शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

निवडणुकीत जाती एकवटतेय

By admin | Updated: October 12, 2014 23:36 IST

जिल्ह्यात कुणबी-मराठा मतदारांची संख्या लाखोंची असताना एकही आमदार नाही, असा प्रचार करीत या विधानसभा निवडणुकीत या मतदारांची एकजूट होताना दिसत आहे. मात्र ही एकजूट

विधानसभा निवडणूक : चार मतदार संघात दिसतेय एकजूटयवतमाळ : जिल्ह्यात कुणबी-मराठा मतदारांची संख्या लाखोंची असताना एकही आमदार नाही, असा प्रचार करीत या विधानसभा निवडणुकीत या मतदारांची एकजूट होताना दिसत आहे. मात्र ही एकजूट चार मतदारसंघात अन्य उमेदवारांच्या पथ्यावर पडणार आहे. कारण या एकजूटीमुळे अन्य समाजही तेवढ्याच ताकदीने एकवटतो आहे. विधानसभेचे सात पैकी तीन मतदारसंघ आरक्षित आहेत. आर्णी आणि राळेगाव एसटीसाठी तर उमरखेड हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. पुसद, दिग्रस, यवतमाळ आणि वणी हे चार मतदारसंघ खुले आहेत. या चारच मतदारसंघात कुणबीसह अन्य समाजाने लक्ष केंद्रीत केले आहे. वणीत शिवसेनेकडून विश्वास नांदेकर, राष्ट्रवादीचे संजय देरकर, यवतमाळात काँग्रेसचे राहुल ठाकरे, शेतकरी विकास आघाडीचे डॉ.रवींद्र देशमुख, ओबीसी आरक्षण परिषदेचे प्रदीप वादाफळे, दिग्रसमध्ये राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर, पुसदमध्ये शिवसेनेचे प्रकाश पाटील देवसरकर हे प्रमुख कुणबी उमेदवार रिंगणात आहेत. कुणबी समाजाचे राजकारण सध्या याच प्रमुख उमेदवारांभोवती फिरते आहे. जिल्ह्यात दिग्रस, वणी व यवतमाळात समाजाची एकजूट पहायला मिळत आहे. तसे संदेश मोबाईलवरून आणि माऊथ पब्लिसिटीद्वारे फिरत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कुणबी-मराठा समाजाच्या एकजुटीसाठी प्रयत्न होत आहेत. ती पूर्णत: होणार की नाही याबाबत साशंकता आहे. कारण यापूर्वीही अनेकदा असे प्रयत्न झाले आणि फसलेसुद्धा. परंतु दुसरीकडे कुणबी-मराठा मतदार एकत्र येत असल्याच्या चर्चेनेच अन्य समाज एकवटू लागला आहे. अन्य बहुसंख्य असूनही सत्तेत स्थान न मिळणारा तसेच अल्पसंख्यक सर्वच समाज मराठेत्तर उमेदवाराच्या पाठीशी एकवटताना दिसतो आहे. अप्रत्यक्षपणे कुणबी-मराठा समाजाच्या मतदारांची होऊ घातलेली एकजूट मराठेत्तर उमेदवाराच्या पथ्यावर पडणारी ठरणार आहे. अन्य समाजही एकवटत असल्याने त्याचा फायदा मराठेत्तर उमेदवाराला निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वणी विधानसभा मतदारसंघात कुणबी-मराठा मतांचे विभाजन नेहमीच काँग्रेससाठी फायद्याचे राहिले आहे. त्या बळावरच आतापर्यंत वामनराव कासावार निवडून आले आहे. यावेळीसुद्धा राष्ट्रवादीचे संजय देरकर आणि शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांच्यात मतविभाजन होणार आहे. त्याचा फायदा निश्चितच काँग्रेस, मनसेला होण्याची चिन्हे आहे. कुणबी-मराठा समाजाच्या एकजुटीचे प्रयत्न होत असताना वणीत शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या वेळी या समाजात ही एकजुट का पाहायला मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)