शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धरण उशाला अन् कोरड घशाला

By admin | Updated: October 20, 2014 23:19 IST

माळपठार भागातील इरापूर धरणाच्या तिरावरील शेतकऱ्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये खर्च करुन शेतामध्ये पाईपलाईन टाकली. मोटारपंप लावून ओलीत करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र भारनियमनाने केवळ चार

अशोक काकडे - पुसदमाळपठार भागातील इरापूर धरणाच्या तिरावरील शेतकऱ्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये खर्च करुन शेतामध्ये पाईपलाईन टाकली. मोटारपंप लावून ओलीत करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र भारनियमनाने केवळ चार तासही वीज सुरळीत राहत नाही. त्यामुळे ओलित करणे अशक्य होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक उद्धवस्त झाले असताना धरणाच्या तीरावरील शेतकऱ्यांना मोठी आशा होती. मात्र भरनियमनाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले असून धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे. पुसद कृषी उपविभागात सोयाबीनचा पेरा १ लाख ९३३ हेक्टर झाला. पुसद तालुक्यामध्ये ३३ हजार ५६६ हेक्टरवर पेरणी झाली. दिग्रसमध्ये १३ हजार ८३० हेक्टर, उमरखेडमध्ये ३२ हजार ८९० आणि महागांवमध्ये २० हजार ६४७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. उशीरा आलेला पाऊस, मध्यंतरी पडलेला खंड, भारनियमन आदींमुळे अडीच क्विंटल बियाण्याला केवळ दोन क्विंटल उत्पादन होत आहे. पेरणी इतकेही उत्पादन होत नाही. त्यात नंतरचा काढणीचा खर्च १५०० रुपये एकरी येत आहे. मळणीयंत्रासाठी ३०० रुपये पोते माजावे लागते. उत्पादनच नाही तर काढणीचा खर्च कुठून करणार. त्यामुळे उभे पीक शेतातच सडू देण्याची वेळ आली आहे. कापूस पिकांचीही तिच अवस्था आहे. उपविभागात ८९ हजार ६३ हेक्टर कापसाची पेरणी झाली होती. पुसद तालुक्यात २२ हजार ५३० हेक्टर, दिग्रसमध्ये १६ हजार ९९७, उमरखेडमध्ये १८ हजार ३५८ हेक्टर तर महागांवमध्ये ३१ हजार १७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. सध्या कापसाची अवस्थ अत्यंत बिकट आहे. इसापूर धरणाच्या तिरारवर असलेल्या गावांतील धरणग्रस्त शेतकरी नगर जिल्ह्यात नारायणगावला कांदे काढणीसाठी जातात. तेथे मजुरी करुन झालेल्या कमाईत स्वत:ची शेती करतात. होती नव्हती ती कमाई शेतीला पाणी देण्यासाठी घालून विजेअभावी ओलीत होत नसल्याने इथल्या शेतकऱ्यांची अवस्था अधांतरी झाली आहे. शेतीत काही पिकले तर शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होते. गतवर्षी बियाणे निघालेच नाही अन् यावर्षीही निसर्गाने साथ सोडली अशात शासनाकडूनही कोणतीच मदत नाही, त्यामुळे चहुबाजूने शेतकऱ्यांचे मरण झाले आहे. बँका वसुलीसाठी निघाल्या, करोडो रुपयांचा पिकविमा घेतला परंतू पीक उद्ध्वस्त झाल्यावरही काहीच भेटले नाही. गेल्या १० वर्षांपासून शेतकरी विविध संकटाचा सामना करीत आहे. यावर्षी कोरड्या दुष्काळाने मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यातच वीज भारनियमनाने भर घातली आहे. अशा स्थितीत पीक वाचवायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. मात्र कुणीही लक्ष द्यायला तयार दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या सातबाऱ्यावर यावर्षी दु:खाची नोंद झाली आहे. असंख्य अडचणींशी झगडणाऱ्या शेतकऱ्याला भयंकर वेदना होत आहेत. शासनाने त्यांना नुकसानीच्या तुलने अधिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.