शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

दहावीची परीक्षा रद्द झाली तरी सतत अभ्यास करीतच राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 05:00 IST

दहावीची परीक्षा जूनमध्ये घेणार म्हणून सरकारने सुरुवातीला जाहीर केले. मात्र, नंतर अचानक एप्रिलच्या मध्यातच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. कोरोना स्थितीचा अंदाज घेऊन शासनाला जूनमध्ये निर्णय घेता आला नसता का, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे विदर्भ विभागीय अध्यक्ष योगीराज अरसोड यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनो गाफील राहू नका : लाॅकडाऊनमधील मेहनत अकरावी - बारावीत उपयोगी पडणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदा दहावीच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या. मात्र, परीक्षा रद्द झाली म्हणून विद्यार्थी गाफील राहिल्यास येत्या काळात त्यांचा मोठा भ्रमनिरास होऊ शकतो. विविध स्तरावरील प्रवेश प्रक्रिया व अन्य स्पर्धा परीक्षांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी अजूनही अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. दहावीची परीक्षा जूनमध्ये घेणार म्हणून सरकारने सुरुवातीला जाहीर केले. मात्र, नंतर अचानक एप्रिलच्या मध्यातच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. कोरोना स्थितीचा अंदाज घेऊन शासनाला जूनमध्ये निर्णय घेता आला नसता का, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे विदर्भ विभागीय अध्यक्ष योगीराज अरसोड यांनी उपस्थित केला. गुणसुधार परीक्षा होणारचशालेय अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणपत्रिका दिली जाणार आहे. मात्र, जे विद्यार्थी याबाबत संतुष्ट नसतील, त्यांना गुणसुधार परीक्षेची संधी देण्यात येणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा बोर्ड घेईलच. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी अभ्यास करून ठेवणे आवश्यक झाले आहे. जून-जुलैत परीक्षेच्या हालचालीकोरोनामुळे पुढील शैक्षणिक सत्र  वेळेवर सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर जून किंवा जुलैमध्ये परीक्षा घेण्याच्याही हालचाली सुरू आहेत. अशी परीक्षा झाल्यास आणि अनेक दिवस गाफील राहिलेल्या विद्यार्थ्यांची अडचण होऊ शकते.अकरावीसाठी प्रवेश परीक्षाविद्यार्थी जेव्हा अकरावीसाठी नामांकित महाविद्यालयात प्रवेश घ्यायला जाईल, तेव्हा साहजिकच कोरोनाचा फायदा घेऊन निव्वळ पुढे ढकललेल्या विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षा देऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. शिवाय प्रवेश परीक्षाही होण्याची शक्यता आहे. त्यासाठीही तयारी करावी लागणार आहे.  

हा शैक्षणिक भ्रष्टाचारचज्या विद्यार्थ्यांनी दिवसरात्र एक करून अभ्यास केला, त्यांचे परीक्षा देण्याचे स्वप्न एका क्षणात हवेत विरले. परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे हा शैक्षणिक भ्रष्टाचारच आहे, असे मत महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे विदर्भ विभागीय अध्यक्ष योगीराज अरसोड यांनी केली.

टॅग्स :ssc examदहावी