शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

शेतकरी रस्त्यावर, कडकडीत बंद

By admin | Updated: June 6, 2017 01:21 IST

शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बंदला यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते.

यवतमाळात मुंडन : भाजीपाला, दूध, टरबूज फेकले, भांबराजा, अर्जुना, कोळंबीत चक्काजामलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बंदला यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. यवतमाळ शहरात शेतकऱ्यांनी सामूहिक मुंडन करून भाजीपाला आणि टरबूज रस्त्यावर फेकला. तालुक्यातील अर्जुना येथे शेतकऱ्यांनी सरकारचे सरण पेटवून प्रतिकात्मक निषेध केला. तर भांबराजा येथे करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाने वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कुठेही हिंसक वळण लागले नाही. यवतमाळ शहरात शेतकऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीच्या नेतृत्वात बंदचे आवाहन करण्यात आले होते. स्थानिक बसस्थानक चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करून आंदोलनाला प्रारंभ केला. आंदोलनकर्त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरासमोर घोषणा देत शासनाच्या धोरणाचा निषेध केला. त्यानंतर हुतात्मा चौकात शेतकऱ्यांनी मुंडन केले. यात कोळीचे सरपंच पांडुरंग मेश्राम, अशोक पवार, बाबाराव जाधव, सवाई जाधव, बळवंत खडतरे, ठाकूरसिंग राठोड, अनिल राठोड, हरीशचंद्र चव्हाण, भगवान सिडाम, गजानन सोनटक्के या शेतकऱ्यांनी मुंडन केले. आर्णी नाका परिसरात संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून निषेध नोंदविला. यवतमाळ बाजार समितीत सोमवारी शेतमाल विक्रीसच आला नाही. भाजीमंडीतही शुकशुकाट दिसत होता. बाजारपेठ बंद होती. शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, अशी मागणी करीत मोर्चा काढणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शहर ठाण्यात त्यांंना स्थानबद्ध करण्यात आले. सकाळी लोकजागृती मंचच्या नेतृत्वात विविध संघटना एकत्र आल्या. यामध्ये काँग्रेस शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा शेतकरी संघर्ष समिती, दी बुद्धिस्ट सोसायटी, संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, ओबीसी संघटना, विदर्भ मुस्लीम मोर्चा, बेंबळे-कालवे ग्रस्त समिती, स्वामिनी, बहुजन समाज पार्टी, प्रहार आदी संघटना सहभागी झाल्या. या आंदोलनाचे नेतृत्व लोकजागृती मंचचे देवानंद पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, अरुण राऊत, वसंतराव घुईखेडकर, सुरेश चिंचोळकर, वर्षा निकम, दिनेश गोगारकर, तुषार भोयर, नितीन महल्ले, मनीषा चौधरी, चेतना पवार, सुरज वाघमारे, राजू पाटील, बसपाचे राजा गणवीर, अनिल कदम, राजेंद्र गायकवाड यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील भांबराजा येथे सकाळी ११ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. यवतमाळ-घाटंजी मार्गावरील कोळंबी फाट्यावर शेतकऱ्यांनी तासभर वाहने रोखून धरली होती. आर्णी येथील गुरुनानक ढाब्याजवळ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टायर पेटवून रस्ता रोको केला. महागाव तालुक्यातील हिवरासंगम येथे शेतकऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. गुंज येथे शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पाळत रस्त्यावर दूध ओतले. मुडाणा, सवना येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. उमरखेड, बाभूळगाव, नेर, कळंब, राळेगाव येथेही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अर्जुना येथे सरकारचे सरण पेटविलेयवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी सकाळी ९ वाजता रस्ता रोको केला. शेतकरी-वारकरी संघटनेच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावर सरकारचे प्रतिकात्मक सरण रचून पेटवून देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री आणि सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. तब्बल तासभर चाललेल्या या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी-वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शाह, अनुप चव्हाण, अशोक भुतडा, रोहित राठोड यांनी केले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार महिपालसिंह चांदा यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.