गावाची शांतता नागरिकांच्या हाती

By Admin | Updated: July 17, 2015 02:31 IST2015-07-17T02:31:54+5:302015-07-17T02:31:54+5:30

शहराला सामाजिक व शैक्षणिक वारसा लाभला आहे. गावाचा विकास, गावाची शांतता ही नागरिकांच्या हाती असते.

The citizens peace in the hands of the villagers | गावाची शांतता नागरिकांच्या हाती

गावाची शांतता नागरिकांच्या हाती

अखिलेशकुमार सिंह : पुसद येथे शांतता समितीची सभा
पुसद : शहराला सामाजिक व शैक्षणिक वारसा लाभला आहे. गावाचा विकास, गावाची शांतता ही नागरिकांच्या हाती असते. त्यासाठी पोलीस व नागरिकांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी गुरुवारी येथे आयोजित शांतता समितीच्या सभेत केले.
पुसद शहर पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजित या सभेला उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, तहसीलदार भगवान कांबळे, ठाणेदार धनंजय जगदाळे, वाहतूक पोलीस निरीक्षक गायकवाड उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षकांनी अवैध धंदे व शहरातील वाहतुकीसंदर्भात पोलिसांना सूचना दिल्या. तसेच शहरातील अतिक्रमण, अवैध वाहतूक, मुलींची छेडखानी, फॅन्सी नंबर प्लेट, गोवंश हत्त्याबंदी कायदा आदी विषयांवर अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बिपीन चिद्दरवार, अ‍ॅड.उमाकांत पापीनवार, अजय पुरोहित, अभय गडम, डॉ.अकिल मेमन, विनोद जिल्लेवार, अ‍ॅड.अतुल मोटे, सुधीर देशमुख, विश्वास भवरे, मोहमद सनी, अ‍ॅड.अब्दुल रऊफ शेख, डॉ.मोहमद शाहीद, महेश खडसे, निखिल चिद्दरवार, अभिजित चिद्दरवार, संजय बजाज, सुरज डुबेवार, सैयद इत्याक, शरद पाटील, सुनील ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण, क्षीरसागर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The citizens peace in the hands of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.