शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर आता पुराची धास्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 11:21 IST

Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील अडाण नदी, बेंबळा नदी, वर्धा नदी, अरुणावती, पैनगंगा, अडाण-पैनगंगा संगम, पूस नदी आणि स्थानिक नाल्यांमुळे पूरपरिस्थिती उद्भवते. यामधून नदीकाठची गावे आणि घरे दरवर्षी बाधित होतात.

ठळक मुद्दे१८ गावे अतिसंवेदनशील४७ गावांना पुराचा धोका, प्रशासन अलर्ट

 

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : जिल्ह्यामधील सात प्रमुख नद्या आणि त्यांची पात्रे पूरपरिस्थिती निर्माण करण्यासाठी दरवर्षी कारणीभूत ठरतात. यातून १८ गावे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तर ४७ गावांना प्रशासनाने पुराचा धोका असल्याच्या सूचना दिल्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील अडाण नदी, बेंबळा नदी, वर्धा नदी, अरुणावती, पैनगंगा, अडाण-पैनगंगा संगम, पूस नदी आणि स्थानिक नाल्यांमुळे पूरपरिस्थिती उद्भवते. यामधून नदीकाठची गावे आणि घरे दरवर्षी बाधित होतात. पूर आल्यानंतर संबंधितांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येते. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना अद्यापही झालेल्या नाहीत.

या पूरपरिस्थितीमुळे नागरिकांना दरवर्षी लाखो रुपयांच्या संपत्तीच्या नासधुशीचा सामना करावा लागतो. तर अनेकवेळेस शेतातील सुपीक माती पुरामुळे वाहून जाते. याठिकाणी जमिनीवरचा खडक उघडा पडतो. आता कायमस्वरूपी उपाययोजना केल्या तरच होणारे नुकसान थांबविता येणार आहे. यापूर्वीच उपाययोजना झाल्या असत्या तर प्रशासनाचा लाखोंचा खर्च वाचला असता.

अग्नीशमन दल सज्ज

- पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्नीशमन यंत्रणेचेही युद्ध पातळीवर मदत घेतली जाते.

- जिल्ह्यामध्ये १६ तालुक्यांमध्ये अग्नीशमन दलाची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. १६ तालुक्यात यंत्रणेसह प्रशिक्षित कर्मचारी काम पाहात आहेत.

- जिल्ह्यामध्ये १६० अग्नीशमन दलातील कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना आपात्कालीन परिस्थितीत काम करण्याच्याही सूचना आहेत.

शहरातील धोकादायक इमारती, धोकादायक झाडे

१ - यवतमाळ शहरामध्ये धोकादायक इमारतींची संख्या मोठी असली तरी सर्वेक्षणातून केवळ दोन इमारती पुढे आल्या आहेत.

२ - रस्ता रूंदीकरणाच्या कामात अनेक वृक्ष जमिनदोस्त झाली आहेत, तर काही ठिकाणी वृक्षांची बुंदे पेटविली जात आहेत.

३ - पावसाळ्यापूर्वी वीज वितरण कंपनीने वृक्ष कटाईचे काम हाती घेतले आहे. यानंतरही शेकडो वृक्षांच्या फांद्या वीज पोलावर पाहायला मिळत आहेत.

पूरबाधित क्षेत्र

जिल्ह्यामधील पूरबाधित क्षेत्रामध्ये तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आहेत. नैसर्गिक आपत्ती विभागाने अशा भागांचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. यानंतरही पुनर्वसनासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली नाही. यामुळे पूरबाधित क्षेत्रामध्ये दर पावसाळ्याला उपाययोजनांची गरज निदर्शनास येते. दिग्रसमध्ये अशा स्वरूपाचे पुनर्वसन रखडलेले आहे.

टॅग्स :floodपूर