शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
3
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
4
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
5
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
6
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
7
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
8
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
9
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
10
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
11
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
12
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
13
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
14
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
15
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
16
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
17
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
18
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
19
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
20
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?

पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फिरकले नाहीत ! अतिवृष्टीचा फटका सोसत कशी करावी कर्जाची परतफेड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:12 IST

शेतकरी हवालदिल : पीक गेले, खत, बियाणे, औषधांची नासधूस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अतिवृष्टीने संपूर्ण राज्यात कहर सुरू केला आहे. यवतमाळ जिल्ह्याला याचा मोठा फटका बसला आहे. साडेतीन लाख हेक्टर क्षेत्राचे पूर परिस्थितीने नुकसान झाले आहे. शेतातील पीकच वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरले नाही. यामुळे १३०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात एक लाख २२ हजार शेतकऱ्यांनी १३४२ कोटी रुपयांच्या पीक कर्जाची उचल केली आहे. हंगामातील उत्पन्नावरच या पीक कर्जाची परतफेड होणार आहे. खरिपात चांगले उत्पन्न मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी चांगले बियाणे खरेदी केले. त्यासाठी खत आणि औषधांचा वापर वाढविण्यात आला. यावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च झाला. शेतात पीक उभे असतानाच निसर्ग प्रकोपाने कहर केला आहे. यामुळे घर चालवायचे कसे आणि घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शासनाकडे मदतीची मागणी करण्यात आली. मात्र, राज्य शासनाने हेक्टरी आठ हजार ५०० रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. किमान एका हेक्टरचा खर्च ३० ते ४० हजारांपेक्षाही जास्त आहे. यात शासनाने मदत दिल्यानंतर बियाण्याचा खर्च निघणेही अवघड होते. यामुळे शेतकरी आक्रोश करीत आहे; परंतु त्यांना अद्यापही मदत मिळाली नाही.

पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फिरकलेच नाहीत

यावर्षी पीक विमा कंपनीने मदतीच्या निकषात अखेरच्या टप्प्यातील पीक कापणी प्रयोगावर मदत देण्याची घोषणा केली आहे. यामुळे झालेल्या नुकसानीची कुठलीच पाहणी कंपनीने केली नाही. यातून शेतकऱ्यांना मोठा हादरा बसला आहे.

शेतकरी म्हणतात, घर कसं चालवायचं

झालेल्या नुकसानीची व्यथा मांडण्यासाठी दररोज शेकडो शेतकरी जिल्हा प्रशासनाच्या दरबारी पोहोचत आहेत. त्यांना मदत कधी मिळणार आणि पुढे घर कसं चालवायचं, असा प्रश्न पडला आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrop Insuranceपीक विमाPaddyभातfarmingशेतीFarmerशेतकरी