शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

सेना, काँग्रेसचा उमेदवार निश्चित, गवळी-राठोड यांचे मनोमीलन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 6:23 AM

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांची पाचवी टर्म चुकविण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र काँग्रेसला यावेळीसुद्धा अंतर्गत लाथाड्यांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

- राजेश निस्तानेयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांची पाचवी टर्म चुकविण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र काँग्रेसला यावेळीसुद्धा अंतर्गत लाथाड्यांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.२०१४ च्या निवडणुकीत शिवसेना एकसंघ होती, शिवाय मोदी लाटेचाही फायदा झाला. परंतु यावेळी खासदार भावना गवळी व महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यात वितुष्ट आल्याने शिवसेना दुभंगली. ‘मातोश्री’ने पुढाकार घेऊन या दोन्ही नेत्यांमध्ये नुकताच ‘समझोता’ घडवून आणला. मात्र तो किती यशस्वी होतो हे वेळच सांगेल.काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जाते. ते तब्बल २० वर्षांनंतर समोरच्या दाराने निवडणूक लढणार आहेत. प्रदेश संसदीय मंडळाने ठाकरेंचे एकमेव नाव दिल्लीत पाठविले. मात्र त्यानंतरही गतवेळच्या पराभूत उमेदवारासह चौघे अजूनही तिकिटासाठी जोर लावून आहेत. त्यांच्या सातत्याने मुंबई-दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. काँग्रेस व शिवसेनेकडून निश्चित झालेला मराठा उमेदवार, काँग्रेसमधील गटबाजी, शिवसेनेतही पडलेले गट, सामाजिक समीकरणे बघता बंजारा समाजाचा तिसरा पर्याय येथे प्रभावी ठरू शकतो.काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षात गटबाजी असली तरी सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार असल्याने लोकसभेत या गटबाजीचे तेवढे परिणाम दिसणार नाहीत, असे मानले जाते. संजय राठोड यांची समजूत काढून ‘मातोश्री’ने या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व आणि भावनातार्इंच्या विजयाची जबाबदारी राठोड यांच्याच खांद्यावर सोपविली आहे. तार्इंनीही ‘झाले गेले विसरून जा’ असे म्हणून नमते घेतले आहे. तरीही सेनेचा पराभव झाल्यास त्याचे बहुतांश खापर राठोड यांच्यावर फुटण्याची शक्यता आहे. मनोमिलन झाले मग सेना नवा चेहरा देणार याचा प्रचार पुन्हा कशासाठी, हा प्रश्न आहे. ते पाहता मनोमिलन केवळ देखावा तर नाही अशी शंका व्यक्त होत आहे.अशीच काहीशी स्थिती काँग्रेसमध्ये आहे. माणिकराव ठाकरेंचे नाव उमेदवारीसाठी गेल्याने काँग्रेसमधील ज्येष्ठ माजी मंत्र्यांचा गट नाराज आहे. मात्र समोर विधानसभा असल्याने माणिकरावांच्या विरोधात काम करून मराठा समाजाची नाराजी ओढवून घेणे हे माजी मंत्री व त्यांच्या पाठीराख्यांना परवडणारे नाही. या ज्येष्ठ माजी मंत्र्यांचे त्यांच्या समाजात खरोखरच किती ऐकले जाते, हे पाहणेही महत्वाचे ठरते. या लोकसभा मतदारसंघात सहापैकी चार भाजपाचे व एक सेनेचा आमदार असल्याने गवळींच्या विजयाची खरी जबाबदारी त्यांच्यावर आहे. गवळी पराभूत म्हणजे मोदींना नुकसान हे गणित डोळ्यापुढे ठेवण्याचे टार्गेट या आमदारांना भाजपाकडून दिले जाऊ शकते.सध्याची परिस्थितीवर्धा-यवतमाळ-नांदेड हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प संथगतीने सुरू आहे. यवतमाळ-मूर्तिजापूर या नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतराचीही चिन्हे दिसत नाहीत.‘मातोश्री’वरून सेनेच्या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन करण्यात आले असले तरी ते खरोखरच झाले का ? याचा पुरावा लोकसभेच्या मतमोजणीनंतरच मिळणार आहे.काँग्रेसची मदार दलित, अल्पसंख्यक, ओबीसी मतदारांवर आहे. मात्र येथे वंचित बहुजन आघाडी, बसपाचा उमेदवार किती चालतो, यावर काँग्रेसचे विजयाचे गणित अवलंबून आहे.जिल्ह्यात बंजारा समाज, आदिवासी समाज निर्णायक आहे. ना. संजय राठोड यांनी पोहरादेवीत दाखविलेली शक्ती मनोमिलनानंतर सेनेकडे वळते का, यावर सर्वांच्या नजरा आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस