शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फिरकले नाहीत ! अतिवृष्टीचा फटका सोसत कशी करावी कर्जाची परतफेड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:12 IST

शेतकरी हवालदिल : पीक गेले, खत, बियाणे, औषधांची नासधूस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अतिवृष्टीने संपूर्ण राज्यात कहर सुरू केला आहे. यवतमाळ जिल्ह्याला याचा मोठा फटका बसला आहे. साडेतीन लाख हेक्टर क्षेत्राचे पूर परिस्थितीने नुकसान झाले आहे. शेतातील पीकच वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरले नाही. यामुळे १३०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात एक लाख २२ हजार शेतकऱ्यांनी १३४२ कोटी रुपयांच्या पीक कर्जाची उचल केली आहे. हंगामातील उत्पन्नावरच या पीक कर्जाची परतफेड होणार आहे. खरिपात चांगले उत्पन्न मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी चांगले बियाणे खरेदी केले. त्यासाठी खत आणि औषधांचा वापर वाढविण्यात आला. यावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च झाला. शेतात पीक उभे असतानाच निसर्ग प्रकोपाने कहर केला आहे. यामुळे घर चालवायचे कसे आणि घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शासनाकडे मदतीची मागणी करण्यात आली. मात्र, राज्य शासनाने हेक्टरी आठ हजार ५०० रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. किमान एका हेक्टरचा खर्च ३० ते ४० हजारांपेक्षाही जास्त आहे. यात शासनाने मदत दिल्यानंतर बियाण्याचा खर्च निघणेही अवघड होते. यामुळे शेतकरी आक्रोश करीत आहे; परंतु त्यांना अद्यापही मदत मिळाली नाही.

पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फिरकलेच नाहीत

यावर्षी पीक विमा कंपनीने मदतीच्या निकषात अखेरच्या टप्प्यातील पीक कापणी प्रयोगावर मदत देण्याची घोषणा केली आहे. यामुळे झालेल्या नुकसानीची कुठलीच पाहणी कंपनीने केली नाही. यातून शेतकऱ्यांना मोठा हादरा बसला आहे.

शेतकरी म्हणतात, घर कसं चालवायचं

झालेल्या नुकसानीची व्यथा मांडण्यासाठी दररोज शेकडो शेतकरी जिल्हा प्रशासनाच्या दरबारी पोहोचत आहेत. त्यांना मदत कधी मिळणार आणि पुढे घर कसं चालवायचं, असा प्रश्न पडला आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrop Insuranceपीक विमाPaddyभातfarmingशेतीFarmerशेतकरी