काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकरी धडकले थेट कळंब तहसीलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST2019-11-03T06:00:00+5:302019-11-03T06:00:14+5:30

शासनाने कापूस खरेदी सुरू न केल्याने व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. परतीच्या पावसामुळे शेतकरी होरपळत आहे. हाताशी आलेले सोयाबीनचे पीक मातीमोल झाले आहे. कापसाचीही दयनीय अवस्था आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

The Congress-led peasants were pushed directly to Kalamb Tahsil | काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकरी धडकले थेट कळंब तहसीलवर

काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकरी धडकले थेट कळंब तहसीलवर

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे झाले आहे. अशाही स्थितीत शासनाने हमी भावाचे कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाही. दरवर्षी पणन महासंघाकडून दिवाळीपूर्वीच कापूस खरेदी सुरू केली जाते. मात्र यावर्षी तो मुहूर्त निघालाच नाही. आता तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरू करावे व शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेसच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी शनिवारी कळंब तहसील कार्यालयात धडक दिली.
शासनाने कापूस खरेदी सुरू न केल्याने व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. परतीच्या पावसामुळे शेतकरी होरपळत आहे. हाताशी आलेले सोयाबीनचे पीक मातीमोल झाले आहे. कापसाचीही दयनीय अवस्था आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर स्थितीत किमान हमी भावाने कापूस खरेदी सुरू करणे अपेक्षित आहे. विनाअट क्विंटलमागे एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, सभापती बालू पाटील दरणे, संचालक चंद्रशेखर चांदोरे, आनंदराव जगताप, सुदाम पवार, माजी सभापती शशीकांत देशमुख, सुरेश चिंचोळकर, पंडित चावरे, घनश्याम दरणे, अरुणा चांदोरे, दीपक कदम, मुश्ताक शेख, अशोक उमरतकर, शालीक भुजाडे, राजेश भोयर, सिद्धेश्वर वाघमारे, प्रवीण खडसे, पुरुषोत्तम आगलावे, महादेव कोरवते आदी उपस्थित होते.

Web Title: The Congress-led peasants were pushed directly to Kalamb Tahsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.