शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
4
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
5
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
6
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
7
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
8
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
9
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
10
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
11
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
12
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
13
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
14
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
15
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
16
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
17
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
18
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
19
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
20
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणात यवतमाळ राज्यात तळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 05:00 IST

संभाव्य कोरोनाची लाट रोखण्यामध्ये लसीकरणाची भूमिका निर्णायक असणार आहे. त्यामुळेच लसीकरण मोहिमेला गती देण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात लसीकरण पूर्ण केले जाईल, असे सांगत प्रशासनाला निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसत नाही. राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या पाच जिल्ह्यामध्ये मुंबई ८९.३ टक्के, पुणे ८४.६ टक्के, भंडारा ८४.५ टक्के, सिंधुदुर्ग ७८.४ टक्के, तर सातारा जिल्ह्यात ७७.२९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गणेशोत्सवानंतर आता दुर्गोत्सव आणि त्यानंतर दिवाळी येणार आहे. त्यातच येत्या सोमवारपासून जिल्ह्यातील शाळाही गजबजणार आहेत. बहुतांश निर्बंधही शिथिल झाले आहेत. अशा स्थितीत कोरोना लसीकरणाला जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित वेग मिळालेला नाही. राज्यातील लसीकरणाची आकडेवारी पाहिली असता यवतमाळ जिल्हा तळाच्या पाच जिल्ह्यांत आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण, पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी गप्प का आहेत? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.संभाव्य कोरोनाची लाट रोखण्यामध्ये लसीकरणाची भूमिका निर्णायक असणार आहे. त्यामुळेच लसीकरण मोहिमेला गती देण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात लसीकरण पूर्ण केले जाईल, असे सांगत प्रशासनाला निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसत नाही. राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या पाच जिल्ह्यामध्ये मुंबई ८९.३ टक्के, पुणे ८४.६ टक्के, भंडारा ८४.५ टक्के, सिंधुदुर्ग ७८.४ टक्के, तर सातारा जिल्ह्यात ७७.२९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणामध्ये तळाला असलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये यवतमाळचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी ३८.६ टक्के, हिंगोली ४१.०८ टक्के, यवतमाळ आणि अकोला प्रत्येकी ४२ टक्के, तर नंदुरबार जिल्ह्यात ४२.३ टक्के लसीकरण झाले आहे. सिंधुदुर्ग, भंडारासारख्या दुर्गम जिल्ह्यात ७५ टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले असताना यवतमाळ मागे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.व्यापक जनजागरणाची गरजकोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होणे आवश्यक आहे. प्रशासनाने आता लसीकरण मोहिमेला गती देण्याचे ठरविले आहे. या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थासोबतच लोकप्रतिनिधी संस्था संघटनांनीही लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. 

प्रशासन देणार जनजागृतीवर भर जिल्ह्याला उपलब्ध झालेल्या लसीच्या पुरवठ्यानुसार जिल्ह्यात आजवर लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. प्रारंभीच्या काळात ग्रामीण भागातून लसीकरणासाठी वेग कमी होता. आता ग्रामीण भागातही लस पुरवठा वाढविण्यात येणार असल्याने या मोहिमेला वेग येईल. प्रशासनाच्या वतीने जनजागृतीवरही भर देण्यात येईल. साधारण दोन महिन्यांत जिल्ह्यातील लसीचा पहिला डोस पूर्ण करण्यात येईल.- अमोल येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ

मागणी होती तेव्हा डोस कमी मिळालेमध्यंतरी लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करत होते. नेमके त्यावेळी लसीचे डोस कमी उपलब्ध हाेत होते. याचा परिणाम मोहिमेवर झाला. ग्रामीण भागामध्ये लस घेण्याबाबत उदासीनता आहे. काही ठराविक भागांमध्ये हा वेग खूपच कमी आहे. अशा ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्याचा पहिला डोस डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण व्हावा, यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत.- डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

ग्रामीण भागातील उदासीनतेचा परिणामजिल्ह्यामध्ये सध्या लसीकरणाचा वेग कमी आहे. शहरी आणि ग्रामीण भागातही नागरिकांत उदासीनता पाहायला मिळते. कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने नागरिक उत्स्फूर्तपणे पुढे येत नाहीत. पुसद, यवतमाळसारख्या शहरात लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही अपेक्षित वेग मिळालेला नाही. लसीकरण वाढविण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत.- डॉ. प्रल्हाद चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस