शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

‘चिंतामणी’चे विद्यमान विश्वत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 22:15 IST

श्री चिंतामणी देवस्थान विश्वस्तांच्या निवडीला आव्हान देत चेंज रिपोर्ट (बदल अर्ज) मंजुर करु नये, यासाठी सहायक धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु ही याचिका खारीज करुन चेंज रिपोर्टला मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देअस्थिरता संपुष्टात : अखेर बदल अर्ज मंजूर, सहायक धर्मदाय आयुक्तांचा निर्णय

गजानन अक्कलवार।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : श्री चिंतामणी देवस्थान विश्वस्तांच्या निवडीला आव्हान देत चेंज रिपोर्ट (बदल अर्ज) मंजुर करु नये, यासाठी सहायक धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु ही याचिका खारीज करुन चेंज रिपोर्टला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे गत अनेक महिन्यापासून विश्वतांच्या निवडीबाबात निर्माण झालेली अस्थिरता अखेर संपुष्टात आली आहे.सहायक धर्मदाय आयुक्त पी.पी.चव्हाण यांनी ६ आॅगस्ट २०१६ रोजी चिंतामणी देवस्थान विश्वस्तांची निवड केली होती. दरम्यान विश्वस्तांच्या निवडीला आव्हान देत उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. परंतु ही याचिका उच्च न्यायालयाने खारीज केली. त्यानंतर चेंज रिपोर्ट मंजुर करु नये, यासाठी देवस्थानचे माजी अध्यक्ष देविदास काळे, प्रा.उमेश क्षीरसागर, चिंतामण शेंडे, रमाकांत खसाळे, अनंत भिसे व राजेंद्र कठाळे यांनी आव्हान दिले. सहायक धर्मदाय आयुक्त जे.एम.चौहाण यांच्या कोर्टात सदर प्रकरण सुरु होते. त्यामुळे चेंज रिपोर्टचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु या प्रकरणातही विद्यामान विश्वस्तांच्या बाजुने निकाल लागला. त्यामुळे विश्वस्तांच्या निवडीवर घेण्यात आलेले सर्व आक्षेप फेटाळून लावण्यात आले. देवस्थानच्यावतीने अ‍ॅड.उमेश बावणकर तर आक्षेप घेणाºया गटाची बाजू अँड.राजेश कदम व अँड पोहरे यांनी बाजू मांडली.मागील अनेक वर्षापर्यंत येथील विश्वस्त निवडीचा विषय न्यायालयीन प्रक्रियेत अडकला होता. त्यामुळे देवस्थान प्रशासनाला ठोस विकासात्मक कामांना गती देता आली नाही. भाविकांच्या सुविधेकडेही दुर्लक्ष झाले. परंतु आता नवनियुक्त विश्वस्त मंडळ पूर्ण अधिकारारुढ झाल्याने विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.उच्च न्यायालयानेही फेटाळली होती याचिकातत्पूर्वी नवीन विश्वस्तांच्या निवडीनंतर लगेच आक्षेप नोंदवून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात धर्मदाय आयुक्तांनी विश्वस्तांची निवडप्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविली. ओळखीतील लोकांनाच विश्वस्त म्हणून स्थान दिले. त्यामुळे ही निवड प्रक्रियाच रद्द करुन दोषींवर कारवाई करावी असा आक्षेप होता. माजी उपसरपंच विनोद काळे, भाजपाचे जिल्हा सचिव सुरेश महाजन, भाजप व्यापारी आघाडीचे प्र्रमुख विजय नवाडे, भाजपाचे माजी तालुका सरचिटणीस सुरेश होरे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अशोक गारगाटे यांनी ही याचिका दाखल केली होती. परंतु उच्च न्यायालयानेही विश्वतांच्या बाजूने निकाल दिला होता.