शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सिंचन क्षेत्र वाढीसाठी उदासीनता

By admin | Updated: February 20, 2017 01:27 IST

प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचन क्षेत्र वाढीसाठी शासकीय, राजकीय यंत्रणेकडून चांगले प्रयत्न झालेले नाही.

बेंबळाचे पाणी दारात : पीक पॅटर्न बदलण्याचा प्रयत्नच नाही, बहुतांश क्षेत्र पारंपरिक पिकांचेराळेगाव : प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचन क्षेत्र वाढीसाठी शासकीय, राजकीय यंत्रणेकडून चांगले प्रयत्न झालेले नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पाणी पोहोचूनही संधीचा लाभ दवडला जात आहे. पीक पॅटर्न बदलण्याचा प्रयत्न झाला नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात केवळ नासाडीच होत आहे. यासाठी हालचाली करून आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे.बेंबळा विभागाद्वारे गेली तीन महिन्यांपासून ठराविक अंतराने सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. बाभूळगाव, कळंब, राळेगाव या तीन तालुक्यात ११ हजार ७०० हेक्टर सिंचन क्षमता त्यामुळे निर्माण झाली असल्याचा विभागाचा दावा आहे. राळेगाव तालुक्यात ३० पेक्षा अधिक गावातील शेतकऱ्यांना चार हजार ५०० हेक्टर क्षेत्रात सिंचनाकरिता पाणी मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे. बेंबळाचे पाणी अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या दारात आले आहे. मात्र पीक पॅटर्नमध्ये बदल करण्यात आला नसल्याने या संधीचा लाभ घेता आलेला नाही. शासनस्तरावर व राजकीयस्तरावर याकरिता आवश्यक ते प्रयत्नच झाले नसल्याने सिंचनाचा पुरेपूर उपयोग या तीन तालुक्यात होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. खरीप हंगामातील कापूस व तूर, सोयाबीन या तीन परंपरागत पिकापलीकडे शेतीच केली जात नाही. त्यातच कापूस व तुरीच्या बहुतांश क्षेत्रात सिंचनाचे पाणी दिले जात नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे सध्या अपवाद वगळता गहू, हरभरा, भुुईमूग आदी सिंचनावर आधारित पिके कोठेही उभी दिसत नाही.कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक वर्षांनंतर बेंबळा धरण पूर्ण झाले. आवश्यक प्रमाणात पाऊस झाल्याने धरणही भरले. कालव्यात पाणी आले, पण ज्या मुख्य उद्देशासाठी हे सर्व करण्यात आले तो उद्देश पूर्ण करण्याचे भान शासकीय-राजकीय यंत्रणेने दाखविले नसल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याचे आता बोलले जात आहे. त्याचबरोबर मागील दोन वर्षांपासून सिंचन क्षेत्राच्या कक्षेत येणाऱ्या शेतकऱ्यांकरिता पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करणे, त्याकरिता मेळावा घेणे आदी बाबी पूर्ण करणे आवश्यक असताना त्याकडेही सर्व संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे. आतातरी त्यासंदर्भात हालचाली करून आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसह इतर पिकेही सिंचनाच्या भरवशावर घेवून समृद्धी साधली आहे. (तालुका प्रतिनिधी)कालव्याच्या बाजूने हवे वीज खांबज्या काही मोजक्या शेतकऱ्यांनी बेंबळा कालव्यावरून शेतीकरिता सिंचनाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी सर्वप्रथम डिझेल इंजिन आणले. दररोज ५०० ते ७०० रुपये डिझेलकरिता खर्चून सिंचनाची सुविधा निर्माण केली. अनेक शेतकऱ्यांना हे दोनही खर्च परवडत नाही. कालव्याच्या दोनही बाजूस इलेक्ट्रीक खांब उभारण्यात यावे, त्यावरून वीज पंपासाठी वीज देण्यात यावी, तेव्हाच सिंचनाचा खर्च परवडेल अशी त्यांची भूमिका व म्हणणे आहे.