शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

‘चिंतामणी’चे विद्यमान विश्वत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 22:15 IST

श्री चिंतामणी देवस्थान विश्वस्तांच्या निवडीला आव्हान देत चेंज रिपोर्ट (बदल अर्ज) मंजुर करु नये, यासाठी सहायक धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु ही याचिका खारीज करुन चेंज रिपोर्टला मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देअस्थिरता संपुष्टात : अखेर बदल अर्ज मंजूर, सहायक धर्मदाय आयुक्तांचा निर्णय

गजानन अक्कलवार।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : श्री चिंतामणी देवस्थान विश्वस्तांच्या निवडीला आव्हान देत चेंज रिपोर्ट (बदल अर्ज) मंजुर करु नये, यासाठी सहायक धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु ही याचिका खारीज करुन चेंज रिपोर्टला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे गत अनेक महिन्यापासून विश्वतांच्या निवडीबाबात निर्माण झालेली अस्थिरता अखेर संपुष्टात आली आहे.सहायक धर्मदाय आयुक्त पी.पी.चव्हाण यांनी ६ आॅगस्ट २०१६ रोजी चिंतामणी देवस्थान विश्वस्तांची निवड केली होती. दरम्यान विश्वस्तांच्या निवडीला आव्हान देत उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. परंतु ही याचिका उच्च न्यायालयाने खारीज केली. त्यानंतर चेंज रिपोर्ट मंजुर करु नये, यासाठी देवस्थानचे माजी अध्यक्ष देविदास काळे, प्रा.उमेश क्षीरसागर, चिंतामण शेंडे, रमाकांत खसाळे, अनंत भिसे व राजेंद्र कठाळे यांनी आव्हान दिले. सहायक धर्मदाय आयुक्त जे.एम.चौहाण यांच्या कोर्टात सदर प्रकरण सुरु होते. त्यामुळे चेंज रिपोर्टचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु या प्रकरणातही विद्यामान विश्वस्तांच्या बाजुने निकाल लागला. त्यामुळे विश्वस्तांच्या निवडीवर घेण्यात आलेले सर्व आक्षेप फेटाळून लावण्यात आले. देवस्थानच्यावतीने अ‍ॅड.उमेश बावणकर तर आक्षेप घेणाºया गटाची बाजू अँड.राजेश कदम व अँड पोहरे यांनी बाजू मांडली.मागील अनेक वर्षापर्यंत येथील विश्वस्त निवडीचा विषय न्यायालयीन प्रक्रियेत अडकला होता. त्यामुळे देवस्थान प्रशासनाला ठोस विकासात्मक कामांना गती देता आली नाही. भाविकांच्या सुविधेकडेही दुर्लक्ष झाले. परंतु आता नवनियुक्त विश्वस्त मंडळ पूर्ण अधिकारारुढ झाल्याने विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.उच्च न्यायालयानेही फेटाळली होती याचिकातत्पूर्वी नवीन विश्वस्तांच्या निवडीनंतर लगेच आक्षेप नोंदवून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात धर्मदाय आयुक्तांनी विश्वस्तांची निवडप्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविली. ओळखीतील लोकांनाच विश्वस्त म्हणून स्थान दिले. त्यामुळे ही निवड प्रक्रियाच रद्द करुन दोषींवर कारवाई करावी असा आक्षेप होता. माजी उपसरपंच विनोद काळे, भाजपाचे जिल्हा सचिव सुरेश महाजन, भाजप व्यापारी आघाडीचे प्र्रमुख विजय नवाडे, भाजपाचे माजी तालुका सरचिटणीस सुरेश होरे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अशोक गारगाटे यांनी ही याचिका दाखल केली होती. परंतु उच्च न्यायालयानेही विश्वतांच्या बाजूने निकाल दिला होता.