शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

जीवनाच्या शोधात स्मशानाच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:32 IST

माणूस मृत्यू झाल्याशिवाय स्मशानापर्यंत जात नाही. फार तर एखाद्या आप्त मित्राच्या अंत्ययात्रेपुरती स्मशानाची धावती भेट होते. एरवी स्मशान समाजाच्या दृष्टीने बहिष्कृत असते.

ठळक मुद्देपाणीटंचाईचा महिमा : स्मशानातल्या जलस्त्रोतांवर जगण्यासाठी गर्दी

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : माणूस मृत्यू झाल्याशिवाय स्मशानापर्यंत जात नाही. फार तर एखाद्या आप्त मित्राच्या अंत्ययात्रेपुरती स्मशानाची धावती भेट होते. एरवी स्मशान समाजाच्या दृष्टीने बहिष्कृत असते. मात्र, सध्या शहरातील स्मशानांवर जिवंत माणसांचा राबता आहे. ज्या स्मशानातली धूळही जिवंत माणसांना सहन होत नाही, त्याच स्मशानातल्या पाण्यावर सध्या यवतमाळच्या अनेक वस्त्यांची गुजराण सुरू आहे... पाण्याचा शोध घेणारे यवतमाळकर अखेर स्मशानाच्या दारात पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, प्रशासनातील जिवंत माणसे पाणी पुरवू शकत नसताना मृत्यूलोकातले पाणी मागास वस्त्यांसाठी अमृत ठरत आहे..!पाणीटंचाईने यवतमाळकरांना बेजार केले आहे. आकाशातून पाऊस आला नाही. जमिनीचा तळ खोदूनही ओलावा सापडेना. आकाश-पाताळ धुंडाळल्यावर थकलेले नागरिक शेवटी स्मशानात पोहोचले आणि काय आश्चर्य! वर्षभर ज्या स्मशानाकडे ढुंकूनही पाहिले नाही, तिथल्या हातपंपाला आणि विहिरीत घेघ्घाल पाणी सापडले! शेवटी जीवनाचा शोध स्मशानाच्या दारात संपला.विशेषत: मागास वस्त्यांना स्मशानांनी टंचाईतही तगडा आधार दिला आहे. वाघापूर रोडवरील स्मशानभूमीच्या आत एक हातपंप आहे. दुसरा हातपंप स्मशानाच्या अगदी दाराजवळ आहे. या दोन्ही हातपंपांना सध्या माणसांची गर्दी मुंग्यांसारखी लगडलेली आहे. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत येथे गुंड, भरणे, ड्रम भरले जात आहेत. या दोन हातपंपांना गर्दी पेलवेनाशी झाल्यावर काही लोक स्मशनापुढे असलेल्या प्राधिकरणाच्या व्हॉल्वचा आधार घेत आहेत. त्यातून ठिबकणारे थेंब साठवून घरी नेत आहेत. केवळ वाघापूरच नव्हेतर लोहारा, संभाजीनगर, चौसाळा रोड, पिंपळगाव रोड आदी परिसरातील नागरिकही येथे येऊन पाणी नेत आहेत.हीच परिस्थिती वडगाव मोक्षधामातही आहे. तिथे मात्र नियोजनही आहे. वडगावातील काही वस्त्यांना टंचाईत मोक्षधामातील विहिरीचाच आधार आहे. तर पांढरकवडा रोडवरील स्मशानभूमीतील हातपंपावर सध्या पाण्यासाठी गर्दी होत आहे. स्मशानाचे दर्शनही झाले तरी अनेकांना भीती वाटते. तिथे एखाद्या अंत्ययात्रेला गेलेच तर घरी येताच अंघोळी केली जाते. पण आता त्याच स्मशानांनी यवतमाळरांची तहान भागविली आहे. शेवटी स्मशानात असते कोण? आपलेच वाडवडील! तिथे गेल्यावर आशीर्वादच मिळतील ना!आलीशान गाड्या स्मशानावरवाघापूर रोड स्मशानभूमीवर आॅटोरिक्षा, ठेले घेऊन लोक येत आहेत आणि पाणी भरून नेत आहेत. एवढेच काय, रोज रात्री आलिशान कारमध्ये बसून काही जण येतात आणि एक-दोन छोटे ड्रम भरून पाणी नेत आहेत. या हातपंपावर गरीब-श्रीमंत भेदही संपला. पाण्याचा जपून वापर न करणाऱ्या माणसांना आता पाण्याची किंमत कळलेली आहे. ‘जिंदगी की तलाश मे हम मौत के कितने पास आ गए’ हे हिंदी सिनेगीत कोणी गांभीर्यपूर्वक ऐकले नसेल, पण आता तेच शब्द खरे ठरलेत. पाण्याला जीवन संबोधणारी माणसे पाणी शोधत स्मशानात पोहोचलीत.