शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस विधानसभेत फुटला असंतोषाचा बांध

By admin | Updated: October 20, 2014 23:20 IST

केवळ निवडणूक काळात मतदार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नेत्यांमुळे दिग्रस मतदारसंघातील जनतेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी प्रचंड असंतोष होता. याचीच प्रचिती विधानसभा निवडणुकीत आली.

किशोर वंजारी - नेरकेवळ निवडणूक काळात मतदार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नेत्यांमुळे दिग्रस मतदारसंघातील जनतेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी प्रचंड असंतोष होता. याचीच प्रचिती विधानसभा निवडणुकीत आली. या दोनही पक्षांना विजयाच्या जवळही जाता आले नाही. काँग्रेसचे देवानंद पवार यांना तर आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही. पवार यांचा प्रचार तर ‘आयात उमेदवार’ असा झाला होता. एकेकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या तत्कालीन दारव्हा विधानसभा मतदारसंघात अनेक दिग्गजांना पराभव चाखावा लागला. काँग्रेसचा एकछत्री अंमल या मतदारसंघावर होता. कालांतराने या मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस नेत्यांची पकड सैल झाली. मतदारराजा विविध कारणांमुळे काँग्रेसपासून दूर गेला. शिवसेनेचे संजय राठोड यांनी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात आपली पकड मजबूत केली. तीन निवडणुकांमध्ये त्यांनी विजयच नव्हे तर मताधिक्यही प्रचंड घेतले आहे. यावेळी तर त्यांनी मताधिक्यात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा विक्रम केला आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघात संजय राठोड यांनी केलेली विकास कामे कुणीही विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांचा पराभव अशक्यच, ही बाब तेवढीच सत्य असतानाही त्यांच्या विरोधात ‘पॉवरफूल’ उमेदवार रिंगणात नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसने वसंत घुईखेडकर यांना उमेदवारी दिली. निवडणूक काळात त्यांनी जवळपास गावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपली उमेदवारी गावापर्यंत पोहोचविण्यात ते बऱ्याच अंशी यशस्वीही झाले. परंतु संजय राठोड यांच्या तुलनेत बऱ्याच बाबतीत ते कमी पडले. परिणामी त्यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसची तर अतिशय दैनावस्था झाली. देवानंद पवार हे या मतदारसंघासाठी नवीन होते. कार्यकर्त्यांची फळी नाही, मतदारसंघाची ओळख नाही आणि होते ते कार्यकर्ते यवतमाळात कार्यरत होते. या आणि इतर कारणांमुळे ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. केवळ १८ हजार ८०७ मतांवर त्यांना समाधान मानावे लागले. तसे पाहिल्यास या मतदारसंघात येत असलेल्या नेर, दारव्हा, दिग्रस या तालुक्यांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नावापुरतेच होते. अंतर्गत गटबाजी, समन्वयाचा अभाव आदी बाबींमुळे काँग्रेस खिळखिळी झाली आहे. कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेवर या पक्षाची सत्ता नाही. याच बाबी पक्षाचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर जाण्यासाठी कारणीभूत ठरला.