शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

सत्तेसाठी काँग्रेस-राकाँ अवसरवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:44 PM

राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांकडील गांधीवाद संपला आहे. ते अवसरवादी झाले आहे. जेथे संधी मिळेल तेथे ते सेना, भाजपसोबत सत्ता स्थापन करत आहे. उदगिरमध्ये काँग्रेसने एमआयएमचा प्रस्ताव फेटाळून सत्तेसाठी भाजपाला सोबत घेतले आहे.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : तिवारी, शेट्टींवर टीका, वंचित आघाडीच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांकडील गांधीवाद संपला आहे. ते अवसरवादी झाले आहे. जेथे संधी मिळेल तेथे ते सेना, भाजपसोबत सत्ता स्थापन करत आहे. उदगिरमध्ये काँग्रेसने एमआयएमचा प्रस्ताव फेटाळून सत्तेसाठी भाजपाला सोबत घेतले आहे. यावरून काँग्रेस, राष्ट्रवादीचे खायचे दान अन् दाखवायचे दात वेगळे आहे, असा आरोप बहुजन वंचित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.बहुजन वंचित आघाडीची जाहीर सभा येथील समता मैदानावर बुधवारी सायंकाळी पार पडली. यावेळी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील मुंबईच्या विकास आराखड्यावर बोलतात. दुसरीकडे मात्र त्यांच्याच नगर जिल्ह्यातील २२ साखर कारखाने सरकारच्या धोरणामुळे बंद पडले आहेत, त्याबाबत बोलत नाही. मुंबईतील एका एकराचं आरक्षण हटविण्यासाठी किमान ५०० कोटीचा व्यवहार होतो. हा व्यवहारातील पैशाच्या हिशोब पाहून विरोधी पक्ष भूमिका घेत आहे. शेतकऱ्यांचा कैवार दाखविणारे शेतकरी नेते केवळ डिंगा हाकतात. किशोर तिवारी, राजू शेट्टी यांच्या भूमिका योग्य नाही. सरकारने पाकिस्तानातून २० लाख मेट्रीक टन साखर स्वस्त दरात खरेदी केली. त्यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला. हा प्रश्न कुणी उचलला नाही. टमाटे, कांदे या मालाला भाव नाही. हा माल टिकवता येईल, अशी कारखानदारी सरकार उभं करत नाही. त्यामुळे प्रत्येकाने बहुजन वंचित आघाडीलाच संधी द्यावी, देशातील उतरंडीची व्यवस्था संपविण्यासाठी सर्वांची भूमिका एक हवी. माझ्या वरती किंवा खाली कोणी नाही हा विचार घेवून प्रत्येकाने सत्तेपासून वंचित राहिलेल्यांसाठी झटले पाहिजे, असे आवाहन करत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून बहुजन वंचित आघाडीची उमेदवारी प्रवीण पवार यांना दिल्याचे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रणधीर खोब्रागडे यांनी केले. त्यानंतर पश्चिम जिल्हाध्यक्ष उत्तम पांडे, प्रवक्ता राजा गणवीर, भास्कर पंडागळे, एमआयएमचे सैयद इरफान, धनराज उईके, चंदन तेलंग, पुष्पा इंगळे, बालमुकुंद भिरड, हिरासिंग राठोड, डॉ.दशरथ भांडे, रविकांत राठोड, माजी आमदार हरिदास भदे आदींनी मार्गदर्शन केले. आभार राजेंद्र तलवारे यांनी मानले.७० वर्षानंतर मनुवाद्यांचे डोके वरमनुवाद्यांविरोधातील पहिली लढाई नाही. शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार-अलुतेदार शेतकºयांना सोबत घेवून मनुवादी व्यवस्था मोडीत काढली. रयतेचं राज्य उभं केलं. मात्र आता पुन्हा पेशवाईचं राज्य आलं आहे. लोकशाही ही प्रत्येकाच्या हातात आहे. ती टिकवण्यासाठी स्वत:च्या मताची किमत केली पाहिजे. आरएसएसचे मोहन भागवत संविधान नको मनुवादी व्यवस्था आणायची घोषणा करत आहे. याचे भान ठेवून धर्मवाद्यांना बळी न पडता आपल्या मताची किमत करावी, असेही आंबेडकर म्हणाले.नरेंद्र मोदींचे सरकार महाचोरदेशाच्या पंतप्रधानांनी गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रतिसादाला साद देत २२ हजार कोटींची सबसिडी नागरिकांनी सोडली. मात्र ही सबसिडी गोरगरिबांना दिली नाही. हे सरकार खोटारड आहे, त्यांनी १५ लाख देण्याची, काळा पैसा परत आणण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात तसं झालं नाही. मात्र महानगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये एक मत पाच हजाराला विकत घेतले. ते पैसे सत्ताधाºयांकडे आले कोठून, मागचं सरकार चोर होतं. मात्र हेही सरकार महाचोर आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर