शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

पाच तालुक्यांना वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 05:00 IST

बाभूळगावमध्येही अवकाळी पाऊस बरसला. सोसाट्याच्या वाऱ्याने राज्य मार्गावरील वृक्ष उन्मळून पडले. दारव्हा आणि अमरावती मार्गावर हा प्रकार प्रामुख्याने पाहायला मिळाला. रहदारीला अडथळा निर्माण झाल्याने वाहनचालकांनी आपला मार्ग बदलवून दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळविली. मात्र दारव्हा आणि अमरावती मार्गावर वृक्ष आडवे पडल्याने शेतशिवारातून वाहनांना रस्ता काढावा लागला. या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी काही ठिकाणी पाऊस कोसळला. शुक्रवारी यवतमाळ, राळेगाव, नेर, दारव्हा आणि बाभूळगावमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यात शेतशिवारामध्ये काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूकही ठप्प झाली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणामध्ये अचानक बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जना होऊन पावसाला सुरुवात झाली. यवतमाळ शहरात बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. शहरातील बहुतांश भागामध्ये ही गारपीट पाहायला मिळाली. गारपिटीमुळे शहरालगतच्या शेतशिवारात नुकसान झाले. विशेष करून फूल उत्पादकांना याचा फटका बसला. यवतमाळसह राळेगाव, नेर, दारव्हा आणि बाभूळगावमध्येही अवकाळी पाऊस बरसला. सोसाट्याच्या वाऱ्याने राज्य मार्गावरील वृक्ष उन्मळून पडले. दारव्हा आणि अमरावती मार्गावर हा प्रकार प्रामुख्याने पाहायला मिळाला. रहदारीला अडथळा निर्माण झाल्याने वाहनचालकांनी आपला मार्ग बदलवून दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळविली. मात्र दारव्हा आणि अमरावती मार्गावर वृक्ष आडवे पडल्याने शेतशिवारातून वाहनांना रस्ता काढावा लागला. या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. गुरुवारी उमरखेड, पुसदमध्ये आणि महागावमध्ये जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी हाच पाऊस पाच तालुक्यामध्ये बरसला. अचानक आलेल्या या पावसाने यवतमाळ शहरातही नागरिकांची धांदल उडाली. दुकानाबाहेरील मालाचे नुकसान होवू नये यासाठी व्यापारी धावपळ करीत होते. पावसामुळे दारव्हा तालुक्यातील चाणी येथे टीनपत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

बोथबोडण, गहुली हेटीमध्ये उडाले टीनपत्रेशुक्रवारी सायंकाळी यवतमाळ शहरासह विविध ठिकाणी झालेल्या पावसाने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. गारपिटीसह झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसरीकडे माैजे बोथबोडण व गहुली हेटी येथील काही घरांचे टीनपत्रे उडून नुकसान झाले आहे. 

भूईमुग झाला ओला, तीळासह कांद्याच्या पिकातही साचले पाणीसध्या शेतशिवारामध्ये भुईमूग काढणीचे काम वेगात सुरू आहे. याच परिस्थितीत पाऊस बरसल्याने काढणी झालेला भुईमूग पुन्हा ओला झाला आहे. या सोबतच तीळ आणि कांदा हे पीकही शेतशिवारात उभे आहे. अवेळी आलेल्या या पावसाने शेतशिवारातील कामकाजाचे गणित बिघडविले आहे. भाजीपाला पिकांनाही या पावसाचा मोठा फटका बसला. गारपिटीने काही भागातील काढणीला आलेले सांभार आणि पालकाचे पीक वाया गेले. या सोबतच गावरान आंबा उशिरा येत असल्याने तो झाडावरच आहे. वादळी वाऱ्याने आंब्याची फळे गळून पडली. याचा गावरान आंबा उत्पादकाला मोठा फटका बसला. 

यवतमाळामध्ये गारपीटयवतमाळ शहरात शुक्रवारी रात्री गारपीट झाली. शहरातील संभाजीनगर, रंभाजीनगर, वैशालीनगर, वाघापूर, दर्डानगर, गांधी चाैक, माळीपुरा या भागामध्ये बोराच्या आकाराच्या गारा बरसल्या. गारा बरसू लागल्यानंतर चिमुकल्यांनी अंगणातील गारा वेचल्या. शुक्रवारी रात्री समाज माध्यमावरही गारांचे फोटो व्हायरल झाले होते. 

यवतमाळ : शुक्रवारी सकाळपासूनच यवतमाळ शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ च्या सुमारास वादळी वारे वाहू लागले. दारव्ह्याकडून ट्रकचालक पाऊस पडत असल्याची खबर घेऊन यवतमाळात आले. त्याच वेगाने शहरात पाऊसही येऊन धडकला. यवतमाळसह पाच तालुक्यांना या अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यवतमाळात गारपिटीसह पाऊस झाल्याने शहराच्या विविध भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.  

 

टॅग्स :Rainपाऊस