शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
4
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
5
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
6
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
7
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
8
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
9
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
10
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
11
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
12
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
13
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
14
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
15
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
16
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
17
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
18
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
19
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
20
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

अनेक जिल्ह्यात हळद, संत्रा पिकाचे मोठे नुकसान; अनिल देशमुख यांची सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 09:37 IST

माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हळद, संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना भरीव मदत सरकारने करावी अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली. अनिल देशमुख यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

शेतकऱ्यांचे प्रश्न असताना दुःखाची अशी गोष्ट आहे की, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे राज्याच्या बाहेर प्रचाराच्या दौऱ्यासाठी व्यस्त आहे. अतिवृष्टीच्या पुराने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र अजून सुद्धा त्या पुराची पैसे शेतकऱ्यांना व नागरिकांना मिळाले नाही याची सुद्धा नुकसान भरपाई या जिल्ह्यामध्ये देण्यात यावी, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. 

मराठवाडा व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते, मात्र कापसाला भाव मिळत नाही. कापसाची विदेशातून भारतामध्ये आयात करण्यात आले. आयात केल्याच्यानंतर ११ टक्के कॉटन ऑफ इंडिया असोसिएशनच्या दबावाखाली रद्द करण्यात आला. व्यापाराच्या फायद्यासाठी ११ टक्के आयात कमी करण्यात आला. त्यामुळे कापसाचे भाव कमी झाले कापसाची प्रदेशात निर्यात करण्यासाठी सरकार अपयशी ठरले, अशी टीका अनिल देशमुख यांनी केली. 

मागच्या वर्षी तरी आठ हजार रुपये कापसाला भाव मिळाला मात्र यावेळेस कापसाला भाव सात हजार रुपये आहे. उत्पादन खर्च जास्त आहे, त्याकडे सरकारचं लक्ष नाही कापसाला भाव नसल्याने अतिशय दुर्दैवी परिस्थिती शेतकऱ्यांची असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचारी जे एक महिन्यापासून उपोषण करत आहे त्याच्याकडे सुद्धा राज्य शासनाने लक्ष देण्याची गरज आहे कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने जिल्ह्यामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, असं अनिल देशमुख यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी