शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

दिल्लीत नफरत हरली, प्रेम जिंकले - गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 7:10 AM

गुलाम नबी आझाद । विदर्भातील काँग्रेसचे मंत्री, आमदारांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा

यवतमाळ : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह जवळपास संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारात उतरविले. हा राजकीय दबाव, सोबतच ईडी, एनआयएचाही दबाव असताना दिल्लीकरांनी भाजपला केवळ आठ आणि ‘आप’ला तब्बल ६२ जागा दिल्या. ‘नफरत हार गई, प्यार जित गया’ अशा शब्दात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे विश्लेषण केले.

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी येथे कार्यकर्ता मेळावा व काँग्रेसचे मंत्री, आमदारांचा सत्कार पार पडला. यावेळी आझाद बोलत होते. ते म्हणाले, भाजप सरकारने केवळ जाती-पातीचे राजकारण केले. मात्र,दिल्लीच्या जनतेने असे धार्मिक ध्रुवीकरण नाकारले. विशेष म्हणजे, दिल्लीत मुस्लीम लोकसंख्या कमी असून हिंदूच मोठ्या प्रमाणात आहेत. भाजपच्या जातीय राजकारणाला दिल्लीतील हिंदू मतदारांनीही झिडकारले. भाजपच्या काळात देशात २३ लाख उद्योग बंद झाले. महागाई १२.२ टक्के वाढली. वादग्रस्त कायदे करायचे आणि लोकांना विभाजित करून आपसात भांडत ठेवायचे, ही भाजपची नीती असल्याचे आझाद यांनी सांगितले.प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, खासदार बाळासाहेब धानोरकर, माजी खासदार विजय दर्डा, आदी उपस्थित होते.पक्ष संघटन मजबूत करण्याची गरज : विजय दर्डालोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, हा केवळ सत्कार समारंभ नसून हा संदेश आहे. जेव्हा - जेव्हा काँग्रेस संकटात होती, तेव्हा - तेव्हा गुलाम नबी आझाद पुढे सरसावले. त्यांनी विदर्भाचे नेतृत्व केले. इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी अशा सर्वांसोबत त्यांनी वाटचाल केली आहे. आज काँग्रेसच्या देशातील स्थितीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत जे आमदार निवडून आले, ते स्वत:च्या बळावर निवडून आले. मात्र, जे हरले, त्यांच्या पराभवाची जबाबदारी पक्षाची आहे. आता सर्व मतभेद बाजूला सारून पक्ष संघटना मजबूत करावी लागेल. 

टॅग्स :congressकाँग्रेसdelhi electionदिल्ली निवडणूकYavatmalयवतमाळ