शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वर्चस्वाच्या लढाईतून दुहेरी हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 5:00 AM

उमेशला शोधण्याासाठी वसीम व रहेमान एकाच दुचाकीवरून आले. पल्लवी लॉनसमोर रहेमान आणि उमेश यांच्यामध्ये झटापट झाली. तेवढ्यात मागून रहेमानचे तीन साथीदार दुचाकीने पोहोचले. लोखंडी राॅडने उमेशवर हल्ला चढवत त्याला संपविण्यात आले. हे पाहून वसीमने तेथून पळ काढला. पाठलाग करून त्याच्यावरही सपासप वार करण्यात आले. यावेळी वसीमच्या कंबरेलाही धारदार चाकू खोचलेला होता. मात्र, तो त्याला काढण्याची संधीच मिळाली नाही. नंतर आरोपी तेथून पसार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील आर्णी मार्गावर पल्लवी लॉनसमोर वर्चस्वाच्या लढाईतून धारदार शस्त्राने घाव घालून दोघांची हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री १०.३० वाजता घडली. या प्रकरणात काही तासातच नेताजीनगरातील पुढाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली. वसीम पठाण दिलावर पठाण (३६, रा. नेताजीनगर), उमेश तुळशीराम येरमे (३४, रा. नेताजीनगर) अशी मृतांची नावे आहेत. आरोपी नीलेश सुरेश उईके (२२) रा. शिवाजीनगर, नीरज ओमप्रकाश वाघमारे (३३, रा. मधुबन सोसायटी, धामणगाव रोड), छोटे खान अन्वर खान पठाण (५४), शेख रहेमान शेख जब्बार (२८, दोघेही रा. नेताजीनगर), नितीन बाबाराव पवार (२४, रा. वडगाव) यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी रात्रीच अटक केली. मृतक वसीमची पत्नी निखत पठाण हिच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम पठाण याचा महिनाभरापूर्वी नीरज वाघमारेच्या कार्यालयासमोर शेख रहेमान याच्याशी वाद झाला होता. तेव्हा नीरज वाघमारेने वसीमला समजावून सांग नाही तर त्याचा काटा काढतो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर १५ दिवसांनी वसीम पठाण याने छोटू खान याच्याशी वाद घातला. तेव्हाही छोटू खान याने वसीमला संपविण्याची धमकी दिली. नीरज व छोटू खान यांनी कट रचून शेख रहेमानच्या हाताने हे हत्याकांड घडवून आणले, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. शहरात दुहेरी हत्याकांडाची वार्ता पसरताच खळबळ निर्माण झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, एलसीबीचे प्रमुख प्रदीप परदेशी यांनी घटनास्थळाला भेट दिली.  मृतांना निघृर्णपणे घाव घातल्याने त्यांची ओळख पटविणे शक्य होत नव्हते. अखेर मोबाईलवरून ओळख पटली....असे घडले हत्याकांड- वसीम पठाण याला फोन करून भांडण मिटविण्यासाठी बोलावण्यात आले. शेख रहेमान, वसीम पठाण, उमेश येरमे, नीलेश उईके, नितीन पवार व विधीसंघर्षग्रस्त बालक हे सहा जण दोन दुचाकीवरून आर्णी मार्गावरील एका बारमध्ये दारू प्यायले. नंतर जेवण करण्यासाठी आर्णी मार्गावरील एका ढाब्यावर गेले. जेवतानाच वसीम व रहेमानमध्ये वाद झाला. नंतर उमेश येरमे हा चालत वनवासी मारोती परिसरात आला. उमेशला शोधण्याासाठी वसीम व रहेमान एकाच दुचाकीवरून आले. पल्लवी लॉनसमोर रहेमान आणि उमेश यांच्यामध्ये झटापट झाली. तेवढ्यात मागून रहेमानचे तीन साथीदार दुचाकीने पोहोचले. लोखंडी राॅडने उमेशवर हल्ला चढवत त्याला संपविण्यात आले. हे पाहून वसीमने तेथून पळ काढला. पाठलाग करून त्याच्यावरही सपासप वार करण्यात आले. यावेळी वसीमच्या कंबरेलाही धारदार चाकू खोचलेला होता. मात्र, तो त्याला काढण्याची संधीच मिळाली नाही. नंतर आरोपी तेथून पसार झाले. त्यांनी नांदगाव खंडेश्वर (जि. अमरावती) येथील खंडाळा या गावात आश्रय घेतला. त्यांना ठाणेदार मनोज केदारे यांच्या निर्देशावरून पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे व त्यांच्या पथकाने अटक केली, तर दर्शन दिकोंडवार यांनी नीरज वाघमारे व छोटे खान या दोघांना ताब्यात घेतले.

२०१७ मध्ये वसीम विरोधात कारवाई - मृतक वसीम पठाण हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करायचा. २०१७ मध्ये एलसीबीने वसीमच्या घरून मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. त्यावेळी एक पिस्टल व तीन तलवारी सापडल्या होत्या. 

सहा वर्षांनंतर  नवरात्रातच हत्याकांड- रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी खून होणे हे यवतमाळकरांसाठी नवीन राहिलेले नाही. २०१५ मध्ये नवरात्रीच्या दरम्यानच मच्छीपूल परिसरात तिहेरी हत्याकांड घडले होते. त्यानंतर, आता नवरात्रातच आर्णी रोडवर दुहेरी हत्याकांड घडले आहे. नवरात्रीच्या काळात शहरात भाविकांची वर्दळ असते. पोलीस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त असते. अशा स्थितीत अंतर्गत धुसफूस सुरू असलेल्या गटांमध्ये संपविण्याचे प्रयत्न केले जातात.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस