शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाची तिवसा येथे धाव

By admin | Updated: May 15, 2014 01:37 IST

यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे डायरियाचा उद्रेक झाला असून घराघरात रुग्ण दिसत आहे

पांडुरंग भोयर ल्ल सोनखास

यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे डायरियाचा उद्रेक झाला असून घराघरात रुग्ण दिसत आहे. अनेक रुग्णांवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच आरोग्य विभागात खळबळ उडाली. वरिष्ठ डॉक्टरांचे एक पथक आणि गटविकास अधिकारी तिवसा येथे बुधवारी सकाळीच पोहोचले. अस्वच्छतेमुळे तिवसा येथे डायरियाचा उद्रेक झाला असला तरी अद्यापही ग्रामपंचायत स्वच्छतेबाबत उदासीनच दिसत असून आज गावात स्वच्छतेची कोणतीही मोहीम हाती घेण्यात आली नाही. तिवसा येथे दूषित पाणी पिण्यात आल्याने डायरियाचा उद्रेक झाला. जवळपास ५० कुटुंबामध्ये जुलाब व अतिसाराचे रुग्ण आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात डायरियाची लागण होऊनही आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले होते. रुग्ण आपल्या परीने शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले आणि आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. बुधवारी सकाळीच आरोग्य विभागाची चमू तिवसा येथे दाखल झाली. डॉ.सुषमा खोडवे, डॉ. सरला सोनकर, डॉ.एम.पी. ढबाले, डॉ.ए.एम.जाधव, डॉ. पुष्पा येपुरे, डॉ.पी.बी. वानखेडे यांचे पथक तिवसा येथे दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ यवतमाळचे गटविकास अधिकारी घोंगडे आणि विस्तार अधिकारी सिकले तिवसा येथे पोहोचले.

आरोग्य विभागाच्या चमूने गावातील प्रत्येकाचे रक्तनमुने घेतले असून रुग्णांना सलाईन लावून औषधोपचारही केले आहे. दिवसभर आरोग्य विभागाची चमू तिवसा येथे तळ ठोकून होती. दरम्यान यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात १५ तर खासगी रुग्णालयात तीन रुग्ण उपचार घेत आहे. तिवसा येथे डायरियाची लागण होण्यामागचे मुख्य कारण अस्वच्छता आहे. परंतु ग्रामपंचायत दखल घ्यायला तयार नाही. आरोग्य चमू गावात असतानाही ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम मात्र हाती घेतली नाही. आजही गावात घाणीचे साम्राज्य दिसून आले. (वार्ताहर)