शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

बोंडअळीच्या उद्रेकात सरकारी सापळे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:32 IST

शेतकरी कीड नियंत्रणासाठी फवारणी करताना विषबाधेचे बळी ठरत आहे. तरीही अळी रोखणारे फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. मागील वर्षी २१ शेतकरी, शेतमजुरांचा विषबाधेने मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देकृषी विभाग सुस्त : फवारणीतून दोघांना विषबाधा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी कीड नियंत्रणासाठी फवारणी करताना विषबाधेचे बळी ठरत आहे. तरीही अळी रोखणारे फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. मागील वर्षी २१ शेतकरी, शेतमजुरांचा विषबाधेने मृत्यू झाला होता. जुलै महिन्यात नऊ जणांना फवारणीतून विषबाधा झाल्याचा अहवाल ताजा असतानाच शनिवारी सायंकाळी आणखी दोन शेतकºयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.किसन सुखदेव देशपांडे (३६) रा.लिंगा बोरगाव ता.नेर, संदीप भिखू पवार (३६) रा.वाईबाजार ता.माहूर असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. कृषी विभागाने फवारणीसंदर्भात गावपातळीवर जनजागृती केल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात कृषी विभागाची यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नावाने कोट्यवधीचा निधी लाटणाऱ्या तंत्रज्ञांनीसुद्धा जुलै महिन्यातच आलेल्या अळीच्या नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना फोल ठरल्या आहेत. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस या दोन्ही प्रमुख पिकांवर कमी-अधिक प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी शेतकरी परंपरागत पद्धतीनेच फवारणी करत आहे. त्याला कृषी विभागाचे सहकार्य व मार्गदर्शन नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फवारणी विषबाधेने गंभीर झालेल्या शेतकºयांवर उपचार सुरू आहे. दोघांनाही अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले आहे. कृषी केंद्र चालकांच्या सल्ल्यानेच शेतकरी कीड नियंत्रणाचा प्रयत्न करत आहे. यातच काही प्रतिबंधित औषधी फवारणीतून शेतकºयांच्या जीवाला धोका आहे.गुणवत्ता पथक तडजोडीत व्यस्तस्थानिक कृषी कार्यालयाचे कामकाज कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालते. ठराविक कर्मचाऱ्यांना घेवून येथे तडजोडीचा व्यवहार चालतो. गुणवत्तेकडे दुर्लक्ष असल्याने या पथकाच्या एकूण कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत कार्यालय सुरू ठेवून नेमक्या कोणत्या फाईली काढल्या जातात, याची चर्चा कृषी वर्तुळात सुरू आहे.ना ट्रॅप मिळाले, ना किट मिळाल्या !कृषी विभाग क्रॉपसॅप योजने अंतर्गत ‘फेरोमन ट्रॅप’ गावामध्ये पुरविणार होता. प्रत्यक्षात हे ट्रॅप अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही. विशेष म्हणजे, फवारणी करताना वापरण्याच्या किटही शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या नाही. त्यासंदर्भात जाणीवजागृती करण्यात कृषी विभागाची यंत्रणा अपयशी ठरली आहे. शेतकरी आणि शेतमजूर किटविनाच फवारणी करताना पाहायला मिळत आहे. याचा फटका यावर्षी नऊ शेतकरी आणि शेतमजुरांना बसला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती