शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मित्रच ठरला शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

पूर्वी शेतशिवारात सर्पदंशाच्या घटना क्वचित घडत होत्या. आता सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. याला पीक पद्धती कारणीभूत ठरली आहे. कपाशीला पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची निवड केली. पेरणीनंतर शेतशिवार हिरव्या पिकाने झाकून जाते. त्यात अधिक पाऊस झाला तर संपूर्ण पीक दाटते. यामुळे जमिनीवर बेसावधपणे पाय पडला तर सर्पदंशाचा दाट धोका असतो.

ठळक मुद्देजिल्ह्यात ३३९ शेतकऱ्यांना सर्पदंश : गतवर्षी ५०१ शेतकºयांना चावला साप

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळ्यात शेतशिवार हिरवेकंच होते. यामुळे पायाखालची जमीनही दृष्टीस पडत नाही. अशा परिस्थितीत श्वापदांचा वावर वाढतो. पिकांमध्ये बिनधास्त फिरताना सर्पदंशाचा धोकाही वाढतो. दरवर्षी अशा शेकडो घटना घडतात. अलीकडे या घटना वाढत आहेत. जुलै ते सप्टेंबरमध्ये सर्पदंशाची अनेक प्रकरणे पुढे येतात. जिल्ह्यात सात महिन्यात ३३९ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद वैैैैैद्यकीय महाविद्यालयाने केली आहे.यामध्ये जुलै ते ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक सर्पदंशाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकºयांच्या पिकांचे संरक्षण करणारा साप शेतकºयांसाठीच कर्दनकाळ ठरला.यवतमाळ जिल्हा हा डोंगरांनी वेढला आहे. सह्याद्री पर्वतरांगेचे हे सर्वात शेवटचे टोक आहे. सापांना पोषक वातावरण या भागात आहे. यामुळे सापांच्या विविध दुर्मिळ प्रजाती या भागात पहायला मिळतात. सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. कारण तो शेतशिवारात उंदीर आणि इतर किड्यांना खातो. मात्र त्यावर पाय पडला तर तो शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरतो.पूर्वी शेतशिवारात सर्पदंशाच्या घटना क्वचित घडत होत्या. आता सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. याला पीक पद्धती कारणीभूत ठरली आहे. कपाशीला पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची निवड केली. पेरणीनंतर शेतशिवार हिरव्या पिकाने झाकून जाते. त्यात अधिक पाऊस झाला तर संपूर्ण पीक दाटते. यामुळे जमिनीवर बेसावधपणे पाय पडला तर सर्पदंशाचा दाट धोका असतो.जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर महिन्यात अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. या महिन्यात पीक जोमदार अवस्थेत असतात. पोषक वातावरणाने पीक जोमाने वाढतात. यामुळे जमीन दिसत नाही. फवारणी अथवा निंदण करण्यासाठी गेले तर अशा ठिकाणी दडून असलेला साप बाहेर पडतो. आपला पाय पडल्याने साप स्वत:चा जीव वाचविण्यासाठी प्रतीहल्ला चढवितो. यात शेतकरी, शेतमजूर जखमी होतात.अनेकवेळा साप चावल्यानंतर त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यापूर्वी मांत्रिकाकडे नेले जाते. काही जागृक शेतकरी सर्पदंश झालेल्या शेतकऱ्यांना दवाखान्याकडे नेतात. त्या ठिकाणी सर्पदंशावर उपचार केला जातो. यातून ९९ टक्के शेतकरी बरे होतात.शेतकऱ्यांना रखवालीसाठी अनेकवेळा रात्रीला जावे लागते. रात्री रखवाली करताना सर्पदंशाच्या घटना घडतात. तर वीज भारनियमनामुळे रात्रीच्या शेड्यूललाच पाणी येते. अशा परिस्थितीत शेतकरी रात्री शेतशिवारात असतात. या ठिकाणी सर्पदंशाच्या घटनेचा सामना करावा लागतो. यामुळे सर्पदंशाच्या संख्येत वारंवार भर पडत आहे.दवाखान्यापर्यंत येणारे रुग्ण वाचतातसाप चावल्यानंतर त्याला वैदूकडे न नेता दवाखान्यात आणले तर त्याचा प्राण वाचतो. याकरिता प्रथमोपचारही तत्काळ करता येतात. मात्र डॉक्टरांपर्यंत सर्पदंश झालेल्या व्यक्तीला पोहोचविले पाहिजे.

टॅग्स :snakeसापFarmerशेतकरी