शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

बोदेगाव साखर कारखाना २२२ कोटींच्या कर्जासाठी काढला विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:30 IST

दारव्हासह यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील सहा तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व उद्योग धंद्याला चालना मिळाली होती. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे २००९ पासून गाळप हंगाम बंद करावा लागला. त्यामुळे कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. २२२ कोटींचे कर्ज थकल्याने वसुलीसाठी आता कारखाना विक्रीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. 

ठळक मुद्देकर्ज वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेचा निर्णय, दारव्हासह सहा तालुके बाधित

मुकेश इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील बोदेगाव येथील जयकिसान सहकारी साखर कारखाना विक्रीला काढण्यात आला आहे. राज्य बँकेने यासंदर्भात निविदा मागविल्या असून विक्रीनंतर कारखान्याचे भवितव्य काय, याबाबत या सहा तालुक्यात चिंता व्यक्त केली जात आहे.दारव्हासह यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील सहा तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व उद्योग धंद्याला चालना मिळाली होती. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे २००९ पासून गाळप हंगाम बंद करावा लागला. त्यामुळे कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. २२२ कोटींचे कर्ज थकल्याने वसुलीसाठी आता कारखाना विक्रीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. विकासाचा दृृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून साखर कारखान्याची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी बोदेगाव हे मध्यवर्ती ठिकाण ठरवून १६ मे १९८९ रोजी जयकिसानची नोंदणी करण्यात आली. यवतमाळमधील दारव्हा, नेर व दिग्रस, तर वाशीम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा व मंगरूळ हे तालुके कार्यक्षेत्र ठरवून या भागात आठ हजार ८३० सभासद करण्यात आले. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर प्रती दिवस अडीच हजार टन गाळप क्षमतेच्या कारखाना अस्तित्वात आला. १९९२ ला चाचणी हंगामात १५५० मेट्रिक टन गाळप झाले. १९९३ ला ४५ हजार ७६५ मेट्रिक टन गाळप झाले. १९९७ व १९९९ हे दोन वर्ष गाळप बंद होते. हे वर्ष सोडले तर दहा वर्षात एकुण नऊ लाख ८६ हजार ७११ मेट्रिक टन इतके गाळप झाले. नंतर दुष्काळी परिस्थितीमुळे २००४ साली कारखाना बंद पडला. गाळप क्षमतेइतका ऊस उपलब्ध झाला नाही. ऊस वाहतुकीच्या खर्चात वाढ झाली. साखर उताऱ्यात घट, क्षमतेइतके गाळप न झाल्याने दीर्घ, मध्यम मुदती कर्जाच्या मुद्दलाचे हप्ते वेळेवर न भरता आल्याने व्याजाच्या बोजात वाढ झाली. कर्जाचा भरणा वेळेत न झाल्याने मोठ्या प्रमाणात कर्ज थकले. त्यामुळे २००६ मध्ये कारखाना अवसायनात गेला. त्यानंतर कारखाना बंद पडून नुकसान होऊ नये म्हणून तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला २००६ ते २०१२ या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात आला. त्यांनी तीन हंगामात यशस्वी गाळप केले. परंतु २००८ ते २०१० या वर्षात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे गाळप हंगाम न घेता उभयपक्षी झालेला करार एकतर्फी संपुष्टात आला. त्यामुळे २००९ पासून कारखाना बंद पडला.कारखाना पुन्हा सुरू होण्यासाठी ऊस शेतकरी आग्रहीमोठा गाजावाजा करून शरद पवार यांच्या हस्ते या कारखान्याचे उद्घाटन झाले होते. अडाण, अरूणावती यासह अनेक प्रकल्पामुळे या परिसरात सिंचनाची सुविधा आहे. ऊस लागवडीसाठी कारखान्याकडून प्रयत्न करून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. या परिसरात अनेकांना नोकरी व इतर रोजगार मिळाला. अनेक उद्योग, व्यवसायाला चालना मिळाली होती. परिसराचा कायापालट होत असताना कारखाना बंद पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या अटीवरच विकला जावा, अशी मागणी होत आहे.

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेsaleविक्री