना आपात्कालीन परिस्थितीत काम करण्याच्याही सूचना आहेत.

शहरातील धोकादायक इमारती, धोकादायक झाडे

१ - यवतमाळ शहरामध्ये धोकादायक इमारतींची संख्या मोठी असली तरी सर्वेक्षणातून केवळ दोन इमारती पुढे आल्या आहेत.

२ - रस्ता रूंदीकरणाच्या कामात अनेक वृक्ष जमिनदोस्त झाली आहेत, तर काही ठिकाणी वृक्षांची बुंदे पेटविली जात आहेत.

३ - पावसाळ्यापूर्वी वीज वितरण कंपनीने वृक्ष कटाईचे काम हाती घेतले आहे. यानंतरही शेकडो वृक्षांच्या फांद्या वीज पोलावर पाहायला मिळत आहेत.

पूरबाधित क्षेत्र

जिल्ह्यामधील पूरबाधित क्षेत्रामध्ये तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आहेत. नैसर्गिक आपत्ती विभागाने अशा भागांचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. यानंतरही पुनर्वसनासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली नाही. यामुळे पूरबाधित क्षेत्रामध्ये दर पावसाळ्याला उपाययोजनांची गरज निदर्शनास येते. दिग्रसमध्ये अशा स्वरूपाचे पुनर्वसन रखडलेले आहे.

टॅग्स :floodपूर