शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता चौपदरीकरणात व्यवसाय चौपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:13 IST

‘दररोज तीन ते चार हजार रुपयांची विक्री व्हायची. आता ४०० ते ५०० रुपये धंदा होतो. त्यातून मजुरी गेल्यावर शंभर रुपये उरतात. कर्जबाजारी होण्याची वेळ आली.

ठळक मुद्देआर्णी मार्ग : खोदकामाने दुकानात जाणे कठीण, ग्राहकांनी फिरविली पाठ

ज्ञानेश्वर मुंदे ।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : ‘दररोज तीन ते चार हजार रुपयांची विक्री व्हायची. आता ४०० ते ५०० रुपये धंदा होतो. त्यातून मजुरी गेल्यावर शंभर रुपये उरतात. कर्जबाजारी होण्याची वेळ आली. सांगा आम्ही जगायचे कसे’, असा प्रातिनिधिक सवाल आर्णी मार्गावरील हॉटेल व्यावसायिक गोवर्धन गुल्हाने यांनी केला. गत सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या रस्ता चौपदरीकरणाने आर्णी मार्गावरील सर्व व्यवसाय चौपट झाले आहे. व्यावसायिक हातावर हात ठेवून कधी एकदा काम संपते, याची प्रतीक्षा करीत आहे.शहरातील आर्णी मार्ग म्हणजे प्रतिमार्केट होय. शहरातील मेनलाईनऐवढीच बाजारपेठ या रस्त्याने फुलली आहे. याभागातील अनेकजण लांब जाण्याऐवजी आर्णी मार्गावरूनच खरेदी करणे पसंत करतात. मात्र यवतमाळ शहरातील आर्णी मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. या रस्त्यामुळे शहराच्या सौंदर्यात निश्चितच भर पडणार आहे. परंतु सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या या बांधकामामुळे अनेकांचे धंदे चौपट झाले आहे. सुरुवातीला नालीसाठी खोदकाम झाले. पाच फुटाच्या नाल्या खोदण्यात आल्या. दुकानदारांनाही दुकानात जाता येत नव्हते. काही दिवस दुकान बंद ठेवावे लागले. त्यानंतर रस्त्याचे बांधकाम सुरू झाले. या रस्त्यावरून आता यवतमाळकर जाण्यासही टाळतात. वाहन कुठे ठेवावे, असा प्रश्न असतो. महिला ग्राहकांना तर या रस्त्यावरून दुकानात जाताही येत नाही.आर्णी नाका परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून फूल विक्रीचा व्यवसाय करणारे मुरलीधर शिंगोटे सांगत होते, रस्ता बंद झाला आणि ग्राहकी एकदम थंडावली. ग्राहकांना दुकानापर्यंत पोहोचता येत नाही. फूल घेण्यासाठी वृद्ध त्यातही महिला भाविक येतात. परंतु रस्त्याच्या बांधकामामुळे कुणीही येत नाही. ताजी फुले धुळीमुळे काळवंडतात. त्याचा आर्थिक फटका आम्हालाच सहन करावा लागतो, असे ते म्हणाले. एका किराणा व्यावसायिकाने आपबिती सांगितली. ते म्हणाले, आमच्याकडे दरमहाचे अनेक ग्राहक होते. परंतु आता वाहन येत नसल्याने विक्री ४० टक्क्यांवर आली आहे. स्टिल भांडी व्यावसायिक मोहन निलगुरकर म्हणाले, आमचे दुकान उघडे असते. परंतु खड्ड्यांमुळे कुणीही येत नाही. सध्या लग्नसराईचा सिजन आहे. परंतु ग्राहक येत नाही. रस्ता पुर्ण होईपर्यंत आमच्या व्यवसायाचे काही खरे नाही, असे ते म्हणाले.इंदिरा मार्केटमध्ये दुकानाला प्लास्टिकचे पडदेअमृत योजनेच्या पाईपलाईनसाठी इंदिरा गांधी मार्केटमध्ये खोदकाम करण्यात आले. या भागात प्रचंड धूळ झाली आहे. कापड व्यावसायिक या धुळीमुळे त्रस्त झाले आहे. कपड्यावर धूळ साचत असल्याने ग्राहक कापड जुने आहे का, असे विचारतात. यावर पर्याय म्हणून या व्यावसायिकांनी आपल्या दुकानांना प्लास्टिकचे पडदे लावले आहे. तसेच दर तासाला दुकानाची साफसफाई करावी लागते. खाद्यपदार्थ व्यावसायिक तर धुळीने पुरते वैतागले आहे.