शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

३४ हजार हेक्टरातील पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 00:33 IST

जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद, भाजीपाला आणि फळ पिकांचे उत्पन्न घेणाऱ्या ४९ हजार २५६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र शासकीय निकषानुसार हेक्टरी दहा हजारांची मदत मिळणार आहे.

ठळक मुद्देअती पावसाने बळीराजाच्या डोळ्यात पाणी : सोयाबीनला कोंबे फुटली, कापूस झाला जमिनदोस्त, तुरीलाही फटका

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसला. यामुळे जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत ३४ हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. यामध्ये सर्वाधिक फटका कापसाला बसला. जिल्ह्यात प्रारंभापासूनच पावसाने शेतकऱ्यांना हातघाईस आणले. पेरणी करताना पावसाने पाठ दाखविली. पिके काढताना जिल्ह्यात पाऊस अतोनात बरसला. यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसासारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही भागाचे सर्वेक्षण झाले, तर काहींचा अहवाल अप्राप्त आहे.कापसाचे सर्वाधिक नुकसानऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पाऊस बरसला आणि कापसाची बोंड गळाली. आता कापूस घरात किती येणार, हा देखील प्रश्न आहे. पावणेपाच लाख हेक्टरवरील क्षेत्रापैकी १७ हजार ८७६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.४९ हजार शेतकऱ्यांना फटकाजिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद, भाजीपाला आणि फळ पिकांचे उत्पन्न घेणाऱ्या ४९ हजार २५६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र शासकीय निकषानुसार हेक्टरी दहा हजारांची मदत मिळणार आहे.दारव्हातील नुकसान मोठेजिल्ह्यात सतत बरसणाऱ्या पावसाने दारव्हा तालुक्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाने केली आहे. १९ हजार ३५२ हेक्टरला फटका बसला आहे. याशिवाय यवतमाळ वगळता इतर १५ तालुक्यातील पिकांना पावसाने फटका बसला आहे.संयुक्त पंचनामेपावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे संयुक्तरित्या जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.- नवनाथ कोळपकर,कृषी अधीक्षक

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस