शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

सुधारित पैसेवारीने वाढविली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

पीक परिस्थितीच्या पैसेवारीवर शासकीय योजनांची आणि लाभाची अंमलबजावणी अवलंबून असते. ५० पैशाच्यावर पैसेवारी असेल तर तसा भूभाग समृद्ध आहे असा अंदाज काढण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यात ५३ पैसे पैसेवारी जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील २०४६ गावे यामुळे समृद्ध असल्याचेच अहवालातून दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यामध्ये पावणदोन लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. यासाठी शासनाकडून सर्वेक्षणही झाले आहे. यानंतरही महसूलाची यंत्रणा धक्कादायक अहवाल देवून गेली आहे. आता अंतिम पैसेवारीकडे लक्ष लागले आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  ब्रिटिशकाळापासून शेतशिवाराची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पैसेवारीची पद्धत अवलंबिल्या जाते. ब्रिटिश गेल्यानंतरही पैसेवारी ठरविण्याचे मापदंड कायमच आहे. यामध्ये काही त्रुटी आहेत. तर काही ठिकाणी सर्वेक्षण करताना महसूलाची यंत्रणा गावपातळीवर योग्य सर्वेक्षण करीत नाही. यामुळे पीक पैसेवारी परिस्थिती बिकट असतानाही उत्तम येते. या पीक परिस्थितीच्या पैसेवारीवर शासकीय योजनांची आणि लाभाची अंमलबजावणी अवलंबून असते. ५० पैशाच्यावर पैसेवारी असेल तर तसा भूभाग समृद्ध आहे असा अंदाज काढण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यात ५३ पैसे पैसेवारी जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील २०४६ गावे यामुळे समृद्ध असल्याचेच अहवालातून दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यामध्ये पावणदोन लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. यासाठी शासनाकडून सर्वेक्षणही झाले आहे. यानंतरही महसूलाची यंत्रणा धक्कादायक अहवाल देवून गेली आहे. आता अंतिम पैसेवारीकडे लक्ष लागले आहे.  

सर्वच तालुक्यांमध्ये पिकांचे नुकसान

- जुलै महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यानंतरही खरिपातील पिकांची पैसेवारी समृद्ध राहिली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही महसूल प्रशासनाच्या लेखी त्याचा उल्लेखच नाही. 

खरिपाने शेतकऱ्यांच्या पदरात निराशा-    मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पैसेवारीतून थोडा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे काही घडलेलेच नाही. -    समृद्ध पीक पैसेवारीने वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कापणीची मोहीम सुरू केली आहे. याशिवाय थकीत कर्ज वसुलीच्या मोहिमेलाही यामुळे गती येण्याचा अंदाज आहे. 

यंदा रबीचीही अपेक्षा कमीच-    यावर्षी कापसाला चांगले दर आहे. यामुळे शेतकरी रबीच्या पिकाऐवजी कापसाची फरदड मोठ्या प्रमाणात घेण्याची शक्यता आहे. यामुळे रबीचा पीक पेरा वाढणार की नाही हा प्रश्न आहे. -    अनुदानित बियाणे मुबलक प्रमाणात न मिळाल्याने रबीचे क्षेत्र प्रभावित झाले आहे. नुकसानाची स्थिती असतानाही अनुदानित बियाण्यावर प्रश्नचिन्ह आहे. 

परिणाम काय होणार?अंतिम पैसेवारीमध्ये जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्क्यांच्यावर राहिली तर बँकांना शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करता येणार आहे. याशिवाय वीज वितरण कंपनीला थकीत वीज बिल वसूल करता येईल. याशिवाय शेतसारा वसूल करण्यात येईल. विद्यार्थ्यांची शालेय फी माफ होणार नाही. याशिवाय पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना मदतीची रक्कम देणार की नाही यावरही प्रश्न निर्माण होईल. यातून जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडले आहे. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी