शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

‘ जयकिसान ’ सुरू होण्याची आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:48 IST

माजी आमदार दिवंगत हरिश मानधना यांनी ‘जयकिसान’ची नोंदणी केली. श्यामराव बापू देशमुख, ॲड. शंकरराव राठोड, बाबू पाटील जैत, दिवंगत ...

माजी आमदार दिवंगत हरिश मानधना यांनी ‘जयकिसान’ची नोंदणी केली. श्यामराव बापू देशमुख, ॲड. शंकरराव राठोड, बाबू पाटील जैत, दिवंगत उत्तमराव शेळके, नामदेवराव पाटील, दिवंगत पूनमचंद सारडा, दादासाहेब देशकरी, सुखदेवराव भाकरे, अरुण जोहरापुरकर, सुभाष राठोड आदींच्या पुढाकारातून मे १९८९ मध्ये हा कारखाना सुरू झाला होता. ८८३० भाग धारकांसह ऊस उत्पादक शेतकरी व ४०० कर्मचारी आणि दीड हजारांवर कामगारांना यामुळे रोजीरोटी मिळत होती.

बॉक्स

दहा वर्षांत दहा लाख मेट्रिक टनाचे गाळप

प्रतीदिन अडीच हजार टन गाळप क्षमता असलेल्या जयकिसान साखर कारखान्याने १९९७ व १९९९ हे दोन वर्ष वगळता दहा वर्षांत एकूण नऊ लाख ८६ हजार ७११ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यानंतर दुष्काळी परिस्थितीमुळे क्षमते एवढा ऊस उपलब्ध न झाल्याने २००४ साली कारखाना बंद पडला. आता हा कारखाना भाडे तत्त्वावर देण्यात येणार असल्याची चर्चा असल्याने शेतकरी, कामगार सुखावला आहे.

बॉक्स

भाडे तत्त्वावर ही तीन हंगामात केले गाळप

साखर उताऱ्यात घट, क्षमता इतके गाळप न झाल्याने दीर्घ, मध्यम मुदतीच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरता आले नाही. त्यातच साखर साठा कोटा पद्धतीने विक्री होत असल्याने साखर पडून राहिली. अखेर २००६ मध्ये हा कारखाना अवसायनात काढण्यात आला. त्यानंतर वारणा सहकारी साखर कारखान्याने २००६ ते २०१२ या कालावधीसाठी तो भाडे तत्त्वावर घेतला. त्यांनी तीन गाळप हंगामही यशस्वी करून दाखविले.

कोट

कारखान्याची साईट फिजिबल आहे. कमी वाहतूक खर्चात ऊस उपलब्ध होऊ शकतो. आता तर सिंचनासह वाहतूक सुविधा वाढल्या आहेत. कारखाना पुन्हा सुरू झाल्यास तो व्यवस्थित चालेल. तसेच या भागाच्या विकासाला नव्याने गती मिळेल.

- बाबू पाटील जैत,

माजी अध्यक्ष, जयकिसान सहकारी साखर कारखाना

कोट

कारखाना सुरू झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. ऊस उत्पादन हे हमखास उत्पन्न देणारे पीक आहे. कारखाना सुरू करण्यासाठी सामूहिक प्रयत्न हवेत.

- सुभाष राठोड, शेतकरी, बोदेगाव

कोट

सध्या ऊस उत्पादन कमी झाले असले तरी कारखाना सुरू होणार असेल तर ऊस लागवड वाढेल. शेतकऱ्यांना उत्पन्न आणि बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो.

- निरंजन कुटे, शेतकरी, वरूड

कोट

कारखाना बंद पडल्याने हजारो कामगारांचा रोजगार गेला. यातील अनेकजण निवृत्तीच्या वाटेवर आहेत. कारखाना सुरू झाल्यास बाकी रक्कम मिळेल. रोजगारही वाढेल.

- रघुनाथ डहाके, उपाध्यक्ष, कामगार संघटना

कोट

कारखाना बंद पडल्याने कामगारांवर मोठे संकट कोसळले आहे. रोजगाराचे इतर साधन उपलब्ध नाही. त्यामुळे हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत.

- राजेंद्र गुल्हाने, सहा. अभियंता, कारखाना

110921\fb_img_1631344910767.jpg

१)कारखाना फोटो

२)सुभाष राठोड शेतकरी

३)निरंजन कुटे शेतकरी

४)रघुनाथ डहाके कर्मचारी

५)राजेंद्र गुल्हाने कर्मचारी

६)बाबुपाटील जैत माजी अध्यक्ष