शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तांच्या उपदानातून कर्ज वसुली नाही

By admin | Updated: November 5, 2016 00:21 IST

जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उपदानातून आता कर्जाची वसुली बंद झाली.

जिल्हा परिषद : पतसंस्थांपुढे आव्हान, सेवानिवृत्तांना दिलासायवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उपदानातून आता कर्जाची वसुली बंद झाली. यामुळे निवृत्तांना दिलासा मिळाला असला, तरी कर्मचारी पतसंस्थांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. जिल्हा परिषदेच्या सेवेत विविध पदांवर जवळपास १४ हजारांवर अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध शासकीय लाभ मिळतात. तसेच बँक आणि कर्मचारी पतसंस्थांकडून विविध कामांसाठी कर्ज प्राप्त होते. बहुतांश संवर्गातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पगारदार पतसंस्था स्थापन केल्या आहेत. जवळपास प्रत्येक कर्मचारी कोणत्या तरी पतसंसथेचे सभासद आहेत. यात शिक्षकांच्या पतसंस्था आघाडीवर आहेत. या पतसंस्था पगारदारांच्या असल्याने त्यांची कर्ज वसुली १00 टक्के असते. कर्ज वसुलीची हमी असल्याने या पतसंस्थांना सुगीचे दिवस आले आहे. बहुतांश कर्मचारी आपल्या पतसंस्थांकडून गृह कर्ज, शिक्षण कर्ज आदींची उचल करतात. जिल्हा परिषद संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पतसंस्थेच्या कर्जाची कपात करतात. यामुळे सर्वच पतसंस्थांची वसुली १00 टक्के असते. त्यामुळे या पतसंस्था रग्गड बनल्या. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या उपदानातून पतसंस्थांची कर्ज वसुली होत असल्याने पतसंस्थांना वसुलीची चिंताच नव्हती. त्यामुळे पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्था चांगल्याच फोफावल्या.सेवानिवृत्त होताना कर्मचाऱ्यांना उपदानाची रक्कम दिली जाते. या उपदानातून आता कर्ज वसुली करू नये, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आहे. परिणामी गेल्या काही महिन्यांपासून उपदानातून पतसंस्थेची कर्ज वसुली बंद झाली. यामुळे कर्मचारी पतसंस्थांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. सभासद निवृत्त होण्यापूर्वीच त्यांच्याकडून कर्ज वसुली करण्यासाठी पतसंस्थांची धडपड सुरू आहे. यातून मार्ग काढताना त्यांची चांगलीच कसरत होत आहे. (शहर प्रतिनिधी)