शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

रस्ता चौपदरीकरणात व्यवसाय चौपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:13 IST

‘दररोज तीन ते चार हजार रुपयांची विक्री व्हायची. आता ४०० ते ५०० रुपये धंदा होतो. त्यातून मजुरी गेल्यावर शंभर रुपये उरतात. कर्जबाजारी होण्याची वेळ आली.

ठळक मुद्देआर्णी मार्ग : खोदकामाने दुकानात जाणे कठीण, ग्राहकांनी फिरविली पाठ

ज्ञानेश्वर मुंदे ।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : ‘दररोज तीन ते चार हजार रुपयांची विक्री व्हायची. आता ४०० ते ५०० रुपये धंदा होतो. त्यातून मजुरी गेल्यावर शंभर रुपये उरतात. कर्जबाजारी होण्याची वेळ आली. सांगा आम्ही जगायचे कसे’, असा प्रातिनिधिक सवाल आर्णी मार्गावरील हॉटेल व्यावसायिक गोवर्धन गुल्हाने यांनी केला. गत सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या रस्ता चौपदरीकरणाने आर्णी मार्गावरील सर्व व्यवसाय चौपट झाले आहे. व्यावसायिक हातावर हात ठेवून कधी एकदा काम संपते, याची प्रतीक्षा करीत आहे.शहरातील आर्णी मार्ग म्हणजे प्रतिमार्केट होय. शहरातील मेनलाईनऐवढीच बाजारपेठ या रस्त्याने फुलली आहे. याभागातील अनेकजण लांब जाण्याऐवजी आर्णी मार्गावरूनच खरेदी करणे पसंत करतात. मात्र यवतमाळ शहरातील आर्णी मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. या रस्त्यामुळे शहराच्या सौंदर्यात निश्चितच भर पडणार आहे. परंतु सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या या बांधकामामुळे अनेकांचे धंदे चौपट झाले आहे. सुरुवातीला नालीसाठी खोदकाम झाले. पाच फुटाच्या नाल्या खोदण्यात आल्या. दुकानदारांनाही दुकानात जाता येत नव्हते. काही दिवस दुकान बंद ठेवावे लागले. त्यानंतर रस्त्याचे बांधकाम सुरू झाले. या रस्त्यावरून आता यवतमाळकर जाण्यासही टाळतात. वाहन कुठे ठेवावे, असा प्रश्न असतो. महिला ग्राहकांना तर या रस्त्यावरून दुकानात जाताही येत नाही.आर्णी नाका परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून फूल विक्रीचा व्यवसाय करणारे मुरलीधर शिंगोटे सांगत होते, रस्ता बंद झाला आणि ग्राहकी एकदम थंडावली. ग्राहकांना दुकानापर्यंत पोहोचता येत नाही. फूल घेण्यासाठी वृद्ध त्यातही महिला भाविक येतात. परंतु रस्त्याच्या बांधकामामुळे कुणीही येत नाही. ताजी फुले धुळीमुळे काळवंडतात. त्याचा आर्थिक फटका आम्हालाच सहन करावा लागतो, असे ते म्हणाले. एका किराणा व्यावसायिकाने आपबिती सांगितली. ते म्हणाले, आमच्याकडे दरमहाचे अनेक ग्राहक होते. परंतु आता वाहन येत नसल्याने विक्री ४० टक्क्यांवर आली आहे. स्टिल भांडी व्यावसायिक मोहन निलगुरकर म्हणाले, आमचे दुकान उघडे असते. परंतु खड्ड्यांमुळे कुणीही येत नाही. सध्या लग्नसराईचा सिजन आहे. परंतु ग्राहक येत नाही. रस्ता पुर्ण होईपर्यंत आमच्या व्यवसायाचे काही खरे नाही, असे ते म्हणाले.इंदिरा मार्केटमध्ये दुकानाला प्लास्टिकचे पडदेअमृत योजनेच्या पाईपलाईनसाठी इंदिरा गांधी मार्केटमध्ये खोदकाम करण्यात आले. या भागात प्रचंड धूळ झाली आहे. कापड व्यावसायिक या धुळीमुळे त्रस्त झाले आहे. कपड्यावर धूळ साचत असल्याने ग्राहक कापड जुने आहे का, असे विचारतात. यावर पर्याय म्हणून या व्यावसायिकांनी आपल्या दुकानांना प्लास्टिकचे पडदे लावले आहे. तसेच दर तासाला दुकानाची साफसफाई करावी लागते. खाद्यपदार्थ व्यावसायिक तर धुळीने पुरते वैतागले आहे.