शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

यवतमाळ जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे गावेच्या गावे झाली किडनीरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:01 AM

फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे शंभराहून अधिक बळी गेलेले असताना यंदा तीव्र टंचाईत भूगर्भातील दूषित पाणी पिल्याने गावेच्या गावे किडनी रुग्ण बनले आहेत.

ठळक मुद्देकिडनी आजाराचे थैमान रोज ५० रुग्णांची डायलिसिससाठी अमरावतीकडे धाव

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नापिकी, फवारणीतील विषबाधा या कारणांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मरण गाजले. आता याच जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर पाणी पिल्याने मरत आहेत. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे शंभराहून अधिक बळी गेलेले असताना यंदा तीव्र टंचाईत भूगर्भातील दूषित पाणी पिल्याने गावेच्या गावे किडनी रुग्ण बनले आहेत. येथून दररोज ५० रुग्ण केवळ डायलिसीससाठी अमरावतीला जात आहेत. तर तेवढेच रुग्ण तपासणीसाठी धाव घेत आहेत.जिल्ह्यातील ४५२ गावांमधील पाण्याचे स्त्रोत फ्लोराईडयुक्त असल्याची शासकीय आकडेवारी आहे. प्रत्यक्षात हजारो गावे दूषित पाणी पिउन जगत आहेत आणि हळूहळू किडनी खराब होऊन मरणाकडे वाटचाल करीत आहेत. एकेका कुटुंबात किडनीचे तीन-तीन रुग्ण आढळत आहेत. उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. जमिनीच्या पोटात खोल-खोल विंधनविहिरी खोदून पाणी उपसले जात आहे. जेवढ्या खोलातून पाणी काढले, ते तेवढेच जास्त दूषित. त्यातूनच यवतमाळसह घाटंजी, पांढरकवडा, झरीजामणी, उमरखेड, दिग्रस, नेर, दारव्हा या तालुक्यांमधील खेड्यांत सध्या किडनीच्या रुग्णांचे प्रमाण दरदिवशी वाढत आहे. वसंतनगर, चोपण, मारेगाव, खैरगाव, आंबेझरी, आमडी, जरंग, साखरा, मुरली आदी खेड्यांमध्ये गंभीर स्थिती आहे. आसोला गावात तर किडनीच्या आजाराने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुरली गावात गेल्या दहा वर्षात ५० जण दगावल्याचे सांगितले जाते.

बंदी असलेली गोळी किराणा दुकानातदूषित पाण्याने किडनीचे रुग्ण वाढत असताना यवतमाळात डायलिसीसची सुविधाच नाही. ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजूरच दूषित पाण्याचे बळी ठरत आहेत. त्यामुळे शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने नुकतेच अमरावती येथील किडनी विकार तज्ज्ञ डॉ. अविनाश चौधरी यांचे शिबिर आसोला गावात घेतले. त्यावेळी डॉ. चौधरी म्हणाले, माझ्या ओपीडीमध्ये दररोज यवतमाळ जिल्ह्यातून रुग्ण येत आहेत.५० जण तर डायलिसीससाठीच येत आहेत. रोज बोलेरो गाडी भरून रुग्ण येत आहेत. विशेष म्हणजे, शेतमजूर चक्क किरणा दुकानातून पेन किलर म्हणून निमोसुलाईड गोळी घेऊन खाताना आढळले. ही गोळी किडनीवर मारा करते. बंदी असलेली ही गोळी किराणा दुकानातून कशी मिळते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

‘नीरी’ने तपासावे पाणीज्या भागातील पाणीस्त्रोतांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण जास्त आहे तेथील पाण्याची तपासणी वर्षातून किमान दोन वेळा व्हायला पाहिजे. शेकडो खेड्यातील पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, स्टोरियम, आयरन, कार्बोनेट, सल्फेट यांचे प्रमाण जास्त आढळते. अशा ‘हार्ड वॉटर’ची तपासणी ‘नीरी’सारख्या संस्थेमार्फत होणे आवश्यक आहे. अधिक क्षारयुक्त पाणी हे किडनी आजाराचे मूळ कारण आहे. तणनाशकातील ग्लायफासेट हे रसायन थेट जमिनीत जाऊन नंतर पाणी व खाद्यस्त्रोतांमध्ये मिसळले जातात. त्यामुळेही या आजाराची शक्यता वाढते. वारंवार लघवी येणे, कंबर दुखणे, मीठ खावेसे वाटणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य