शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या संपाला व्यापाऱ्यांची साथ

By admin | Updated: June 6, 2017 01:25 IST

संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या या व इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला व्यापाऱ्यांनीही साथ दिली.

आर्णीत टायर जाळून रोखला रस्ता : नेरमध्ये संपूर्ण बाजारपेठ बंद, बाभूळगाव तहसीलदारांना निवेदन, राळेगावातही संताप व्यक्तलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या या व इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला व्यापाऱ्यांनीही साथ दिली. नेर, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, आर्णी येथील संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद होती. नेरमध्ये बंद कडकडीतनेर : ‘मी संपावर जातोय’ या शेतकरी आंदोलनाला शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. सर्व दुकाने दिवसभर कडकडीत बंद होती. दरम्यान, युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने रॅली काढण्यात आली. या माध्यमातून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले होते. रॅलीमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक भेंडे, गोपाल चव्हाण, संतोष अरसोड, निखिल जैत, उमेश गोळे, सतीश चव्हाण, गौरव नाईकर, हिम्मत देशमुख, सदानंद पेचे, सदाशिव गावंडे, पंजाबराव खोडके, शिवसेनेचे उमेश गोळे, प्रशांत मासाळ, राष्ट्रवादीचे सुनील खाडे यांच्यासह शेतकऱ्यांचा रॅलीमध्ये सहभाग होता.बाभूळगाव तहसीलवर मोर्चाबाभूळगाव : सरसकट कर्जमाफी मिळावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन तहसीलदार दिलीप झाडे यांना निवेदन सादर केले. शेतकरी संघर्ष समितीतर्फे काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदारांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल पाटील उपस्थित होते. यानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर दूध ओतून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर झालेल्या सभेत अनेकांची भाषणे झाली. दरम्यान, शहरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती.आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव घारफळकर, भैयासाहेब देशमुख, नरेंद्र कोंबे, डॉ. रमेश महापूर, नरेंद्र देशमुख, प्रकाशचंद तातेड, प्रवीण खेवले, नाना खांदवे, श्रीकांत कापसे, मुकेश देशमुख, अ‍ॅड. राजेंद्र कडुकार, अ‍ॅड. रणजित रंगारी, वसंत जाधव, लक्ष्मणराव आखरे, प्रभाकरराव गायकवाड, गजानन नाईकवाड, गजानन पांडे, बाबू पांडे, कृष्णा ढाले, विजय गोडे, आशीष सोळंकी, बल्लू जगताप, योगेश्वर मिश्रा, नंदू अडेकर, महादेव नेरकर, रमेश मोते, सुधीर कडुकार, भानुदास राऊत, उत्तम पाटील, यमूताई रूमाले, भानुदास ढोकणे, दीपक बरडे, प्रशांत वानखडे आदी सहभागी झाले होते. जवळा येथे बंद यशस्वीजवळा : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेवून आर्णी तालुक्यातील जवळा येथे बंद पाळण्यात आला. संपूर्ण बाजारपेठ बंद होती. या आंदोलनामध्ये रवी वंडे, तैयब खान, गणेश मोरे, वसराम जाधव, दिलीप नागपुरे, शेख रऊफ, बंडू नाकतोडे, शरद पुसदकर, पुष्कराज महल्ले, संदीप ढाकुलकार, गणेश दुर्गे, अशोक राऊत, संजय सुखदेव, सुभाष बांगर, बाबाराव खोडनकर, भारत कालबंडे, लक्ष्मणराव कोरटकर आदी सहभागी झाले होते.आर्णी येथे रास्ता रोकोआर्णी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येथे रास्ता रोको करण्यात आला. मेन रोडवर टायर जाळण्यात आले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले. मोर्चाला पाठिंबा देत शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सचिन येलगंधेवार, विशाल देशमुख, राहुल ढोरे, अतुल मुनगीनवार, शनी आडे, पवार आदी सहभागी झाले होते. राळेगावात भाजीपाला व दूध रस्त्यावर फेकलेराळेगाव : शेतकऱ्यांच्या बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. संपूर्ण बाजारपेठ बंद होती. भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी शासनाप्रती आपला संताप व्यक्त केला. यवतमाळ मार्गावर असलेल्या जिनिंग प्रेसिंग चौकात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धरणे देण्यात आले. २७ आंदोलकांना स्थानबध्द करण्यात आले. विविध घोषणा, नारे देऊन परिसर दणाणून सोडला.यावेळी अरविंद वाढोणकर, जानराव गिरी, अ‍ॅड.फिडेल बायदानी, अ‍ॅड.सीमा तेलंगे आदींची भाषणे झाली. नीलेश रोठे, सुरेश खुडसंगे, वसंत पोटफोडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद फुटाणे, नगरसेवक अप्सर अली, गजानन पाल, वसीम पठाण आदी २७ जणांना स्थानबद्ध करण्यात आले होते. कळंब तहसीलदारांना निवेदनकळंब : शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करा, स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतमालाला उत्पादनावर आधारित भाव आदी मागण्यांसाठी शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुपारी शेतकरी संघर्ष समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. शहरातील भाजी मार्केटसह संपूर्ण बाजारपेठ बंद होती. बसस्थानक ते तहसीलपर्यंत मोर्चा नेण्यात आला. शेतकरी संघर्ष समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी पंचायत समिती उपसभापती महादेव काळे, बाजार समितीचे संचालक योगेश धांदे, नगरसेवक राजू पड्डा, मुश्ताक शेख, अशोक उमरतकर, मधुकर गोहणे, अभी पांडे, सुधाकर झोटिंग, दिलीप नेहारे, ओमप्रकाश आचार्य, विजय बुरबुरे, मारोती वानखडे, सिध्देश्वर वाघमारे, प्रशांत महाजन, रमेश दाभेरे, विजय गेडाम, राजेश भोयर, मनिष चरडे, मधुकर लिल्लारे आदी उपस्थित होते.