शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

बोंडअळीच्या उद्रेकात सरकारी सापळे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:32 IST

शेतकरी कीड नियंत्रणासाठी फवारणी करताना विषबाधेचे बळी ठरत आहे. तरीही अळी रोखणारे फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. मागील वर्षी २१ शेतकरी, शेतमजुरांचा विषबाधेने मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देकृषी विभाग सुस्त : फवारणीतून दोघांना विषबाधा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी कीड नियंत्रणासाठी फवारणी करताना विषबाधेचे बळी ठरत आहे. तरीही अळी रोखणारे फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. मागील वर्षी २१ शेतकरी, शेतमजुरांचा विषबाधेने मृत्यू झाला होता. जुलै महिन्यात नऊ जणांना फवारणीतून विषबाधा झाल्याचा अहवाल ताजा असतानाच शनिवारी सायंकाळी आणखी दोन शेतकºयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.किसन सुखदेव देशपांडे (३६) रा.लिंगा बोरगाव ता.नेर, संदीप भिखू पवार (३६) रा.वाईबाजार ता.माहूर असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. कृषी विभागाने फवारणीसंदर्भात गावपातळीवर जनजागृती केल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात कृषी विभागाची यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नावाने कोट्यवधीचा निधी लाटणाऱ्या तंत्रज्ञांनीसुद्धा जुलै महिन्यातच आलेल्या अळीच्या नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना फोल ठरल्या आहेत. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस या दोन्ही प्रमुख पिकांवर कमी-अधिक प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी शेतकरी परंपरागत पद्धतीनेच फवारणी करत आहे. त्याला कृषी विभागाचे सहकार्य व मार्गदर्शन नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फवारणी विषबाधेने गंभीर झालेल्या शेतकºयांवर उपचार सुरू आहे. दोघांनाही अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले आहे. कृषी केंद्र चालकांच्या सल्ल्यानेच शेतकरी कीड नियंत्रणाचा प्रयत्न करत आहे. यातच काही प्रतिबंधित औषधी फवारणीतून शेतकºयांच्या जीवाला धोका आहे.गुणवत्ता पथक तडजोडीत व्यस्तस्थानिक कृषी कार्यालयाचे कामकाज कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालते. ठराविक कर्मचाऱ्यांना घेवून येथे तडजोडीचा व्यवहार चालतो. गुणवत्तेकडे दुर्लक्ष असल्याने या पथकाच्या एकूण कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत कार्यालय सुरू ठेवून नेमक्या कोणत्या फाईली काढल्या जातात, याची चर्चा कृषी वर्तुळात सुरू आहे.ना ट्रॅप मिळाले, ना किट मिळाल्या !कृषी विभाग क्रॉपसॅप योजने अंतर्गत ‘फेरोमन ट्रॅप’ गावामध्ये पुरविणार होता. प्रत्यक्षात हे ट्रॅप अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही. विशेष म्हणजे, फवारणी करताना वापरण्याच्या किटही शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या नाही. त्यासंदर्भात जाणीवजागृती करण्यात कृषी विभागाची यंत्रणा अपयशी ठरली आहे. शेतकरी आणि शेतमजूर किटविनाच फवारणी करताना पाहायला मिळत आहे. याचा फटका यावर्षी नऊ शेतकरी आणि शेतमजुरांना बसला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती