शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

३४ हजार हेक्टरातील पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 00:33 IST

जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद, भाजीपाला आणि फळ पिकांचे उत्पन्न घेणाऱ्या ४९ हजार २५६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र शासकीय निकषानुसार हेक्टरी दहा हजारांची मदत मिळणार आहे.

ठळक मुद्देअती पावसाने बळीराजाच्या डोळ्यात पाणी : सोयाबीनला कोंबे फुटली, कापूस झाला जमिनदोस्त, तुरीलाही फटका

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसला. यामुळे जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत ३४ हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. यामध्ये सर्वाधिक फटका कापसाला बसला. जिल्ह्यात प्रारंभापासूनच पावसाने शेतकऱ्यांना हातघाईस आणले. पेरणी करताना पावसाने पाठ दाखविली. पिके काढताना जिल्ह्यात पाऊस अतोनात बरसला. यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसासारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही भागाचे सर्वेक्षण झाले, तर काहींचा अहवाल अप्राप्त आहे.कापसाचे सर्वाधिक नुकसानऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पाऊस बरसला आणि कापसाची बोंड गळाली. आता कापूस घरात किती येणार, हा देखील प्रश्न आहे. पावणेपाच लाख हेक्टरवरील क्षेत्रापैकी १७ हजार ८७६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.४९ हजार शेतकऱ्यांना फटकाजिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद, भाजीपाला आणि फळ पिकांचे उत्पन्न घेणाऱ्या ४९ हजार २५६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र शासकीय निकषानुसार हेक्टरी दहा हजारांची मदत मिळणार आहे.दारव्हातील नुकसान मोठेजिल्ह्यात सतत बरसणाऱ्या पावसाने दारव्हा तालुक्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाने केली आहे. १९ हजार ३५२ हेक्टरला फटका बसला आहे. याशिवाय यवतमाळ वगळता इतर १५ तालुक्यातील पिकांना पावसाने फटका बसला आहे.संयुक्त पंचनामेपावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे संयुक्तरित्या जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.- नवनाथ कोळपकर,कृषी अधीक्षक

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस