शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

अतिवृष्टीने त्रस्त शेतकऱ्यांना नोंदीसाठी मागितली लाच, तलाठी अडकला जाळ्यात

By सुरेंद्र राऊत | Updated: August 29, 2022 22:21 IST

गणेश सदाशिव मोळके (४३) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. त्याने धनज येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीसाठी यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता पैशाची मागणी केली.

यवतमाळ : अतिवृष्टीमुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. शासनाकडून मदतीच्या केवळ घोषणा सुरु आहे. तर अतिवृष्टीच्या यादीत नाव नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहे. हा धक्कादायक प्रकार उमरखेड तालुक्यातील धनज येथे उघडकीस आला. प्रती शेतकरी ३०० रुपये प्रमाणे लाच मागणाऱ्या तलाठ्याला एसीबीच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले. लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी या तलाठ्याने उमरखेडमधील सीएससी केंद्रातील युवकाचा वापर केला. 

गणेश सदाशिव मोळके (४३) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. त्याने धनज येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीसाठी यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता पैशाची मागणी केली. याची तक्रार २३ ऑगस्ट रोजी शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून २५ ऑगस्ट रोजी एसीबीच्या पथकाने पडताळणी कार्यवाही केली. पंचासमक्ष तलाठी गणेश माेळके याने शेतकऱ्यांना प्रती लाभार्थी ३०० रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम उमरखेड शहरातील आसरा काॅम्युटर मल्टीसर्विसेस येथील सौरभ संजय नाथे या खासगी इसमाकडे देण्यास सांगितले. 

ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे एसीबीचे पथक शेतकऱ्यांना घेवून सौरभ नाथे यांच्याकडे पोहोचले. सौरभने शेतकऱ्यांकडून १५०० रुपये लाच पंचासमक्ष स्वीकारली. दबा धरुन असलेल्या एसीबीच्या पथकाने तत्काळ सौरभ नाथे याला ताब्यात घेतले. त्यानंतर तलाठी गणेश मोकळे यालाही अटक केली. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर अधीक्षक अरुण सावंत, देविदास घेवारे, उपअधीक्षक शैलेष सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट, अब्दुल वसीम, राहुल गेडाम, सचिन भोयर, महेश वाकोडे, राकेश सावसाकडे, उपनिरक्षक सुधाकर कोकेवार यांनी केली.  

शेतकऱ्यांच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार 

यंदा शेतकऱ्यांना निसर्गाने कधी नव्हे अशी चपराक दिली आहे. पावसाने सर्व रेकाॅर्ड मोडित काढले आहे. शेतशिवार अजूनही पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. घरात खाण्यासाठी दाणा शिल्लक नाही. होती नव्हती ती पुंजी शेतकऱ्यांनी खरीप हंगामात खर्च केली. बॅंकांचे कर्ज डोक्यावर आहे.  

दैनंदिन खर्च कसा भागवावा ही समस्या शेतकऱ्यांपुढे आहे. सरकार केवळ मदतीची घोषणा करीत आहे. अजूनही एक रुपया शेतकऱ्यांना मिळाला नाही. पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असल्याचा केवळ देखावा निर्माण केला जात आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार निचपणाचा कहर आहे. शासकीय यंत्रणा टाळू वरचे लोणी खाण्यातही मागे पुढे पाहत नसल्याचे वास्तव आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळ