शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

‘ जयकिसान ’ सुरू होण्याची आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:48 IST

माजी आमदार दिवंगत हरिश मानधना यांनी ‘जयकिसान’ची नोंदणी केली. श्यामराव बापू देशमुख, ॲड. शंकरराव राठोड, बाबू पाटील जैत, दिवंगत ...

माजी आमदार दिवंगत हरिश मानधना यांनी ‘जयकिसान’ची नोंदणी केली. श्यामराव बापू देशमुख, ॲड. शंकरराव राठोड, बाबू पाटील जैत, दिवंगत उत्तमराव शेळके, नामदेवराव पाटील, दिवंगत पूनमचंद सारडा, दादासाहेब देशकरी, सुखदेवराव भाकरे, अरुण जोहरापुरकर, सुभाष राठोड आदींच्या पुढाकारातून मे १९८९ मध्ये हा कारखाना सुरू झाला होता. ८८३० भाग धारकांसह ऊस उत्पादक शेतकरी व ४०० कर्मचारी आणि दीड हजारांवर कामगारांना यामुळे रोजीरोटी मिळत होती.

बॉक्स

दहा वर्षांत दहा लाख मेट्रिक टनाचे गाळप

प्रतीदिन अडीच हजार टन गाळप क्षमता असलेल्या जयकिसान साखर कारखान्याने १९९७ व १९९९ हे दोन वर्ष वगळता दहा वर्षांत एकूण नऊ लाख ८६ हजार ७११ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यानंतर दुष्काळी परिस्थितीमुळे क्षमते एवढा ऊस उपलब्ध न झाल्याने २००४ साली कारखाना बंद पडला. आता हा कारखाना भाडे तत्त्वावर देण्यात येणार असल्याची चर्चा असल्याने शेतकरी, कामगार सुखावला आहे.

बॉक्स

भाडे तत्त्वावर ही तीन हंगामात केले गाळप

साखर उताऱ्यात घट, क्षमता इतके गाळप न झाल्याने दीर्घ, मध्यम मुदतीच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरता आले नाही. त्यातच साखर साठा कोटा पद्धतीने विक्री होत असल्याने साखर पडून राहिली. अखेर २००६ मध्ये हा कारखाना अवसायनात काढण्यात आला. त्यानंतर वारणा सहकारी साखर कारखान्याने २००६ ते २०१२ या कालावधीसाठी तो भाडे तत्त्वावर घेतला. त्यांनी तीन गाळप हंगामही यशस्वी करून दाखविले.

कोट

कारखान्याची साईट फिजिबल आहे. कमी वाहतूक खर्चात ऊस उपलब्ध होऊ शकतो. आता तर सिंचनासह वाहतूक सुविधा वाढल्या आहेत. कारखाना पुन्हा सुरू झाल्यास तो व्यवस्थित चालेल. तसेच या भागाच्या विकासाला नव्याने गती मिळेल.

- बाबू पाटील जैत,

माजी अध्यक्ष, जयकिसान सहकारी साखर कारखाना

कोट

कारखाना सुरू झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. ऊस उत्पादन हे हमखास उत्पन्न देणारे पीक आहे. कारखाना सुरू करण्यासाठी सामूहिक प्रयत्न हवेत.

- सुभाष राठोड, शेतकरी, बोदेगाव

कोट

सध्या ऊस उत्पादन कमी झाले असले तरी कारखाना सुरू होणार असेल तर ऊस लागवड वाढेल. शेतकऱ्यांना उत्पन्न आणि बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो.

- निरंजन कुटे, शेतकरी, वरूड

कोट

कारखाना बंद पडल्याने हजारो कामगारांचा रोजगार गेला. यातील अनेकजण निवृत्तीच्या वाटेवर आहेत. कारखाना सुरू झाल्यास बाकी रक्कम मिळेल. रोजगारही वाढेल.

- रघुनाथ डहाके, उपाध्यक्ष, कामगार संघटना

कोट

कारखाना बंद पडल्याने कामगारांवर मोठे संकट कोसळले आहे. रोजगाराचे इतर साधन उपलब्ध नाही. त्यामुळे हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत.

- राजेंद्र गुल्हाने, सहा. अभियंता, कारखाना

110921\fb_img_1631344910767.jpg

१)कारखाना फोटो

२)सुभाष राठोड शेतकरी

३)निरंजन कुटे शेतकरी

४)रघुनाथ डहाके कर्मचारी

५)राजेंद्र गुल्हाने कर्मचारी

६)बाबुपाटील जैत माजी अध्यक्ष