शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

अतिवृष्टीने त्रस्त शेतकऱ्यांना नोंदीसाठी मागितली लाच, तलाठी अडकला जाळ्यात

By सुरेंद्र राऊत | Updated: August 29, 2022 22:21 IST

गणेश सदाशिव मोळके (४३) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. त्याने धनज येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीसाठी यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता पैशाची मागणी केली.

यवतमाळ : अतिवृष्टीमुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. शासनाकडून मदतीच्या केवळ घोषणा सुरु आहे. तर अतिवृष्टीच्या यादीत नाव नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहे. हा धक्कादायक प्रकार उमरखेड तालुक्यातील धनज येथे उघडकीस आला. प्रती शेतकरी ३०० रुपये प्रमाणे लाच मागणाऱ्या तलाठ्याला एसीबीच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले. लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी या तलाठ्याने उमरखेडमधील सीएससी केंद्रातील युवकाचा वापर केला. 

गणेश सदाशिव मोळके (४३) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. त्याने धनज येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीसाठी यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता पैशाची मागणी केली. याची तक्रार २३ ऑगस्ट रोजी शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून २५ ऑगस्ट रोजी एसीबीच्या पथकाने पडताळणी कार्यवाही केली. पंचासमक्ष तलाठी गणेश माेळके याने शेतकऱ्यांना प्रती लाभार्थी ३०० रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम उमरखेड शहरातील आसरा काॅम्युटर मल्टीसर्विसेस येथील सौरभ संजय नाथे या खासगी इसमाकडे देण्यास सांगितले. 

ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे एसीबीचे पथक शेतकऱ्यांना घेवून सौरभ नाथे यांच्याकडे पोहोचले. सौरभने शेतकऱ्यांकडून १५०० रुपये लाच पंचासमक्ष स्वीकारली. दबा धरुन असलेल्या एसीबीच्या पथकाने तत्काळ सौरभ नाथे याला ताब्यात घेतले. त्यानंतर तलाठी गणेश मोकळे यालाही अटक केली. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर अधीक्षक अरुण सावंत, देविदास घेवारे, उपअधीक्षक शैलेष सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट, अब्दुल वसीम, राहुल गेडाम, सचिन भोयर, महेश वाकोडे, राकेश सावसाकडे, उपनिरक्षक सुधाकर कोकेवार यांनी केली.  

शेतकऱ्यांच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार 

यंदा शेतकऱ्यांना निसर्गाने कधी नव्हे अशी चपराक दिली आहे. पावसाने सर्व रेकाॅर्ड मोडित काढले आहे. शेतशिवार अजूनही पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. घरात खाण्यासाठी दाणा शिल्लक नाही. होती नव्हती ती पुंजी शेतकऱ्यांनी खरीप हंगामात खर्च केली. बॅंकांचे कर्ज डोक्यावर आहे.  

दैनंदिन खर्च कसा भागवावा ही समस्या शेतकऱ्यांपुढे आहे. सरकार केवळ मदतीची घोषणा करीत आहे. अजूनही एक रुपया शेतकऱ्यांना मिळाला नाही. पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असल्याचा केवळ देखावा निर्माण केला जात आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार निचपणाचा कहर आहे. शासकीय यंत्रणा टाळू वरचे लोणी खाण्यातही मागे पुढे पाहत नसल्याचे वास्तव आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळ