शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

मास्कच्या बाहेर कोरोना अन् मास्कच्या आत तोंडात ‘कॅन्सर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 05:00 IST

सोमवारी ३१ मे रोजी जागतिक तंबाखूविरोधी दिवस पाळला जात आहे. त्यानिमित्त कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून पुढे आलेली व्यसनाधीनतेची भयावह परिस्थिती मांडण्याचा हा प्रयत्न... केंद्र शासनाने केलेल्या या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ३० लाख लोकसंख्येपैकी ४६.६ टक्के पुरुष आणि १२.३ टक्के महिला दरदिवशी तंबाखू चघळतात. विशेष म्हणजे, हे सर्वेक्षण केवळ १५ वर्षांवरील नागरिकांचेच करण्यात आले.

ठळक मुद्दे१५ लाख लोक तंबाखूच्या जबड्याखाली तंबाखूसह दारूमुळे अर्धा जिल्हा व्यसनाच्या विळख्यातमहिलाही गेल्या आहारी

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातून दीड हजार लोकांचा बळीही गेला. मात्र जिल्ह्यातील तब्बल १५ लाख लोक तंबाखू चघळत-चघळत हळूहळू मृत्यूला निमंत्रण देत आहेत. तोंडावर मास्क घालून कोरोनाचा विषाणू बाहेर रोखणारे अनेक नागरिक मास्कच्या आडून तोंडात तासनतास तंबाखूच्या रुपाने कॅन्सर पाळत असल्याचे वास्तव आहे. सोमवारी ३१ मे रोजी जागतिक तंबाखूविरोधी दिवस पाळला जात आहे. त्यानिमित्त कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून पुढे आलेली व्यसनाधीनतेची भयावह परिस्थिती मांडण्याचा हा प्रयत्न... केंद्र शासनाने केलेल्या या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ३० लाख लोकसंख्येपैकी ४६.६ टक्के पुरुष आणि १२.३ टक्के महिला दरदिवशी तंबाखू चघळतात. विशेष म्हणजे, हे सर्वेक्षण केवळ १५ वर्षांवरील नागरिकांचेच करण्यात आले. प्रत्यक्षात जिल्ह्यात १५ वर्षांखालील अनेक मुलेही तंबाखू खात असल्याचे वास्तव आहे. ही शासकीय आकडेवारी पाहता, जिल्ह्यात अर्धी लोकसंख्या म्हणजे जवळपास १५ लाख लोक तंबाखूच्या आहारी गेले आहेत. दिवसभर आणि रात्रभर जबड्याखाली तंबाखूची चिमूट ठेवणारे नागरिक स्वत:च कॅन्सरच्या जबड्यात अडकत चालले आहेत. या शिवाय, तंबाखू-चुना मळून खाणाऱ्यांसोबतच गुटखा, खर्रा या रूपात तंबाखू सेवन करणाऱ्यांचे प्रमाण लक्षात घेतल्यास जवळपास ७५ टक्के जिल्हा तंबाखूच्या आहारी गेल्याचे स्पष्ट होते. आश्चर्य म्हणजे, जिल्ह्यात गुटखाबंदी आहे. बंदी झुगारून, जादा पैसे मोजून व्यसन भागविणाऱ्या महाभागांमध्ये जसा धनाढ्य मंडळींचा समावेश आहे, तसाच रोज मजुरी करणाऱ्यांचाही आहे. उलट ५-१० रुपयांत भागणारे व्यसन म्हणून गोरगरीबच अधिक आहारी गेले आहेत. दरवर्षी २०० जणांना कॅन्सर होतोयमहाराष्ट्रात दरवर्षी १५ हजारांवर लोकांना कॅन्सर होतोय. तर, जिल्ह्यात वर्षाला ७०० च्या आसपास कॅन्सरचे रुग्ण नोंदविले जात आहेत. त्यातील जवळपास २०० लोकांना म्हणजे २७ टक्के लोकांना तंबाखूमुळे कॅन्सर होतोय. विशेष म्हणजे, अशा केसेसमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण ७० टक्के इतके अधिक आहे. कारण, यात एकतर जबड्याची किंवा जिभेची शस्त्रक्रिया होत असल्याने आहारावर विपरित परिणाम होतो. रुग्ण अशक्त बनतो. शिवाय, शस्त्रक्रियेनंतरच्या रेडिएशन, किमोथेरपीसारखे उपचार अनेक जण सहनही करू शकत नाही, अशी माहिती यवतमाळ येथील ज्योती कॅन्सर रिलिफ सेंटरचे सतीश मुस्कंदे यांनी दिली. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcancerकर्करोग