शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

वृक्षतोडीने पुसद वनाचे वाळवंट होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 22:25 IST

नैसर्गिक संपदेने नटलेल्या पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. कधी काळी धनदाट असलेल्या जंगलातून जाताना भीती वाटायची. परंतु अलिकडे वृक्षतोड आणि विविध कारणाने जंगल विरळ होत चालले आहे.

ठळक मुद्देतापमानात वाढ : पर्यावरणप्रेमींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : नैसर्गिक संपदेने नटलेल्या पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. कधी काळी धनदाट असलेल्या जंगलातून जाताना भीती वाटायची. परंतु अलिकडे वृक्षतोड आणि विविध कारणाने जंगल विरळ होत चालले आहे. अशीच परिस्थिती रहिल्यास भविष्यात पुसद तालुक्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही.पुसद तालुक्यातील खंडाळा, धुंदी, शेंबाळपिंपरी, मांडवा, माणिकडोह, धनसळ, शिळोणा, खैरखेडा, हनवतखेडा ही जंगले एकेकाळी घनदाट होती. सद्यस्थितीत ही जंगले नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उंच डोंगरावरून बघितले तर पुसद शहराच्या परिसरातील घनदाट वृक्षराज पूर्वी दृष्टीस पडत होते. आज मात्र शहरातील वाढती वसाहत, वृक्षतोड, औद्योगिकरण आदींमुळे शहराचा संपूर्ण चेहरा-मोहरा बदलला आहे. वृक्षतोडीमुळे पुसदच्या तापमानानेही विक्रम केले आहे. पुसद परिसरातील वनराईने नटलेल्या पर्वतरांगा आज उजाड झाल्या आहे. उरलेल्या वनसंपदेवर कुºहाड चालविली जात आहे.डोंगराळ भागात राहणारे आदिवासी वृक्षांना देव मानून त्याचे रक्षण करीत होते. वनउपजावर आपली गुजरान करीत होते. परंतु संयुक्त वन व्यवस्थापनाच्या नावाखाली आदिवासींच्या परंपरागत वनउपजावरचा हक्क हिरावला गेला. परिणामी शतकानुशतके प्राणपणाने जंगल आणि वन्यजीवांचे रक्षण करण्याचा आदिवासींपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी जंगलाचे रक्षण करणे सोडून दिले. याच संधीचा फायदा तस्करांनी घेणे सुरु केले. स्थानिकांना हाताशी धरून तस्कर जंगलात शिरतात. सागवानासह आडजात वृक्षाची तोड करतात. या वृक्षतोडीमुळे पुसद तालुक्यातील पर्जन्यमानात घट होत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास निसर्गाचा हा अनमोल ठेवा नष्ट होण्याची भीती आहे.सद्यपरिस्थितीत पुसद शहर उष्णतेच्या लाटेमुळे होरपळून निघत आहे. दरवर्षी पुसदच्या तापमानात वाढ होत आहे. बास्केट इफेक्टचा परिणाम जाणवत आहे. मात्र मुख्य कारण म्हणजे पुसद परिसरातील नष्ट झालेली वनराई हीच आहे. पुसद शहरासह तालुक्याला पाणीटंचाईचे चटके जाणवत आहे. यासाठी वृक्षरोपण महत्वपूर्ण उपाय ठरू शकतो. परंतु वृक्षरोपनाचे काम होते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही.वृक्षांची कत्तल योजनाबद्धवृक्षाचे जतन करण्यासाठी शासनाने नियम केले आहे. इतकेच नव्हते तर या नियमांची अंमलबजावणी योग्य तºहेने व्हावी म्हणून वन विभागाची निर्मिती केली आहे. परंतु वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जबाबदारीची जाणीवच दिसत नाही. पुसद परिसरातील वृक्षाची कत्तल अतिशय योजनाबद्ध पद्धतीने सुरु आहे. या परिसरात मोजक्याच आरा मशीन आहे. तेथे फक्त दाखविण्यासाठी परवानगीचे काही लाकडे कटाईसाठी ठेवले जातात. परंतु वृक्षांचा बळी घेऊन अवैधपणे आरा मशीनवर कटाईचे प्रमाण कमी नाही. अगदी हजारो वृक्षांची कटाई अशाच पद्धतीने केली जात आहे.

टॅग्स :forestजंगल