शहरं
Join us  
Trending Stories
1
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
2
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
3
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
4
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
5
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
6
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
7
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
8
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
9
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
10
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
11
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
12
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
13
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
14
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
15
Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
16
सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता
17
"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
18
"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
19
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
20
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित पैसेवारीने वाढविली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

पीक परिस्थितीच्या पैसेवारीवर शासकीय योजनांची आणि लाभाची अंमलबजावणी अवलंबून असते. ५० पैशाच्यावर पैसेवारी असेल तर तसा भूभाग समृद्ध आहे असा अंदाज काढण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यात ५३ पैसे पैसेवारी जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील २०४६ गावे यामुळे समृद्ध असल्याचेच अहवालातून दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यामध्ये पावणदोन लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. यासाठी शासनाकडून सर्वेक्षणही झाले आहे. यानंतरही महसूलाची यंत्रणा धक्कादायक अहवाल देवून गेली आहे. आता अंतिम पैसेवारीकडे लक्ष लागले आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  ब्रिटिशकाळापासून शेतशिवाराची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पैसेवारीची पद्धत अवलंबिल्या जाते. ब्रिटिश गेल्यानंतरही पैसेवारी ठरविण्याचे मापदंड कायमच आहे. यामध्ये काही त्रुटी आहेत. तर काही ठिकाणी सर्वेक्षण करताना महसूलाची यंत्रणा गावपातळीवर योग्य सर्वेक्षण करीत नाही. यामुळे पीक पैसेवारी परिस्थिती बिकट असतानाही उत्तम येते. या पीक परिस्थितीच्या पैसेवारीवर शासकीय योजनांची आणि लाभाची अंमलबजावणी अवलंबून असते. ५० पैशाच्यावर पैसेवारी असेल तर तसा भूभाग समृद्ध आहे असा अंदाज काढण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यात ५३ पैसे पैसेवारी जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील २०४६ गावे यामुळे समृद्ध असल्याचेच अहवालातून दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यामध्ये पावणदोन लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. यासाठी शासनाकडून सर्वेक्षणही झाले आहे. यानंतरही महसूलाची यंत्रणा धक्कादायक अहवाल देवून गेली आहे. आता अंतिम पैसेवारीकडे लक्ष लागले आहे.  

सर्वच तालुक्यांमध्ये पिकांचे नुकसान

- जुलै महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यानंतरही खरिपातील पिकांची पैसेवारी समृद्ध राहिली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही महसूल प्रशासनाच्या लेखी त्याचा उल्लेखच नाही. 

खरिपाने शेतकऱ्यांच्या पदरात निराशा-    मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पैसेवारीतून थोडा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे काही घडलेलेच नाही. -    समृद्ध पीक पैसेवारीने वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कापणीची मोहीम सुरू केली आहे. याशिवाय थकीत कर्ज वसुलीच्या मोहिमेलाही यामुळे गती येण्याचा अंदाज आहे. 

यंदा रबीचीही अपेक्षा कमीच-    यावर्षी कापसाला चांगले दर आहे. यामुळे शेतकरी रबीच्या पिकाऐवजी कापसाची फरदड मोठ्या प्रमाणात घेण्याची शक्यता आहे. यामुळे रबीचा पीक पेरा वाढणार की नाही हा प्रश्न आहे. -    अनुदानित बियाणे मुबलक प्रमाणात न मिळाल्याने रबीचे क्षेत्र प्रभावित झाले आहे. नुकसानाची स्थिती असतानाही अनुदानित बियाण्यावर प्रश्नचिन्ह आहे. 

परिणाम काय होणार?अंतिम पैसेवारीमध्ये जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्क्यांच्यावर राहिली तर बँकांना शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करता येणार आहे. याशिवाय वीज वितरण कंपनीला थकीत वीज बिल वसूल करता येईल. याशिवाय शेतसारा वसूल करण्यात येईल. विद्यार्थ्यांची शालेय फी माफ होणार नाही. याशिवाय पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना मदतीची रक्कम देणार की नाही यावरही प्रश्न निर्माण होईल. यातून जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडले आहे. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी