शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, नदी-नाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 11:12 IST

यवतमाळ व गोंदिया जिल्ह्याच्या विविध भागांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे.

 

यवतमाळ / गोंदिया : यवतमाळ व गोंदिया जिल्ह्याच्या विविध भागांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यात सर्वाधिक ५४.३ मिमी पाऊस झाला असून, सर्वात कमी ४.५ मिमी पाऊस उमरखेडमध्ये नोंदविला आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ९ लाख ५८ हजार हेक्टर आहे. त्यातील ३ लाख ३८ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या होत्या. मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे या पेरण्यांना आता वेग आला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

गोंदिया जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८१ मिमी पावसाची नोंद झाली असून, गोंदिया, तिरोडा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव या चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तिरोडा आणि सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या पावसामुळे या तालुक्यातील काही मार्ग बंद झाले होते.

सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी - खोडशिवणी मार्गावरील पूल वाहून गेल्याने या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. तर बाम्हणी-दल्ली मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्गसुद्धा बंद झाला होता. चूलबंद नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठालगत असलेल्या गावांना याचा फटका बसला होता. जिल्ह्यात सर्वाधिक १५० मिमी पावसाची नोंद सडक अर्जुनी तर त्या पाठोपाठ १४० मिमी पावसाची नोंद तिरोडा तालुक्यात वेढ झाली होती.

दमदार पावसामुळे तिरोडा शहरातील काही वस्त्यांना पाण्याचा वेढा घातल्याचे चित्र होते. जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे. 

पुरात वाहून गेलेल्याचा मृतदेह सापडला

गडचिरोली जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने छोट्या नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यातच सोमवारी आरमोरी तालुक्यातील वसा येथे कोलांडी नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेलेला एक इसम वाहून गेला होता. मंगळवारी त्याचा मृतदेह सापडला. राजकुमार एकनाथ राऊत (वय ३८) असे त्या मृताचे नाव आहे. गडचिरोलीच्या ४ तालुक्यांत तिवृष्टीची नोंद झाली. 

वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस आर्वी तालुक्यात

जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील सहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. आर्वी येथे १७४.४ मि.मि., वाठोडा येथे १११ मि.मि., वाढोणा येथे १०३ मि.मि., विरूळ येथे १२८.३ मि.मि., रोहणा येथे १५४ मि.मि. तर खरांगणा येथे ६८.४ मि.मि. पाऊस रविवार झाला. जिल्ह्यात १४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची अतिवृष्टी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आर्वी तालुक्यात कुठेही जिवितहानी झाली नसली तरी ३५ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. आठ गोठे पडले आहे. वाठोडा, देऊळवाडा सांझातील ११० कुटूंबांच्या घरात पाणी घुसले होते. या पुरग्रस्त भागाला उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदारांनी भेट दिली. नदीकाठावरील १ हजार हेक्टर पिकाचे नुकसान आर्वी तालुक्यात झालेले आहे. जिल्ह्यातील सेलू, वर्धा, देवळी, आर्वी या तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. आर्वी तालुक्यातील ५४ गावातील २६५ कुटूंब बाधित झाले तर देवळी तालुक्यात २ गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. देवळी तालुक्यात तसेच आर्वी तालुक्यात अनेक ठिकाणी लहान पूल तसेच पुलालगतचा भराव वाहून गेल्याने वाहतुकही बंद पडली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरweatherहवामान