शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

हायवेमुळे 350 गावांचे अर्थकारण बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

गत पाच वर्षांमध्ये यवतमाळ, बाभूळगाव, नेर आणि घाटंजी या तालुक्यांत १६४ किलोमीटरची कामे झाली आहेत. यामुळे गावांचा शहराशी संपर्क वाढला आहे. विशेष म्हणजे पूर्वीच्या तुलनेत वेळेत मोठी कपात झाली आहे. यानंतरही अनेक ठिकाणचे रस्ते अर्धवट आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी मोठे खाचखळगे आहेत. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गावाचा विकास आणि रस्त्यांचे जाळे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. अलीकडच्या काळात रस्ता बांधणीच्या कामाला गती आली आहे. यातून यवतमाळ विभागातील ३५० गावांचे अर्थकारण बदलले आहे. गत पाच वर्षांमध्ये यवतमाळ, बाभूळगाव, नेर आणि घाटंजी या तालुक्यांत १६४ किलोमीटरची कामे झाली आहेत. यामुळे गावांचा शहराशी संपर्क वाढला आहे. विशेष म्हणजे पूर्वीच्या तुलनेत वेळेत मोठी कपात झाली आहे. यानंतरही अनेक ठिकाणचे रस्ते अर्धवट आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी मोठे खाचखळगे आहेत. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे.

 पाच वर्षांत यवतमाळ विभागात १६४ किमीचे रस्ते 

- यवतमाळ, बाभूळगाव, नेर, घाटंजी या चार तालुक्यांमध्ये गत पाच वर्षांमध्ये १६४ किलोमीटरच्या रस्ता निर्मितीची कामे करण्यात आली आहे.- पाच वर्षांमध्ये चाैपदरीकरणात २० किलोमीटरची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केलेली आहे.- चार तालुक्यातील दुपदरी रस्ता निर्मितीच्या कामाला चांगलाच वेग आला होता. पाच वर्षांमध्ये याठिकाणी १४४ किलोमीटरची कामे झाली आहे.- यामध्ये रिद्धपूर-तिवसा, धामणगाव-यवतमाळ, बसस्थानक ते वनवासी मारूती हा चाैपदरीकरणाचा रस्ता पूर्ण करण्यात आला. तर घाटंजी-पारवा, घाटंजी-पिंपळखुटी, यवतमाळ-बाभूळगाव, अकोलाबाजार-पांढुर्णा, घाटंजी-शिवणी रस्त्याच्या निर्मितीचे काम करण्यात आले.

 यवतमाळ तालुक्याला सर्वाधिक लाभ

- यवतमाळ शहर जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची संख्या मोठी आहे. यामुळे तालुक्याच्या ठिकाणी सर्वाधिक रस्त्याची कामे झाली आहे.- जिल्ह्याशी संपर्क साधण्यासाठी प्रत्येकजण तत्पर आहे. यामुळे रस्त्याचा उपयोग व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी व्यावसायिकांकडून झाला आहे.

हायब्रीड ॲन्यूटीची कामे निधीअभावी रखडली

- बीओटी तत्त्वावर सार्वजनिक बांधकाम विभागाने हायब्रीड ॲन्यूटी प्रकल्प सुरू केला आहे. यातून काही कामे हाती घेण्यात आली. मात्र ही कामे मधातच अडखळली आहे. यातून महामार्गावर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दीड तासांचा वेळ आला २५ मिनिटांवरआर्णी मार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील नागरिकांना या रस्त्याचा चांगला उपयोग होत आहे. पूर्वी आर्णीवरून यवतमाळला येण्यासाठी दीड तास लागत होता. आता हा वेळ केवळ २५ ते ३० मिनिटांवर आला आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्ग