शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

कृषी केंद्र चालकांसाठी होता कंपनीचा दुबई टूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST

कोरोनाबाबत आता गावखेड्यातील नागरिकांनी प्रचंड धास्ती घेतली आहे. पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने प्रत्येकालाच भीती वाटत आहे. यातूनच यवतमाळातील तीन कुटुंब प्रवासाला असताना त्यांच्या सोबत असणाऱ्या सहप्रवासी तरुणीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तशा बातम्याही राज्यस्तरावरून आल्या. यानंतर मात्र ज्या टूर कंपनीच्या माध्यमातून हे कुटुंब फिरायला गेले त्या कंपनीकडून मिळालेली नावांची यादीच थेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातून तिघांची निवड : प्रवाशांची यादी सोशल मीडियावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कृषी केंद्र चालकांसाठी कंपन्यांकडून दुबई टूर ऑफर करण्यात आला होता. यामध्ये यवतमाळातील तीन कुटुंबातील दहा सदस्य दुबईत फिरण्यास गेले होते. त्याच टूरमधील एका प्रवासी तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर यवतमाळातून गेलेल्या तीन कुटुंबातील सदस्यांच्या नावाची यादीच सोशल मीडियावर मंगळवार दुपारपासून व्हायरल होत आहे. यामुळे या कुटुंबाला आता अनेक अडचणी येत आहे.कोरोनाबाबत आता गावखेड्यातील नागरिकांनी प्रचंड धास्ती घेतली आहे. पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने प्रत्येकालाच भीती वाटत आहे. यातूनच यवतमाळातील तीन कुटुंब प्रवासाला असताना त्यांच्या सोबत असणाऱ्या सहप्रवासी तरुणीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तशा बातम्याही राज्यस्तरावरून आल्या. यानंतर मात्र ज्या टूर कंपनीच्या माध्यमातून हे कुटुंब फिरायला गेले त्या कंपनीकडून मिळालेली नावांची यादीच थेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.दक्षता म्हणून आरोग्य विभागाने या तीनही कुुटुंबांना निगराणीत ठेवले आहे. सध्या या तीनही कुटुंबांच्या घराकडे कुणी फिरकत नाही. इतकेच काय त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलांंनीसुद्धा स्वयंपाक, धुणी-भांडी करणे सोडून दिले आहे. यामुळे एका नव्याच समस्येला या कुुटुंबालासामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे हे कुटुंबीय २ मार्चला यवतमाळात पोहोचले. त्यानंतर ते आपले दैनंदिन कामकाज करीत होते. येथील आर्णी बायपासवरील एका मॉलमध्ये प्रचंड गर्दी असताना या कुटुंबातील काही सदस्यांनी खरेदीही केली आहे. आता मात्र त्यांच्याकडे कुणीच फिरकत नाही. नावासह यादी व्हायरल झाल्याने नातेवाईक व इतर मित्रांकडून चौकशीचे फोन सतत सुरू असल्याचे सांगण्यात आले.खासगी डॉक्टरांकडे केले शंका निरसनदुबईवरून भारतात आल्यानंतर या कुटुंबांची मुंबई विमानतळावर तपासणी झाली. त्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी सोडण्यात आले. यवतमाळात आल्यानंतर या कुटुंबांनी खासगी डॉक्टरकडेही तपासणी करून घेतली. शहरातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पार्टटाईम जॉब करणाऱ्या मेडिकलच्या प्राध्यापक डॉक्टरने या कुटुंबांची तपासणी केली. त्या डॉक्टरांनीही काहीच नसल्याचे सांगितले. त्यानंतरच हे कुटुंब बिनधास्तपणे दैनंदिन कामाला लागले होते. १० मार्चला आरोग्य यंत्रणेला ईमेल आल्यानंतर या कुटुंबाला पुन्हा निगराणीत घेण्यात आले आहे.दहा हजार मास्कची विक्री, रुमालही ठरू शकतो पर्यायकोरोनाच्या दहशतीने जिल्ह्यात १० हजार मास्कची विक्री झाली. तर आठ हजार हॅन्डवॉश सॅनेटरायझर विकले गेले आहे. मास्क एन-९५ मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. मास्कला पर्याय म्हणून स्वच्छ धुतलेला साधा रुमालही निलगिरी तेलाचे थेंब टाकून वापरता येणे शक्य आहे. मास्कच वापरणे बंधनकारक नाही, अशी माहिती केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष पंकज नानवाणी यांनी दिली.तुळशीच्या पानाचे सेवन लाभदायकतुळशीच्या पानाला आयुर्वेदात महत्त्व आहे. अ‍ॅन्टीबायोटिक म्हणून त्याकडे पाहण्यात येते. त्याचे अनेक वैद्यकीय उपयोगही आहे. कोरोना प्रतिबंधासाठी तुळशीचे पान नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. नागरिकांनी तुळशीच्या पानाचे सेवन करावे, असे मत विविध आयुर्वेदाचार्यांनी नोंदविले आहे.अशी घ्या दक्षताकोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्तींने विशेष दक्षता घ्यावी. शक्यतोवर गर्दीच्या ठिकाणी जाऊच नये, सार्वजनिक सण-उत्सव, समारंभ, यात्रा टाळाव्या, प्रत्येक वेळी हात धुवावे, खोकलताना, शिंकताना रुमाल अथवा टिशू पेपर वापरावा, सतत सर्दी, कफ, ताप याचा त्रास असेल तर डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोनाtourismपर्यटन