शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गतवर्षी जळत होत्या चिता, यंदा भडकतोय द्वेषाचा उन्माद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मागील वर्षी हाहाकार माजविला. अत्यावश्यक सेवा वगळता अवघे यवतमाळ ठप्प झाले होते. रुग्णांची संख्या भरमसाठ वाढत असल्याने शासकीय यंत्रणाही धास्तावलेली होती. बेड मिळाला तर ऑक्सीजन नसायचा आणि ऑक्सीजन मिळाला तर रेमडेसीव्हीरसाठी धावाधाव करावी लागायची. कोरोनाने अनेक जीव घेणे प्रश्न सर्वांसमोर उभे केले होते. एकीकडे औषधांचा तुटवडा होता, तर दुसरीकडे लस घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. कोरोना नसलेल्या रुग्णांनी उपचारासाठी जायचे कुठे ?

विशाल सोनटक्के लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप मागील वर्षी याच एप्रिल महिन्यात शिगेला होता. २० ते ३० एप्रिल या दहा दिवसांच्या कालावधीत तब्बल ३५१ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा कोरोनाची लाट ओसरली असली तरी राजकीय विद्वेषाचा वणवा मात्र भडकलेला आहे. त्यामुळेच कोरोना संकटातून आम्ही नक्की काय शिकलो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मागील वर्षी हाहाकार माजविला. अत्यावश्यक सेवा वगळता अवघे यवतमाळ ठप्प झाले होते. रुग्णांची संख्या भरमसाठ वाढत असल्याने शासकीय यंत्रणाही धास्तावलेली होती. बेड मिळाला तर ऑक्सीजन नसायचा आणि ऑक्सीजन मिळाला तर रेमडेसीव्हीरसाठी धावाधाव करावी लागायची. कोरोनाने अनेक जीव घेणे प्रश्न सर्वांसमोर उभे केले होते. एकीकडे औषधांचा तुटवडा होता, तर दुसरीकडे लस घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. कोरोना नसलेल्या रुग्णांनी उपचारासाठी जायचे कुठे ? असाही प्रश्न निर्माण झाला होता. वाढत्या कोरोनामुळे अत्यावश्यक सेवाही सकाळी ११ पर्यंतच ठेवण्यात आली. दुसरीकडे मेडिकलमधील खाटाही फुल्ल झाल्याने अतिरिक्त खाटांचे नियोजन सुरू झाले. त्या लाटेत प्रत्येकाच्या घरातील,नात्यातील अथवा मित्रमंडळीतील एखाद्याला तरी कोरोनाने संपविले होते. अशा भयानक स्थितीत माणूस जगला पाहिजे, कोरोनाची लाट ओसरली पाहिजे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होती. यंदा कोविड लाट ओसरलेली आहे. कोविडनंतर लोक बदलतील, संकटातून बाहेर पडून पुन्हा उभे राहतील असेच सर्वांना वाटत होते. मात्र यंदाच्या एप्रिलमध्ये आपण किळसवाण्या राजकारणाचा उन्माद अनुभवतो आहोत. अशा स्थितीत जगण्याचे प्रश्न मागे पडत आहेत. 

शेजार   धर्म गेला कुठे ?

- मागील वर्षी सर्वजण बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी झगडत होते. यंदा मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरून राजकारणाचा फड रंगला   आहे. 

- कोरोनाने कमी पैशांत घर चालविता येते. कुटुंबासह एकत्र तणावमुक्त जगा, तसेच संकटाच्या काळात शेजार धर्म कसा पाळायचा, हे शिकविले. यंदा हे सगळेच विसरून द्वेषाचे राजकारण सुरू आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या