शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल मिळाले सुविधा मात्र नाही

By admin | Updated: August 19, 2015 02:43 IST

नगरपरिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक १ मधील रेल्वे स्टेशन परिसरात ९२ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले.

मुकेश इंगोले दारव्हानगरपरिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक १ मधील रेल्वे स्टेशन परिसरात ९२ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले. परंतु संबंधित लाभार्थ्यांना अधिकृतपणे घरांचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक वर्षे कुडाच्या घरात राहुल वैतागलेल्या लोकांनी मिळेल ते घरकूल ताब्यात घेतले पण त्याठिकाणी सुविधा नसल्याने त्यांना मरणयातनाच भोगाव्या लागत आहेत. अनेक वर्षांनंतर या घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वीज, पाणी यासह अत्यावश्यक सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कुडाच्या घरातून सिमेंटच्या घरात राहायला गेल्यानंतरही या रहिवाशांना हाल सोसावे लागत आहे. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत दारव्हा शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, पेट्रोलपंपाजवळ आणि दत्त नगरमध्ये घरकुल योजना राबविण्याकरिता १० डिसेंबर २००८ मध्ये १० कोटी १५ लाख ३८ हजार रुपये मंजूर झाले होते. परंतु दोन भागात विरोध झाल्यामुळे त्याठिकाणचे काम रद्द करून काही निधी प्राप्त झाल्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात घरकूल बांधकामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या ठिकाणी मंजूर १३६ घरकुलांपैकी ९२ घरकुलांचे काम सुरू झाल्यानंतर या योजनेचे मॉडेल तयार करून तेथील रहिवाशांना सुंदर व सर्व सुविधायुक्त घरांचे स्वप्न दाखविण्यात आले. त्यावेळी इच्छा नसतांनाही लोकांनी आपली घरे खाली करून दिली. त्यानंतर त्यांची व्यवस्था तात्पुरत्या टिनाच्या शेडमध्ये करण्यात आली तर काहींनी कुडाचे घर तयार केले. २०११ मध्ये सुरु झालेल्या या कामाला मधल्या काळात काही कारणांमुळे बराच विलंब लागला. त्यामुळे टिनाचे शेड व कुडाच्या घरात राहणाऱ्यांनी प्रचंड हाल सोसले. ऊन, पाऊस, वाऱ्याचा मारा झेलला. अनेकदा वादळामुळे घरांचे नुकसान झाले. परंतु त्याही परिस्थितीत या लोकांनी दिवस काढले. जवळपास वर्षभरापूर्वी घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु घरकुलाचे वाटप होत नव्हते, त्यामुळे आधीच कुडाच्या घरात राहून वैतागलेल्या लोकांनी मिळेल ते घरकुल ताब्यात घेऊन त्यात आपला संसार मांडला. परंतु हालअपेष्टांनी तिथेही त्यांचा पिच्छा सोडला नाही. घरकुलाचे बांधकाम जरी पूर्ण झाले तरी त्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्यात आले नाही. पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्याचबरोबर इतर अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात न आल्याने गेल्या वर्षभरापासून घरकुलवासियांना अंधारात दिवस काढावे लागत आहे. पाण्याच्या टाक्या बऱ्याच दिवसांपासून नगरपरिषदेमध्ये पडून आहेत. परंतु त्या घरकुलावर बसविण्यात आल्या नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागते. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचवावे त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या याकरिता शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. दारव्हा शहरातसुद्धा याच उद्देशाने हा प्रकल्प मंजूर झाला होता. परंतु नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ही चांगली योजना बदनाम झाल्याचे बालले जात आहे.