शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

टँकरची वारी सारफळीत लय भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 9:27 PM

येथून १४ कि.मी.वर असलेलं ७५० लोकसंख्येचं सारफळी गाव पाण्याच्या भीषण समस्येने होरपळून निघत आहे. नळ योजनेच्या विहिरीची पातळी खाली गेली. हातपंप कोरडे पडले. आता टँकरवर काम आलं आहे. दररोज २४ हजार लिटर पाणी या गावातील चार विहिरीत टाकले जाते.

ठळक मुद्देनागरिकांचा टाहो । विहिरींनी तळ गाठला, हातपंप कोरडे, प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : येथून १४ कि.मी.वर असलेलं ७५० लोकसंख्येचं सारफळी गाव पाण्याच्या भीषण समस्येने होरपळून निघत आहे. नळ योजनेच्या विहिरीची पातळी खाली गेली. हातपंप कोरडे पडले. आता टँकरवर काम आलं आहे. दररोज २४ हजार लिटर पाणी या गावातील चार विहिरीत टाकले जाते. गावात टँकर पोहोचते त्यावेळी विहिरीवर होणारी गर्दी जीवघेणी ठरते. पाणी मिळविण्यासाठी लोकांची मोठी धडपड सुरू होते. पाणी अपुरे पडत असल्याने टँकर वाढविण्याची मागणी सरपंच निर्मला कुंभेकर, उपसरपंच तेजस गावंडे यांनी केली आहे. या गावात कायमस्वरूपी उपाययोजनांचे अनेक प्रयोग फेल गेले. नाल्याशेजारी असलेल्या विहिरीचा पाझर तेवढा आधार आहे. याशिवाय बाभूळगाव तालुक्यातील घारफळ, दाभा, येरंडगाव, यावली, सुकळी, तरोडा, वाई, आलेगाव ही गावे संभाव्य पाणीटंचाईच्या यादीत आहे. पुढील काळात पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मुक्या जीवांची सेवासारफळी गावात मुक्या जीवांच्या पाण्याचा प्रश्नही भीषण आहे. गावशिवारातून वाहणारे ओढे कोरडे पडले आहे. अशावेळी जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. मात्र श्रीकांत वखरे यांनी ही सोय करून दिली आहे. गेली दोन वर्षांपासून ते जनावरांची तृष्णातृप्ती व्हावी यासाठी पाणी उपलब्ध करून देत असल्याचे उपसरपंच तेजस गावंडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई