शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

हायवेमुळे 350 गावांचे अर्थकारण बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

गत पाच वर्षांमध्ये यवतमाळ, बाभूळगाव, नेर आणि घाटंजी या तालुक्यांत १६४ किलोमीटरची कामे झाली आहेत. यामुळे गावांचा शहराशी संपर्क वाढला आहे. विशेष म्हणजे पूर्वीच्या तुलनेत वेळेत मोठी कपात झाली आहे. यानंतरही अनेक ठिकाणचे रस्ते अर्धवट आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी मोठे खाचखळगे आहेत. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गावाचा विकास आणि रस्त्यांचे जाळे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. अलीकडच्या काळात रस्ता बांधणीच्या कामाला गती आली आहे. यातून यवतमाळ विभागातील ३५० गावांचे अर्थकारण बदलले आहे. गत पाच वर्षांमध्ये यवतमाळ, बाभूळगाव, नेर आणि घाटंजी या तालुक्यांत १६४ किलोमीटरची कामे झाली आहेत. यामुळे गावांचा शहराशी संपर्क वाढला आहे. विशेष म्हणजे पूर्वीच्या तुलनेत वेळेत मोठी कपात झाली आहे. यानंतरही अनेक ठिकाणचे रस्ते अर्धवट आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी मोठे खाचखळगे आहेत. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे.

 पाच वर्षांत यवतमाळ विभागात १६४ किमीचे रस्ते 

- यवतमाळ, बाभूळगाव, नेर, घाटंजी या चार तालुक्यांमध्ये गत पाच वर्षांमध्ये १६४ किलोमीटरच्या रस्ता निर्मितीची कामे करण्यात आली आहे.- पाच वर्षांमध्ये चाैपदरीकरणात २० किलोमीटरची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केलेली आहे.- चार तालुक्यातील दुपदरी रस्ता निर्मितीच्या कामाला चांगलाच वेग आला होता. पाच वर्षांमध्ये याठिकाणी १४४ किलोमीटरची कामे झाली आहे.- यामध्ये रिद्धपूर-तिवसा, धामणगाव-यवतमाळ, बसस्थानक ते वनवासी मारूती हा चाैपदरीकरणाचा रस्ता पूर्ण करण्यात आला. तर घाटंजी-पारवा, घाटंजी-पिंपळखुटी, यवतमाळ-बाभूळगाव, अकोलाबाजार-पांढुर्णा, घाटंजी-शिवणी रस्त्याच्या निर्मितीचे काम करण्यात आले.

 यवतमाळ तालुक्याला सर्वाधिक लाभ

- यवतमाळ शहर जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची संख्या मोठी आहे. यामुळे तालुक्याच्या ठिकाणी सर्वाधिक रस्त्याची कामे झाली आहे.- जिल्ह्याशी संपर्क साधण्यासाठी प्रत्येकजण तत्पर आहे. यामुळे रस्त्याचा उपयोग व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी व्यावसायिकांकडून झाला आहे.

हायब्रीड ॲन्यूटीची कामे निधीअभावी रखडली

- बीओटी तत्त्वावर सार्वजनिक बांधकाम विभागाने हायब्रीड ॲन्यूटी प्रकल्प सुरू केला आहे. यातून काही कामे हाती घेण्यात आली. मात्र ही कामे मधातच अडखळली आहे. यातून महामार्गावर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दीड तासांचा वेळ आला २५ मिनिटांवरआर्णी मार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील नागरिकांना या रस्त्याचा चांगला उपयोग होत आहे. पूर्वी आर्णीवरून यवतमाळला येण्यासाठी दीड तास लागत होता. आता हा वेळ केवळ २५ ते ३० मिनिटांवर आला आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्ग