शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

यवतमाळातील मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चाचा हिशेबच जुळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 13:15 IST

यवतमाळातील मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांच्या या खात्यात ४० लाख रुपये शिल्लक होते. त्यापैकी २५ लाखांचा खर्च दाखविला गेला. मात्र त्या २५ लाखाच्या देयक व अधिकृत कागदपत्रांची जुळवाजुळव होत नसल्याचेही बोलले जाते.

ठळक मुद्देदीड वर्ष लोटले, अद्याप ऑडिट नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दीड वर्षांपूर्वी यवतमाळात पार पडलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अद्यापही हिशेब जुळलेला नाही. या खर्चाचे लेखा परीक्षणही झालेले नाही. उलट हा हिशेब विदर्भ साहित्य संघ अथवा मराठी साहित्य महामंडळाला मागण्याचा सल्ला देण्यात आला आहे.११, १२ व १३ जानेवारी २०१९ ला यवतमाळात ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. संमेलनाचे अध्यक्षपद, संमेलनासाठी होणारी वसुली या मुद्यावरून सुरुवातीपासूनच हे संमेलन वादग्रस्त ठरले. ‘लोकमत’ने संमेलनासाठी सुरू असलेल्या वसुलीचे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन अमरावतीच्या विभागीय माहिती अधिकाऱ्यांनी या प्रकरणी यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या वसुलीसाठी नियमानुसार परवानगी आवश्यक असताना ती घेतली गेली नाही, असा मुद्दा तक्रारीत उपस्थित करण्यात आला होता. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठविले. आयुक्तांनी आयोजकांना नोटीस बजावली व त्यांना खुलासा मागितला. पहिल्यांदा आयोजकांनी वेळ मागितला तर दुसऱ्या वेळी ते हजरच झाले नाही. त्यामुळे या चौकशीसाठी निरीक्षक नेमला गेला. या निरीक्षकांना आयोजकांनी स्पष्टीकरण सादर केले. ‘डॉ. वि.भी. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय यवतमाळ’ या नावाने आमची संस्था नोंदणीकृत आहे, निधी गोळा करणे व कार्यक्रमाचे आयोजन करणे ही बाब आमच्या उद्देशात नमूद आहे, त्यामुळे परवागनीची गरज नाही असे आयोजकांनी स्पष्टीकरणात नमूद केले. शिवाय तक्रारकर्त्याला याबाबीचा बोध नसल्याचेही सांगण्यात आले. तुम्हाला हिशेब हवा असेल तर विदर्भ साहित्य संघ अथवा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे तक्रार करून स्पष्टीकरण मागविण्याचे सूचविले.प्रत्यक्षात आयोजकांनी ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नावाने समितीने गठित केली. या समितीने ही वसुली केली, समितीमध्ये प्रामुख्याने डॉ. रमाकांत कोलते, घनश्याम दरणे, डॉ. अशोक मेनकुदळे आणि विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधी म्हणून विवेक विश्वरुपे यांचा समावेश आहे. अलाहाबाद बँकेत त्याचे खाते आहे. या चार पैकी तिघांच्या स्वाक्षरीने व्यवहार करण्यास मंजुरी आहे. परंतु प्रत्यक्षात या व्यवहारातून विवेक विश्वरुपे यांना बाजूलाच ठेवले गेले.संमेलन आयोजकांच्या या खात्यात ४० लाख रुपये शिल्लक होते. त्यापैकी २५ लाखांचा खर्च दाखविला गेला. सध्या १५ लाख रुपये शिल्लक आहेत. मात्र त्या २५ लाखाच्या देयक व अधिकृत कागदपत्रांची जुळवाजुळव होत नसल्याचेही बोलले जाते. बॅकेच्या खात्यात शिल्लक असलेले १५ लाख रुपये हे जनतेकडून केलेल्या वसुलीतील आहे. संमेलनाच्या उद्देशासाठी त्याची वसुली होती. संमेलन संपले, उद्देशपूर्ती झाली. त्यामुळे जनतेचा असलेला हा पैसा (१५ लाख) जनतेच्याच उपयोगी पडावा म्हणून तो कोविड-१९ साठी जिल्ह्यात खर्च केला जावा, अशी मागणी आहे.

वसुलीतील १५ लाख कोविडला द्याशेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती यवतमाळचे निमंत्रक देवानंद पवार म्हणाले, कोलते यांची संस्था नोंदणीकृत असली तरी संमेलनासाठी वसुली ही समितीच्या नावाने झालेली आहे. समितीला तशी परवानगी नाही. या समितीकडे शिल्लक असलेले १५ लाख रुपये आयोजकांनी जिल्ह्यात कोविड-१९ च्या उपाययोजनांसाठी देणे अपेक्षित आहे. गेल्या तीन वर्षांपासून संस्थेने आॅडिट रिपोर्ट धर्मादाय आयुक्तांकडे सादर केलेला नाही. संमेलनाचा हिशेब देण्यास दीड वर्ष लागावे यातच गौडबंगालाचे पुरावे दडलेले आहेत. संमेलनाच्या आयोजकांचा कारभार खरोखरच पारदर्शक असेल तर त्यांनी कुठून किती निधी गोळा केला, कोणत्या खर्चाचा भार कुणी उचलला, कुठून काय-काय प्राप्त झाले, हा निधी कशा-कशावर खर्च केला गेला, याचा हिशेब सादर करणे अपेक्षित असल्याचे देवानंद पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.हिशेब सादर केला गेला, एकमताने मंजुरीही झालीसाहित्य संमेलन आयोजन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते म्हणाले, संमेलनानंतर रितसर सभा घेऊन हिशेब सादर केला. सर्व सदस्यांनी त्याला मंजुरी दिली. उर्वरित निधी कसा खर्च करायचा हेही त्यात ठरले. संमेलनानंतर उरणारा निधी आयोजक संस्थेकडेच राहील, असे अखिल भारतीय साहित्य मंडळाने निर्देशित केले आहे. त्यांच्या सूचनेनुसार हा निधी सांस्कृतिक, वाङ्मयीन कार्यक्रमांवर खर्च केला जाणार आहे. यासंबंधी ठरावही घेण्यात आले आहे. कोलते संशोधन केंद्र आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २० वर्षांपासून व्याखानमाला सुरू आहे. हा निधी त्यावर खर्च व्हावा व दोन संस्थांच्या मुदती ठेवीत ठेवावा, असेही मंडळाने निर्देशित केले आहे. त्यानुसार कार्यवाही केली जात असल्याचे डॉ. कोलते म्हणाले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन