शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या मंडईत लाखमोलाचा भाजीपाला मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

रविवारी ३०० टन भाजीपाला विक्रीकरिता भाजी मंडीत आला होता. या वाहनांनी बाजारपेठ भरली होती. मोठ्या प्रमाणात भाजीपाला आल्याने बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले होते. या स्थितीत भाजीपाला खरेदी करणारे ठोक आणि चिल्लर विक्रेते नव्हते. यामुळे शेतकºयाचा शेतमाल भाजी मंडीतच सडला. काही शेतकऱ्यांनी हा शेतमाल परत नेला. काही शेतकऱ्यांना तो परत घेऊन जाणेही जमले नाही.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांनाही प्रवेश मिळाला नाही : चिल्लर व्यापाऱ्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप, दुकानेही पाडण्यात आली

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जीवनावश्यक असलेला भाजीपाला रविवारी भाजी मंडीत विक्रीला आला. भाजी खरेदी करण्यासाठी व्यापाºयांनी आणि जनसामान्यांनी गर्दी केली. मात्र पोलीस प्रशासनाने गर्दी रोखून धरली. यामुळे लाखोंचा भाजीपाला विक्रीअभावी मातीमोल झाला.शनिवारी दत्त चौक, जाजू चौक आणि आठवडी बाजार परिसरातील भाजी दुकाने बुलडोझरने तोडली गेली. जे विक्रेते हटण्यास तयार नव्हते, अशांवर लाठ्या बरसल्याचा आरोप चिल्लर विक्रेत्यांनी रविवारी केला. या घटनेचे पडसाद रविवारी पहायला मिळाले. भाजी मंडीत पहाटेपासूनच पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या ठिकाणी भाजी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना रोखले गेले. चिल्लर विक्रेत्यांना पूर्णत: प्रवेशबंदी करण्यात आली होती. यामुळे ज्या व्यावसायिकांनी भाजी खरेदी केली, त्यांची मोठी पंचाईत झाली.रविवारी ३०० टन भाजीपाला विक्रीकरिता भाजी मंडीत आला होता. या वाहनांनी बाजारपेठ भरली होती. मोठ्या प्रमाणात भाजीपाला आल्याने बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले होते. या स्थितीत भाजीपाला खरेदी करणारे ठोक आणि चिल्लर विक्रेते नव्हते. यामुळे शेतकºयाचा शेतमाल भाजी मंडीतच सडला. काही शेतकऱ्यांनी हा शेतमाल परत नेला. काही शेतकऱ्यांना तो परत घेऊन जाणेही जमले नाही. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस वाहनांचा ताफा भाजीमंडीत होता. गर्दी रोखणे पोलिसांनाही कठीण गेले. पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी रोटरी क्लबने मदतीचा हात दिला. गर्दी नियंत्रणासाठी गेटच्या बाहेर माईकवरून घोषणा करण्यात येत होती. यामध्ये अनंत पांडे, राजेश गडीकर, अजय म्हैसाळकर, दिलीप राखे, आनंद जैन यांचा समावेश होता.विक्रेते म्हणतात, आमचा काय गुन्हा?आम्हाला ११ वाजतापर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश शनिवारी मिळाले. ११ वाजता दुकाने बंद केले. तर पोलिसांनी बुलडोझर चालवित दुकाने उचलली. अनेक दुकाने तुटली. आम्हाला सांगितले असते तर आम्हीच दुकाने हटविली असती, असे मत गोलू जुमनाके, शरिफ खान, किशोर फुलवाले, मिलिंद घोसे यांनी व्यक्त केले. शेख शफी यांनी पोलिसांनी मारहाणीचा निषेध नोंदविला. भाजी मंडीतील खरेदीदारी जाफर खान यांनी भाजीची खरेदी केली. त्याचा ट्रकभरून गावात वितरण करणार असल्याचे जाहीर केले. भाजीपाला, लसूण आणि कांद्याची किट त्यांनी तयार केली.शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रियाआता शेतीला लावलेला पैसाही निघणार नाही. मजुरीलाही पैसे नाही, अशी व्यथा जांब येथील सचिन राऊत यांनी मांडली. सचिन लढे हे शेतकरी म्हणाले, शिमला मिरचीच्या उत्पादनाला मोठा खर्च आला. पण मिरची विकल्याच गेली नाही. अशीच अवस्था राहिली तर भाजीपाल्याचा प्लॉट खराब होईल. दहीफळचे जगदीश चव्हाण म्हणाले, तालुक्याचा बजार बंद आहे. यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी भाजी आणली. आता जिल्ह्याच्या ठिकाणी भाजी विक ता येत नाही. कोबी, काकडी, वांगे हा शेतमाल परत न्यावा लागत आहे. जनावरांनाच तो टाकाव लागेल. हंसराज सोमवंशी म्हणाले, ३५ हजार रूपयाचा माल विकता आला नाही. शेतकºयांना खर्चालाही भाजी परवडला नाही. अरविंद बेंडे, बोरगावचे अशोक भुतडा म्हणाले, आता भाजी तोडली नाही तर संपूर्ण भाजीपाला खराब होतो. विक्रीसाठी नियोजन करायला हवे.भाजी विक्री बंद करणारजिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूमधून भाजीपाला वगळला. यामुळे भाजी विक्रेत्यांना बोलावण्यात आले होते. आता खरेदी करणाºयांवर अशा लाठ्या बरसल्या, विक्रेत्यांचे हाल होत आहेत. मग भाजी विकायची कशासाठी? आम्ही दुकाने मंगळवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गजानन बरे आणि सचिव आयूब शेख यांनी दिली. जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसvegetableभाज्या