शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

२१९४ मॉ दुर्गांची स्थापना

By admin | Updated: October 2, 2016 00:17 IST

जिल्ह्यातील दुर्गोत्सवाचा देशपातळीवर लौकिक आहे. मोठ्या उत्साहात जिल्हाभरातील दोन हजार १९४ मंडळांनी मॉ दुर्गेची स्थापना केली.

उत्सव : १४ ठिकाणे संवेदनशील, २६४ शारदादेवी विराजमानयवतमाळ : जिल्ह्यातील दुर्गोत्सवाचा देशपातळीवर लौकिक आहे. मोठ्या उत्साहात जिल्हाभरातील दोन हजार १९४ मंडळांनी मॉ दुर्गेची स्थापना केली. तसेच २६४ शारदा मंडळांनीही मॉ शारदेची स्थापना केली. सर्वत्र उत्सवाचे वातावरण असून जिल्हा मुख्यालयी जय अंबेच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला. यात पावसांच्या सरींनी वेगळीच रंगत भरली. मातेचे भक्त ढोलताशाच्या तालावर थिरकताना दिसत होते. पोलीस दप्तरी नोंद झालेल्या दोन हजार १९४ दुर्गा मंडळांनी पहिल्याच दिवशी मातेची स्थापना केली. यामध्ये शहरी भागातील ६२६ तर ग्रामीण भागातील एक हजार ५६८ दुर्गोत्सव मंडळ आहे. ४५८ गावांनी आदर्शाची परंपरा जोपासत ‘एक गाव एक दुर्गा’ या प्रमाणे स्थापना केली आहे. दुर्गोत्सवाप्रमाणेच शारदा उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. २६४ मंडळांनी माँ शारदेची स्थापना केली आहे. यातील ४२ मंडळ शहरी भागातील असून ग्रामीण भागात २२२ मंडळे आहेत. एक गाव एक शारदा हा आदर्श १२२ मंडळांनी जोपासला आहे. भावपूर्ण वातावरणात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणपती विसर्जनादरम्यान उमरखेड येथे झालेल्या घटनेनंतर संपूर्ण यंत्रणेलाच सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. दुर्गोत्सवाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये, याची सतर्कता पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी) ही आहेत जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, आर्णी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, घाटंजी, पुसद, उमरखेड, महागाव ही शहरी भागातील संवेदनशील ठिकाणे आहेत. ग्रामीण भागातील संवेदनशील ठिकाणामध्ये यवतमाळ तालुक्यातील रूईवाई, सावर, दिग्रसमधील कलगाव, महागाव येथील फुलसावंगी, खंडाळा येथील शेंबाळपिंपरी, पुसदमधील काळी दौ., जांबबाजार, वनवार्ला, धनसळ, बीटरगाव येथील ढाणकी, पोफाळी येथील मुळावा, उमरखेड येथील विडूळ, वडकी येथील खैरी, पारवा येथील कुर्ली, सदोबासावळी, वडगाव जंगल येथील अकोलाबाजार, येळाबारा, मेटीखेडा, शिरपूर येथील पुनवट, आर्णी येथील डेहणी, पाटण या ग्रामीण भागांचा संवेदनशील ठिकाणे म्हणून पोलिसात नोंद आहे. येथे विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुर्गोत्सवासाठी तीन हजार पोलिसांचा राहणार बंदोबस्त दुर्गोत्सवात शांतता कायम राखण्यासाठी जिल्ह्यात २१०० पोलीस कर्मचारी तैनात केले आहे. ७०० होमगार्ड, एक एसआरपीएफची कंपनी, ६७ सहायक निरीक्षक व फौजदार, २९ पोलीस निरीक्षक, चार उपविभागीय पोलीस अधिकारी आणि या सर्वांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे.