शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

सिंचन क्षेत्र वाढीसाठी उदासीनता

By admin | Updated: February 20, 2017 01:27 IST

प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचन क्षेत्र वाढीसाठी शासकीय, राजकीय यंत्रणेकडून चांगले प्रयत्न झालेले नाही.

बेंबळाचे पाणी दारात : पीक पॅटर्न बदलण्याचा प्रयत्नच नाही, बहुतांश क्षेत्र पारंपरिक पिकांचेराळेगाव : प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचन क्षेत्र वाढीसाठी शासकीय, राजकीय यंत्रणेकडून चांगले प्रयत्न झालेले नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पाणी पोहोचूनही संधीचा लाभ दवडला जात आहे. पीक पॅटर्न बदलण्याचा प्रयत्न झाला नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात केवळ नासाडीच होत आहे. यासाठी हालचाली करून आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे.बेंबळा विभागाद्वारे गेली तीन महिन्यांपासून ठराविक अंतराने सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. बाभूळगाव, कळंब, राळेगाव या तीन तालुक्यात ११ हजार ७०० हेक्टर सिंचन क्षमता त्यामुळे निर्माण झाली असल्याचा विभागाचा दावा आहे. राळेगाव तालुक्यात ३० पेक्षा अधिक गावातील शेतकऱ्यांना चार हजार ५०० हेक्टर क्षेत्रात सिंचनाकरिता पाणी मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे. बेंबळाचे पाणी अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या दारात आले आहे. मात्र पीक पॅटर्नमध्ये बदल करण्यात आला नसल्याने या संधीचा लाभ घेता आलेला नाही. शासनस्तरावर व राजकीयस्तरावर याकरिता आवश्यक ते प्रयत्नच झाले नसल्याने सिंचनाचा पुरेपूर उपयोग या तीन तालुक्यात होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. खरीप हंगामातील कापूस व तूर, सोयाबीन या तीन परंपरागत पिकापलीकडे शेतीच केली जात नाही. त्यातच कापूस व तुरीच्या बहुतांश क्षेत्रात सिंचनाचे पाणी दिले जात नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे सध्या अपवाद वगळता गहू, हरभरा, भुुईमूग आदी सिंचनावर आधारित पिके कोठेही उभी दिसत नाही.कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक वर्षांनंतर बेंबळा धरण पूर्ण झाले. आवश्यक प्रमाणात पाऊस झाल्याने धरणही भरले. कालव्यात पाणी आले, पण ज्या मुख्य उद्देशासाठी हे सर्व करण्यात आले तो उद्देश पूर्ण करण्याचे भान शासकीय-राजकीय यंत्रणेने दाखविले नसल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याचे आता बोलले जात आहे. त्याचबरोबर मागील दोन वर्षांपासून सिंचन क्षेत्राच्या कक्षेत येणाऱ्या शेतकऱ्यांकरिता पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करणे, त्याकरिता मेळावा घेणे आदी बाबी पूर्ण करणे आवश्यक असताना त्याकडेही सर्व संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे. आतातरी त्यासंदर्भात हालचाली करून आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसह इतर पिकेही सिंचनाच्या भरवशावर घेवून समृद्धी साधली आहे. (तालुका प्रतिनिधी)कालव्याच्या बाजूने हवे वीज खांबज्या काही मोजक्या शेतकऱ्यांनी बेंबळा कालव्यावरून शेतीकरिता सिंचनाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी सर्वप्रथम डिझेल इंजिन आणले. दररोज ५०० ते ७०० रुपये डिझेलकरिता खर्चून सिंचनाची सुविधा निर्माण केली. अनेक शेतकऱ्यांना हे दोनही खर्च परवडत नाही. कालव्याच्या दोनही बाजूस इलेक्ट्रीक खांब उभारण्यात यावे, त्यावरून वीज पंपासाठी वीज देण्यात यावी, तेव्हाच सिंचनाचा खर्च परवडेल अशी त्यांची भूमिका व म्हणणे आहे.