शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

प्रयोगशील शेतकऱ्याने केळी तर पिकवलीच पण चिप्सचाही व्यवसाय सुरू केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 5:42 PM

Yawatmal news शेती आणि संकटाचे अतूट नाते आहे. संकटातून शेतकऱ्यांची सुटका नाही. याची जाणीव ठेवून अडचणीवर मात कसे करता येईल याचा मार्ग शोधणे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेती आणि संकटाचे अतूट नाते आहे. संकटातून शेतकऱ्यांची सुटका नाही. याची जाणीव ठेवून अडचणीवर मात कसे करता येईल याचा मार्ग शोधणे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील हरसुल या गावचे राजेश प्रभाकर सवने असेच एक प्रयोगशील शेतकरी आहे. त्यांनी मागील तीन वर्षांपासून केळी उत्पादन दरम्यान आलेल्या अनेक अडचणीवर मात करून आपल्या शेतीला ऊभारी देण्याचा प्रयत्न केला आहे.राजेश सवने यांनी तीन वर्षापूर्वी आपल्या शेतात केळीची सहा हजार झाडे लावली होती. फळबागेतून चांगले उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु पहिल्या वर्षी अत्यंत तीव्र उन्हाळा आल्याने त्या वर्षी बाग जळून गेली. तेव्हा त्यांना जवळपास सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. त्या नंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा फळधारणा झाली आणि तोडणीला आले तेव्हा कोरोनाने पाय पसरले होते. त्यामुळे गगनाला असलेले केळीचे भाव जमीनदोस्त झाले. त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. परंतु या संकटातून मार्ग कसा काढायचा यावर त्यांनी विचार केला. शेती म्हटल्यानंतर संकटे येणारच हे त्यांना कळून चुकले होते. स्वत: केळीवर आधारित प्रक्रिया करून विकायचे ठरविले. याची सुरुवात त्यांनी केळी पिकविण्याची भट्टी लावून स्थानिक पातळीवर स्वत: विक्री केली. त्या मध्ये जेमतेम पैसे वसूल झाले. परंतु कळून चुकले होते की शेती संकटातून सावरायचे असेल तर नवनवीन प्रयोग करणे गरजेचे आहे.

या दृष्टिकोनातून या वर्षी केळी पिकावर विशेष प्रक्रिया करून विक्री करण्याचे ठरविले. आणि आपल्या शेतातच कच्या केळीपासून चिप्स तयार करण्याचे ठरविले. सदर उत्पादन आधी स्थानिक पातळीवरील लोकांपर्यन्त पोहोचविण्याचे ठरविले. करिता तयार केळी चिप्स अत्यंत माफक दरामध्ये विक्री सुरू केली आहे. या सर्व घडामोडीतून राजेश सवने यांनी अडचणीवर मात केली आहे. शिवाय अनेक लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.

टॅग्स :agricultureशेती