शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

दारू पिऊन ट्रॅव्हल्स पळविणाऱ्या चालकावर अखेर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 12:14 IST

२५ जण जीव मुठीत घेऊन करीत होते प्रवास : मदत मागितल्यानंतर पोलिसांनी दारव्ह्यामध्ये ट्रॅव्हल्स अडविली

यवतमाळ : समृद्धी महामार्गावर नुकताच ट्रॅव्हल्स अपघात होवून २५ जणांचा कोळसा झाला. तरीही ट्रॅव्हल्सचालक व मालक सुधारण्यास तयार नाहीत. बुधवारी रात्री पुणे येथून नागपूरसाठी २५ प्रवासी घेऊन निघालेल्या दशमेश ट्रॅव्हल्सचा चालक मद्यधुंद अवस्थेत सुसाट वाहन हाकत होता. एका प्रवाशाने दारव्हा ठाणेदाराचा मोबाइल नंबर मिळवून त्यांना आपबिती सांगितली. त्यानंतर ही ट्रॅव्हल्स दारव्हा येथे गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता अडविण्यात आली. तेव्हा २५ प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. याप्रकरणी चालक, मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

नागपूर-पुणे या मार्गावर जगतारसिंग सैनी यांच्या मालकीची एमएच-४०- सीएम-१११५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स दशमेश नावाने प्रवास करते. बुधवारी रात्री पुणे येथून २५ प्रवासी घेऊन ही ट्रॅव्हल्स नागपूरकडे निघाली. काही अंतर पार केल्यानंतर ट्रॅव्हल्सचालक बेदरकारपणे वाहन हाकत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. नुकतीच समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा येथील अपघाताची घटना घडली आहे. त्यामुळे प्रवाशाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यात दशमेश ट्रॅव्हल्सचा चालक काही ऐकण्यास तयार नव्हता. या संकटातून सुटका कशी करायची अशी धडपड प्रवाशांची सुरू होती.

या प्रवाशांनी दारव्हा ठाणेदार विलास कुलकर्णी यांचा मोबाइल क्रमांक मिळवून त्यांना संपर्क केला. ट्रॅव्हल्स चालकाच्या कृत्याची व जीव धोक्यात असल्याची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ बसस्थानकासमोर ही ट्रॅव्हल्स पोलिसांनी थांबविली. चालक अमृत प्रल्हाद थेर (४६, रा. माहुली ता. दारव्हा) याला ताब्यात घेतले. तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याची तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्ताचे नमुनेही तपासणीला पाठविण्यात आले. ट्रॅव्हल्स चालकावर कलम २७९ भादंविसह कलम १८५ मोटार वाहन अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.

खासगी ट्रॅव्हल्सच्या मद्यधुंद चालकामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला

यासोबतच ट्रॅव्हल्सची सुद्धा आरटीओंकडून तपासणी केली जाणार आहे. त्यांच्या अहवालानंतर आणखी पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी सांगितले. ट्रॅव्हल्स मालकावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली.

ट्रॅव्हल्स मालकावरही कारवाईचे संकेत 

दिवसाचा प्रवास असल्याने मद्यधुंद चालकाचा प्रताप प्रवाशांच्या लक्षात आला. रात्री जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये मात्र प्रवासी बिनधास्तपणे झोपी जातात. ट्रॅव्हल्समालक कुठलीही पडताळणी न करता चालकांना ट्रॅव्हल्स सोपवितात. त्यात प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जातो. असे प्रकार सातत्याने घडत आहे. यवतमाळातील चिंतामणी ट्रॅव्हल्स अपघातात १२ प्रवासी, तर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतरही यात सुधारणा झालेली नाही. हप्तेखोरीतून ट्रॅव्ह- ल्समालकांनी यंत्रणेला दावणीला बांधल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीroad transportरस्ते वाहतूकYavatmalयवतमाळ