शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

ढिगाऱ्यांमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:15 PM

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील सर्व नदीनाल्यांना मोठे पुर आले. त्यामुळे नदीकाठावरील शेतांचे नुकसान झाले. यासोबतच वेकोलिच्या कोळसा खाण क्षेत्रात मानवनिर्मीत ढिगारे तयार झाल्याने या ढिगाऱ्यांना नदी नाल्यांचे पाणी अडून शेतात शिरल्यानेही असंख्य शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आली. त्यामुळे नैसर्गीक आपत्तीसोबतच वेकोलिच्या आडमुठ्या धोरणाचाही फटका शेतकºयांना बसला.वणी ...

ठळक मुद्देवेकोलिचे आडमुठे धोरण : गावांनाही पडतो पुराचा वेढा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील सर्व नदीनाल्यांना मोठे पुर आले. त्यामुळे नदीकाठावरील शेतांचे नुकसान झाले. यासोबतच वेकोलिच्या कोळसा खाण क्षेत्रात मानवनिर्मीत ढिगारे तयार झाल्याने या ढिगाऱ्यांना नदी नाल्यांचे पाणी अडून शेतात शिरल्यानेही असंख्य शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आली. त्यामुळे नैसर्गीक आपत्तीसोबतच वेकोलिच्या आडमुठ्या धोरणाचाही फटका शेतकºयांना बसला.वणी परिसरात वेकोलिचा पसारा वाढला आहे. बहुतांश खाणी खुल्या स्वरूपाच्या असून त्यातील अधिक खाणी वर्धा व विदर्भा नदीच्या काठावर आहे. खुल्या खाणीतील कोळसा काढण्यापूर्वी उपसावी लागणारी माती वेकोलिने नियम डावलून टाकली आहे. त्याचे मानवनिर्मीत पर्वत तयार झाले आहेत. नदी नाल्यांचा प्रवाह व पुराचा विस्तार लक्षात न घेता ढिगारे टाकण्यात आले आहे. त्यामुळे या ढिगाऱ्यांना नदी-नाल्यांच्या पुराचे पाणी अडून त्याचे बॅकवॉटर शेतांमध्ये प्रवेश करतात.उकणी, बेलोरा, नायगाव, मुंगोली, जुगाद, कोलगाव, साखरा, घोन्सा या गावच्या अनेक शेतांमध्ये गेल्या १५ दिवसात पाणी शिरले. त्यामुळे पिके दोन दिवस पाण्याखाली राहिली. पिके सडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वेकोलिच्या ओव्हरबर्डनमुळे कित्येक गावांनाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जोरदार पाऊस आला की, गावकऱ्यांच्या उरात धडकी भरते. जुगाद, कोलेरा, मुंगोली या गावांना पुराचा वेढा पडतो. वेकोलिने या गावांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी गावकरी कित्येक वर्षांपासून करीत आहे. मात्र वेकोलि प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.१०-१२ खाणीपैकी काही खाणी बंद अवस्थेत आहे. तरीही त्याचे ओव्हरबर्डन पर्वत रूपाने व खाण दरी रूपाने कायम आहेत. बंद पडलेल्या खाणी बुजवून पूर्ववत जमीन सपाट केल्यास अनेक धोके टळू शकतात. विदर्भा नदीला नुकताच आलेला पुर घोन्सा खणीचे ओव्हरबर्डन फोडून खाणीत शिरला. त्यामुळे घोन्सा खाण दोनदा पुराच्या पाण्याने डच्च भरली. नदी काठावरील ढिगारे नदीत घसरू लागल्याने काही ठिकाणी वर्धा नदीचे पात्र अरूंद होत आहे. यामुळेही पुराचा विस्तार वाढून शेती पाण्याखाली येत आहे. वेकोलिच्या मनमानी कारभारावर जिल्हा प्रशासनाने निर्बंध न घातल्यास भविष्यात धोके वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस