शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 11:51 IST

गत १९ वर्षात जिल्ह्यात चार हजार ३२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्य शासनाने कर्जमाफी केल्यवरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात ६१३ शेतकरी आत्महत्येची नोंद शासन दप्तरी करण्यात आली.

ठळक मुद्देतीन वर्षात ६१३ आत्महत्या १९ वर्षांत चार हजार ३२६ आत्महत्यांची नोंद

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत १९ वर्षात जिल्ह्यात चार हजार ३२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्य शासनाने कर्जमाफी केल्यवरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात ६१३ शेतकरी आत्महत्येची नोंद शासन दप्तरी करण्यात आली.शेतकरी आत्महत्येची ८० कारणे समाजकार्य महाविद्यालयाच्या सर्वेक्षणातून पुढे आली. यात कर्जबाजारीपणा हे प्रमुख कारण आहे. आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना खर्चावर आधारीत दर देण्यात यावे, अशी शिफारस स्वामिनाथन आयोगानेही केली. या शिफारशीची अंमलबजावणी झाली नाही. आघाडी सरकारच्या काळात २००७ मध्ये केंद्र शासनाने आणि २००८ मध्ये राज्य शासनाने कर्जमाफी केली होती. युती शासनाने २०१७ मध्ये कर्जमाफी केली. या तीनही कर्जमाफीच्या उपाययोजना कुचकामी ठरल्या. शेतकरी आत्महत्या सतत सुरूच आहे. दर वाढीची मुख्य उपाययोजना न झाल्याने आत्महत्या कायम असल्याचे मत शेतकरी अभ्यासक नोंदवित आहे.२००० ते २०१९ या १९ वर्षांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात ४ हजार ३२६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. यातील १७०९ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या. तर २५७५ अपात्र ठरल्या. तर ४२ प्रकरणे चौकशीत आहेत. २०१७ मध्ये युती शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतक री सन्मान योजनेतून दीड लाखापर्यंत कर्जमाफी केली. यानंतरही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही. कर्जमाफीच्या घोषणेच्या काळात २४२ आत्महत्याची नोंद शासन दरबारी झाली आहे. २०१८ मध्ये २५५ शेतकरी आत्महत्या झाल्या. २०१९ मध्ये जुलैपर्यंत ११६ आत्महत्या झाल्या. युती शासन काळातील कर्जमाफी नंतरच्या तीन वर्षात ६१३ आत्महत्यांची नोंद झाली आहे. यामधील १६८ आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या आहेत. तर ४०३ आत्महत्या मदतीस अपात्र ठरल्या आहेत. तर ४२ आत्महत्या चौकशीत आहे.खर्चावर आधारीत दरच नाहीशेतमालास खर्चावर आधारीत दर मिळत नाही. लागवड खर्च अधिक ५० टक्के नफ्यासह भाव दिला तरच शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार आहे. यासोबतच शासकीय हमी केंद्राची संख्या वाढवावी लागणार आहे. शेती कसण्यासाठी मुबलक कर्ज, खत, बियाणे आणि औषधांवर अनुदानासह मजुरीसाठी रोजगार हमीतून मदत हवी आहे. ठोस उपाययोजनासह धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.सरसकट कर्ज माफ करादुष्काळी स्थितीने अनेक शेतकरी कर्जाच्या खाईत अडकले आहे. काही शेतकºयांकडे दीड लाखापेक्षा जास्त कर्ज आहे. काही शेतकरी ‘डेडलाईन’ने अडचणीत सापडले आहेत. यामुळे कर्जमाफीची व्याप्ती वाढवून सरसकट कर्ज माफी करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या