शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन क्षेत्र वाढीसाठी उदासीनता

By admin | Updated: February 20, 2017 01:27 IST

प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचन क्षेत्र वाढीसाठी शासकीय, राजकीय यंत्रणेकडून चांगले प्रयत्न झालेले नाही.

बेंबळाचे पाणी दारात : पीक पॅटर्न बदलण्याचा प्रयत्नच नाही, बहुतांश क्षेत्र पारंपरिक पिकांचेराळेगाव : प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचन क्षेत्र वाढीसाठी शासकीय, राजकीय यंत्रणेकडून चांगले प्रयत्न झालेले नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पाणी पोहोचूनही संधीचा लाभ दवडला जात आहे. पीक पॅटर्न बदलण्याचा प्रयत्न झाला नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात केवळ नासाडीच होत आहे. यासाठी हालचाली करून आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे.बेंबळा विभागाद्वारे गेली तीन महिन्यांपासून ठराविक अंतराने सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. बाभूळगाव, कळंब, राळेगाव या तीन तालुक्यात ११ हजार ७०० हेक्टर सिंचन क्षमता त्यामुळे निर्माण झाली असल्याचा विभागाचा दावा आहे. राळेगाव तालुक्यात ३० पेक्षा अधिक गावातील शेतकऱ्यांना चार हजार ५०० हेक्टर क्षेत्रात सिंचनाकरिता पाणी मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे. बेंबळाचे पाणी अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या दारात आले आहे. मात्र पीक पॅटर्नमध्ये बदल करण्यात आला नसल्याने या संधीचा लाभ घेता आलेला नाही. शासनस्तरावर व राजकीयस्तरावर याकरिता आवश्यक ते प्रयत्नच झाले नसल्याने सिंचनाचा पुरेपूर उपयोग या तीन तालुक्यात होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. खरीप हंगामातील कापूस व तूर, सोयाबीन या तीन परंपरागत पिकापलीकडे शेतीच केली जात नाही. त्यातच कापूस व तुरीच्या बहुतांश क्षेत्रात सिंचनाचे पाणी दिले जात नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे सध्या अपवाद वगळता गहू, हरभरा, भुुईमूग आदी सिंचनावर आधारित पिके कोठेही उभी दिसत नाही.कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक वर्षांनंतर बेंबळा धरण पूर्ण झाले. आवश्यक प्रमाणात पाऊस झाल्याने धरणही भरले. कालव्यात पाणी आले, पण ज्या मुख्य उद्देशासाठी हे सर्व करण्यात आले तो उद्देश पूर्ण करण्याचे भान शासकीय-राजकीय यंत्रणेने दाखविले नसल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याचे आता बोलले जात आहे. त्याचबरोबर मागील दोन वर्षांपासून सिंचन क्षेत्राच्या कक्षेत येणाऱ्या शेतकऱ्यांकरिता पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करणे, त्याकरिता मेळावा घेणे आदी बाबी पूर्ण करणे आवश्यक असताना त्याकडेही सर्व संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे. आतातरी त्यासंदर्भात हालचाली करून आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसह इतर पिकेही सिंचनाच्या भरवशावर घेवून समृद्धी साधली आहे. (तालुका प्रतिनिधी)कालव्याच्या बाजूने हवे वीज खांबज्या काही मोजक्या शेतकऱ्यांनी बेंबळा कालव्यावरून शेतीकरिता सिंचनाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी सर्वप्रथम डिझेल इंजिन आणले. दररोज ५०० ते ७०० रुपये डिझेलकरिता खर्चून सिंचनाची सुविधा निर्माण केली. अनेक शेतकऱ्यांना हे दोनही खर्च परवडत नाही. कालव्याच्या दोनही बाजूस इलेक्ट्रीक खांब उभारण्यात यावे, त्यावरून वीज पंपासाठी वीज देण्यात यावी, तेव्हाच सिंचनाचा खर्च परवडेल अशी त्यांची भूमिका व म्हणणे आहे.