शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

निवडणुकीत जाती एकवटतेय

By admin | Updated: October 12, 2014 23:36 IST

जिल्ह्यात कुणबी-मराठा मतदारांची संख्या लाखोंची असताना एकही आमदार नाही, असा प्रचार करीत या विधानसभा निवडणुकीत या मतदारांची एकजूट होताना दिसत आहे. मात्र ही एकजूट

विधानसभा निवडणूक : चार मतदार संघात दिसतेय एकजूटयवतमाळ : जिल्ह्यात कुणबी-मराठा मतदारांची संख्या लाखोंची असताना एकही आमदार नाही, असा प्रचार करीत या विधानसभा निवडणुकीत या मतदारांची एकजूट होताना दिसत आहे. मात्र ही एकजूट चार मतदारसंघात अन्य उमेदवारांच्या पथ्यावर पडणार आहे. कारण या एकजूटीमुळे अन्य समाजही तेवढ्याच ताकदीने एकवटतो आहे. विधानसभेचे सात पैकी तीन मतदारसंघ आरक्षित आहेत. आर्णी आणि राळेगाव एसटीसाठी तर उमरखेड हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. पुसद, दिग्रस, यवतमाळ आणि वणी हे चार मतदारसंघ खुले आहेत. या चारच मतदारसंघात कुणबीसह अन्य समाजाने लक्ष केंद्रीत केले आहे. वणीत शिवसेनेकडून विश्वास नांदेकर, राष्ट्रवादीचे संजय देरकर, यवतमाळात काँग्रेसचे राहुल ठाकरे, शेतकरी विकास आघाडीचे डॉ.रवींद्र देशमुख, ओबीसी आरक्षण परिषदेचे प्रदीप वादाफळे, दिग्रसमध्ये राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर, पुसदमध्ये शिवसेनेचे प्रकाश पाटील देवसरकर हे प्रमुख कुणबी उमेदवार रिंगणात आहेत. कुणबी समाजाचे राजकारण सध्या याच प्रमुख उमेदवारांभोवती फिरते आहे. जिल्ह्यात दिग्रस, वणी व यवतमाळात समाजाची एकजूट पहायला मिळत आहे. तसे संदेश मोबाईलवरून आणि माऊथ पब्लिसिटीद्वारे फिरत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कुणबी-मराठा समाजाच्या एकजुटीसाठी प्रयत्न होत आहेत. ती पूर्णत: होणार की नाही याबाबत साशंकता आहे. कारण यापूर्वीही अनेकदा असे प्रयत्न झाले आणि फसलेसुद्धा. परंतु दुसरीकडे कुणबी-मराठा मतदार एकत्र येत असल्याच्या चर्चेनेच अन्य समाज एकवटू लागला आहे. अन्य बहुसंख्य असूनही सत्तेत स्थान न मिळणारा तसेच अल्पसंख्यक सर्वच समाज मराठेत्तर उमेदवाराच्या पाठीशी एकवटताना दिसतो आहे. अप्रत्यक्षपणे कुणबी-मराठा समाजाच्या मतदारांची होऊ घातलेली एकजूट मराठेत्तर उमेदवाराच्या पथ्यावर पडणारी ठरणार आहे. अन्य समाजही एकवटत असल्याने त्याचा फायदा मराठेत्तर उमेदवाराला निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वणी विधानसभा मतदारसंघात कुणबी-मराठा मतांचे विभाजन नेहमीच काँग्रेससाठी फायद्याचे राहिले आहे. त्या बळावरच आतापर्यंत वामनराव कासावार निवडून आले आहे. यावेळीसुद्धा राष्ट्रवादीचे संजय देरकर आणि शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांच्यात मतविभाजन होणार आहे. त्याचा फायदा निश्चितच काँग्रेस, मनसेला होण्याची चिन्हे आहे. कुणबी-मराठा समाजाच्या एकजुटीचे प्रयत्न होत असताना वणीत शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या वेळी या समाजात ही एकजुट का पाहायला मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)